शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

तत्परता पाहून भरले मन, रस्ते दुरूस्तीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 04:55 IST

अंबरनाथमधून जाणारा राज्य महामार्ग हा काँक्रिटचा करण्यात आला आहे. मात्र चारपदरी रस्त्याऐवजी हा रस्ता तीनपदरीच केला गेला. या अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण

अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेला स्वत:च्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी वेळ नाही. मात्र खड्ड्यांवरून आमदारांना लक्ष्य केल्यावर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी हे खड्डे स्वत: न भरता पालिकेला भरण्याची विनंती केली. पालिकेनेही तातडीने रस्ता दुरूस्त करण्याचे काम हाती घेतले. रस्ता दुरूस्त कुणी केला त्यापेक्षा खड्डे बुजल्याचे समाधान नागरिकांना मिळाले आहे.

अंबरनाथमधून जाणारा राज्य महामार्ग हा काँक्रिटचा करण्यात आला आहे. मात्र चारपदरी रस्त्याऐवजी हा रस्ता तीनपदरीच केला गेला. या अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएने पुन्हा निविदा काढल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. असे असले तरी या रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. दोन महिन्यांपासून या रस्त्याच्या देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे फॉरेस्ट नाक्यावरील डांबरी रस्त्याची अवस्था ही अत्यंत खराब झाली होती. या रस्त्यावरुन गाडी चालविणेही धोकादायक झाले होते. मागील दोन महिन्यात एकदाही या खराब रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आलेले नव्हते. संर्पूण शहरभर या खराब रस्त्याचीच चर्चा सुरू होती. मात्र हा रस्ता खºया अर्थाने चर्चेत आला तो आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना उद्देशून लावलेल्या बॅनरमुळे. खड्डयांकडे लक्ष नाही असे बॅनर लावल्याने वातावरण चांगलेच तापले होते. हा बॅनर जरी काढला गेला तरी या रस्त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

आमदारांना या प्रकरणात ओढले गेल्याने प्रतिष्ठा जपण्यासाठी अधिकाºयांची धावाधाव सुुरू झाली. रस्ता एमएमआरडीएकडे असल्याने तो रस्ता त्यांनीच दुरूस्त करणे गरजेचे होते. मात्र ते करणे शक्य होत नसल्याने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची सूचना एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी पालिकेच्या अधिकाºयांना केली.हद्दीबाहेर जाऊन कामच्एमएमआरडीएच्या ताब्यातील रस्त्याचे काम पालिका करत असली तरी शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले असतानाही ते भरण्यासाठी पालिकेला वेळ नाहीच्महामार्गाची दुरूस्ती करून पालिकेने आपली तत्परता दाखवली. हद्दीबाहेर जाऊन काम करत सामान्यांना किमत नाही हेच सिद्ध झाले.फॉरेस्ट नाक्याचीच नव्हे तर शहरातील महत्वाच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविणे गरजेचे आहे. नागरिकांचा त्रास कमी करणे गरजेचे आहे. त्या अनुषंंगाने आपण स्थानिक प्राधिकरण आणि अधिकाºयांना निर्देश दिलेले आहेत. - डॉ. बालाजी किणीकर, आमदार

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथ