शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

धर्म आणि राष्ट्रीयतेमुळे देशाचं नुकसान, भालचंद्र नेमाडेंचं परखड मत; 'अच्छे दिन' काय तेही सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 21:11 IST

साहित्यविश्वातील उत्तुंग लेखक आणि कवींचा सन्मान करणारा 'लोकमत साहित्य पुरस्कार' आज ठाण्यात पार पडला.

ठाणे-

साहित्यविश्वातील उत्तुंग लेखक आणि कवींचा सन्मान करणारा 'लोकमत साहित्य पुरस्कार' आज ठाण्यात पार पडला. साहित्य अकादमी, ज्ञानपीठ अशा अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी 'जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलं. यावेळी नेमाडे यांची छोटेखानी मुलाखत देखील घेण्यात आली. मुलाखतीत भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत परखड मत व्यक्त केलं. 

धर्म आणि राष्ट्रीयता या दोन गोष्टींमुळेच देशाचं सर्वाधिक नुकसान झालं आहे, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले. तसंच माणूस आजही 'हंटर'च आहे. आजही तर सेकंदाला बलात्कार होतात, खून होतात आणि आरोपी अनेक वर्ष सापडत नाहीत. हेच आपले 'अच्छे दिन' आहेत, असंही नेमाडे पुढे म्हणाले. 

धर्म आणि राष्ट्रीयतेवर नेमकं काय बोलले नेमाडे?"जगात सगळ्यात खराब गोष्ट काही असेल तर ती धर्म आणि राष्ट्रीयता हिच आहे. मी पाकिस्तानात, चीनमध्येही गेलोय. तिथंही आपल्यासारखेच लोक आहेत. पाकिस्तानात कडेवर एक मुल घेऊन जाणारी स्त्री मी पाहिलीय. चीनमध्येही महिलांना आपल्या साडीचं अप्रूप असतं. सगळी चांगली लोक आहेत. सरकार वाईट असतात. राष्ट्र वाईट असतं. तेच आपल्यात झुंजी लावून भानगडी करत राहतं", असं भालचंद्र नेमाडे म्हणाले. धर्म आणि राष्ट्रीयता अजिबात मानायच्या नाहीत. लेखकांच्या त्याच्या पलिकडे जाऊन लिहावं, असंही ते पुढे म्हणाले. 

'अच्छे दिन' काय तेही सांगितलं..."माणूस अजूनही हंटर वृत्तीचा म्हणजे शिकारीच्या काळात जसा होता तसाच आहे. आजही दर दोन-तीन मिनिटांनी बलात्कार होतात. खून होतात आणि १५ वर्ष आरोपी सापडत नाहीत. 'अच्छे दिन' यालाच म्हणतात. अशावेळी लेखकांचं काम असतं की सर्वांना चांगलं बोलणं किंवा वरवरचं वागू नये. परखडपणे मत मांडावं", असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.

आपल्या मनात जे येतं ते खरं असतं कारण आपल्या नेणीवांमध्ये ते येत असतं. फक्त आपल्याला चौकट बरोबर सांभाळावी लागते. कुठल्याही कलेला पक्की चौकट लागते. चौकटीत लिहिणं बरेचदा दुर्देवानं मला जमत नाही. त्यामुळेच गेली पाच वर्ष मी पोलीस सुरक्षेखाली आहे. ही खरंतर वाईट परिस्थिती आहे. 'अच्छे दिन' यालाच म्हणतात असं मी मानतो, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.