शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

धर्म आणि राष्ट्रीयतेमुळे देशाचं नुकसान, भालचंद्र नेमाडेंचं परखड मत; 'अच्छे दिन' काय तेही सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 21:11 IST

साहित्यविश्वातील उत्तुंग लेखक आणि कवींचा सन्मान करणारा 'लोकमत साहित्य पुरस्कार' आज ठाण्यात पार पडला.

ठाणे-

साहित्यविश्वातील उत्तुंग लेखक आणि कवींचा सन्मान करणारा 'लोकमत साहित्य पुरस्कार' आज ठाण्यात पार पडला. साहित्य अकादमी, ज्ञानपीठ अशा अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी 'जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलं. यावेळी नेमाडे यांची छोटेखानी मुलाखत देखील घेण्यात आली. मुलाखतीत भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत परखड मत व्यक्त केलं. 

धर्म आणि राष्ट्रीयता या दोन गोष्टींमुळेच देशाचं सर्वाधिक नुकसान झालं आहे, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले. तसंच माणूस आजही 'हंटर'च आहे. आजही तर सेकंदाला बलात्कार होतात, खून होतात आणि आरोपी अनेक वर्ष सापडत नाहीत. हेच आपले 'अच्छे दिन' आहेत, असंही नेमाडे पुढे म्हणाले. 

धर्म आणि राष्ट्रीयतेवर नेमकं काय बोलले नेमाडे?"जगात सगळ्यात खराब गोष्ट काही असेल तर ती धर्म आणि राष्ट्रीयता हिच आहे. मी पाकिस्तानात, चीनमध्येही गेलोय. तिथंही आपल्यासारखेच लोक आहेत. पाकिस्तानात कडेवर एक मुल घेऊन जाणारी स्त्री मी पाहिलीय. चीनमध्येही महिलांना आपल्या साडीचं अप्रूप असतं. सगळी चांगली लोक आहेत. सरकार वाईट असतात. राष्ट्र वाईट असतं. तेच आपल्यात झुंजी लावून भानगडी करत राहतं", असं भालचंद्र नेमाडे म्हणाले. धर्म आणि राष्ट्रीयता अजिबात मानायच्या नाहीत. लेखकांच्या त्याच्या पलिकडे जाऊन लिहावं, असंही ते पुढे म्हणाले. 

'अच्छे दिन' काय तेही सांगितलं..."माणूस अजूनही हंटर वृत्तीचा म्हणजे शिकारीच्या काळात जसा होता तसाच आहे. आजही दर दोन-तीन मिनिटांनी बलात्कार होतात. खून होतात आणि १५ वर्ष आरोपी सापडत नाहीत. 'अच्छे दिन' यालाच म्हणतात. अशावेळी लेखकांचं काम असतं की सर्वांना चांगलं बोलणं किंवा वरवरचं वागू नये. परखडपणे मत मांडावं", असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.

आपल्या मनात जे येतं ते खरं असतं कारण आपल्या नेणीवांमध्ये ते येत असतं. फक्त आपल्याला चौकट बरोबर सांभाळावी लागते. कुठल्याही कलेला पक्की चौकट लागते. चौकटीत लिहिणं बरेचदा दुर्देवानं मला जमत नाही. त्यामुळेच गेली पाच वर्ष मी पोलीस सुरक्षेखाली आहे. ही खरंतर वाईट परिस्थिती आहे. 'अच्छे दिन' यालाच म्हणतात असं मी मानतो, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.