शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

धर्म आणि राष्ट्रीयतेमुळे देशाचं नुकसान, भालचंद्र नेमाडेंचं परखड मत; 'अच्छे दिन' काय तेही सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 21:11 IST

साहित्यविश्वातील उत्तुंग लेखक आणि कवींचा सन्मान करणारा 'लोकमत साहित्य पुरस्कार' आज ठाण्यात पार पडला.

ठाणे-

साहित्यविश्वातील उत्तुंग लेखक आणि कवींचा सन्मान करणारा 'लोकमत साहित्य पुरस्कार' आज ठाण्यात पार पडला. साहित्य अकादमी, ज्ञानपीठ अशा अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी 'जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलं. यावेळी नेमाडे यांची छोटेखानी मुलाखत देखील घेण्यात आली. मुलाखतीत भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत परखड मत व्यक्त केलं. 

धर्म आणि राष्ट्रीयता या दोन गोष्टींमुळेच देशाचं सर्वाधिक नुकसान झालं आहे, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले. तसंच माणूस आजही 'हंटर'च आहे. आजही तर सेकंदाला बलात्कार होतात, खून होतात आणि आरोपी अनेक वर्ष सापडत नाहीत. हेच आपले 'अच्छे दिन' आहेत, असंही नेमाडे पुढे म्हणाले. 

धर्म आणि राष्ट्रीयतेवर नेमकं काय बोलले नेमाडे?"जगात सगळ्यात खराब गोष्ट काही असेल तर ती धर्म आणि राष्ट्रीयता हिच आहे. मी पाकिस्तानात, चीनमध्येही गेलोय. तिथंही आपल्यासारखेच लोक आहेत. पाकिस्तानात कडेवर एक मुल घेऊन जाणारी स्त्री मी पाहिलीय. चीनमध्येही महिलांना आपल्या साडीचं अप्रूप असतं. सगळी चांगली लोक आहेत. सरकार वाईट असतात. राष्ट्र वाईट असतं. तेच आपल्यात झुंजी लावून भानगडी करत राहतं", असं भालचंद्र नेमाडे म्हणाले. धर्म आणि राष्ट्रीयता अजिबात मानायच्या नाहीत. लेखकांच्या त्याच्या पलिकडे जाऊन लिहावं, असंही ते पुढे म्हणाले. 

'अच्छे दिन' काय तेही सांगितलं..."माणूस अजूनही हंटर वृत्तीचा म्हणजे शिकारीच्या काळात जसा होता तसाच आहे. आजही दर दोन-तीन मिनिटांनी बलात्कार होतात. खून होतात आणि १५ वर्ष आरोपी सापडत नाहीत. 'अच्छे दिन' यालाच म्हणतात. अशावेळी लेखकांचं काम असतं की सर्वांना चांगलं बोलणं किंवा वरवरचं वागू नये. परखडपणे मत मांडावं", असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.

आपल्या मनात जे येतं ते खरं असतं कारण आपल्या नेणीवांमध्ये ते येत असतं. फक्त आपल्याला चौकट बरोबर सांभाळावी लागते. कुठल्याही कलेला पक्की चौकट लागते. चौकटीत लिहिणं बरेचदा दुर्देवानं मला जमत नाही. त्यामुळेच गेली पाच वर्ष मी पोलीस सुरक्षेखाली आहे. ही खरंतर वाईट परिस्थिती आहे. 'अच्छे दिन' यालाच म्हणतात असं मी मानतो, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.