शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरमधील ग्राहकांची केबलचालकांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:13 IST

जोडणीसाठीही घेतात पैसे; चॅनल निवडण्याच्या अर्जांची सर्रास विक्री

बदलापूर : बदलापूरमध्ये केबलचालकांनी ग्राहकांची लूट सुरू केली आहे. सरकारच्या आदेशानंतर ग्राहकांना पसंतीचे चॅनल निवडण्याचे जे अधिकार दिले आहेत, त्याची माहिती केबलचालकांनी ग्राहकांना देणे गरजेचे आहे. मात्र, बदलापूरमधील काही केबलचालकांनी पसंतीचे चॅनल निवडण्यासाठी जो अर्ज तयार केला आहे, तो अर्ज विकण्याचे आणि अर्ज भरून देण्यासाठी पैसे उकळण्याचे काम सुरू केले आहे.ज्या ग्राहकांनी अर्ज केलेले नाहीत, त्यांची केबलजोडणी तोडण्याचे प्रकार सुरू केले आहेत. जोडणी तोडल्यानंतर अर्ज केलेल्या ग्राहकाला पुन्हा केबलजोडणीसाठी सरसकट १५० ते २०० रुपये आकारत आहेत. सध्या बदलापूरमध्ये केबलचालकांविरोधात संताप पसरला आहे. येथील केबलचालकांनी ग्राहकांच्या हक्कावरच गदा आणण्याचे काम सुरू केले आहे. ग्राहकांकडून पसंतीच्या चॅनलचा पॅक घेण्यासाठी जो अर्ज भरण्याची सक्ती केली आहे, त्या सक्तीचा गैरवापर सुरू करण्यात आला आहे. स्टेशन परिसरातील केबलचालकांनी अर्ज विकत देण्याचे काम सुरू केले आहे. एवढेच नव्हे तर अर्ज भरून घेण्यासाठी ५० रुपये स्वतंत्र आकारण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. अनेक ग्राहकांनी अजूनही अर्ज भरलेले नाहीत. त्यामुळे त्यांची केबलजोडणी काढण्याचा प्रकार पुढे येत आहे. त्यातही केबलचालकांनी आपला खिसा भरण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकाची केबलजोडणी बंद केल्यावर तो ग्राहक लागलीच अर्ज भरत असल्याने अर्ज भरण्याचे आणि सोबत पुन्हा केबलजोडणी सुरू करण्याचे १५० ते २०० रुपये आकारण्याचे काम सुरू केले आहे. केबलचालकांच्या या दादागिरीची तक्रार नेमकी कुणाकडे करावी, हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. बदलापूरमधील बहुसंख्य केबलचालकांनी हा प्रकार केल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.बदलत्या नियमांची माहिती देऊन ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्याची जबाबदारी ही केबल व्यावसायिकांची आहे. मात्र, बदलापूरमधील केबलचालकांनी ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले आहे. यासंदर्भात अतिरिक्त पैसे लाटणाऱ्या केबलचालकांवर कारवाई करण्याची मागणी ग्राहक करत आहेत.तक्रार आल्यास कारवाई करूमनोरंजनकर वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. तहसीलदार कार्यालयामार्फत या केबलचालकांवर नियंत्रण केले जाते. मात्र, तक्रारीसाठी नागरिक पुढे येत नसल्याचे समोर येत आहे.

टॅग्स :Televisionटेलिव्हिजन