शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नाट्यकर्मींकडून ध्वनी व्यवस्थेसाठी लूट, पावती न देताच सरसकट ३८०० रुपयांची आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 03:11 IST

डोंबिवली : सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात ६ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या ५७ व्या राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेतील संस्थांकडून ध्वनी व्यवस्थेसाठी पावती न देता तीन हजार ८०० रुपयांचे शुल्क आकारले जात आहे.

जान्हवी मोर्ये डोंबिवली : सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात ६ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या ५७ व्या राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेतील संस्थांकडून ध्वनी व्यवस्थेसाठी पावती न देता तीन हजार ८०० रुपयांचे शुल्क आकारले जात आहे. राज्यात अन्यत्र कुठेही असे शुल्क आकारते जात नसल्याने ते परत देण्याची मागणी नाट्यकर्मी आणि सहभागी संस्थांनी केली आहे.नाट्यगृहाचे व्यवस्थापक दत्तात्रय लधवा यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.ही प्राथमिक स्पर्धा असून ती २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यात २५ नाटके सादर होतील. मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर याठिकाणी चौकशी केली असता नाट्यगृह ध्वनी व्यवस्थेसाठी पैसे आकारत नाही, हे स्पष्ट झाले. सावित्रीबाई फुले नाट्यगृहाकडून फक्त प्रकाशयोजना पुरवली जाते. पण साऊंड सिस्टीम अर्थात ध्वनी योजनेसाठी तीन हजार आणि स्टेजवरील ध्वनी व्यवस्थेसाठी आठशे रुपये आकारले जातात.नाट्यकर्मी बापू राऊत यांनी अशी वसुली होत असल्याचे मान्य केले. आतापर्यंत दहा संस्थांनी प्रयोग सादर केल्याने ३८ हजार रूपये गोळा झाले आहेत. पुढील काळात १५ नाट्यसंस्था २४ डिसेंबरपर्यंत प्रयोग सादर करतील. त्यामुळे त्यांच्याकडून शुल्क आकारू नये आणि आधीच्या संस्थांकडून गोळा केलेले पैसे परत करावेत, अशी मागणी या संस्थांची आहे.रंगकर्मी मनोहर सुर्वे यांनी सांगितले, अनेक ठिकाणी स्पर्धा होतात. तेथे पैसे घेतले जात नाहीत. ते घेणार असल्याची पूर्वकल्पना असल्यास संस्था त्या तयारीने येते. आयत्यावेळी पैसे वसूल केल्याने स्पर्धेत सहभागी होणाºया संस्थांच्या प्रयोगावर वाईट परिणाम होतो.सरकारतर्फे समन्वयाचे काम पाहणारे सुधीर रोकडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, प्रत्येक नाट्यगृहाचे नियम वेगळे असू शकतात. पण संस्थांनी पैसे दिले असल्यास त्यांनी पावती घ्यावी. नाट्यगृहाने पैसे आकारल्याची तक्रार अद्याप आमच्यापर्यंत आलेली नाही. त्यामुळे माझा काही संबंध नाही, असे सांगून रोकडे यांनी हात वर केले.फुले नाट्यगृहाचा नियम पुढे करून ही पैसेवसुली बिनबोभाट सुरू आहे. पण या रकमेची कोणतीही पावती दिली जात नाही. त्यामुळे हा पैसा जातो कुठे? तो कशासाठी घेतला जात आहे, असा सवाल नाट्यकर्मींसह नाट्यसंस्थाकडून केला जात आहे. नाट्यगृहात मिक्सरसह लॅपटॉप आॅडिओ कनेक्शन दिले जात नाही. त्याचा रंगकर्मींच्या सादरीकरणावर परिणाम होतो. तालमीवर पाणी पडते. तांत्रिक बाबीची पूर्तता करणे ही आयोजकांची पर्यायाने सरकारची जबाबदारी आह, असे रंगकर्मींचे म्हणणे आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली