शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

आगरी कोळीवाड्यांतील रहिवाशांनी काढला लॉंग मार्च,महापालिका प्रशासनाचा केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 14:29 IST

गावठाणे कोळीवाड्यांचे सीमाकंन निश्चित करण्यात यावे, शासनाने घेतलेल्या जमीनी शेतकऱ्यांना पुन्हा द्याव्यात आदींसह विविध मागण्यांसाठी बुधवारी आगरी, कोळीबांधवांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करीत लॉंग मार्च काढला. यामध्ये शेकडो बांधव सहभागी झाले होते.

ठळक मुद्देराष्ट्रवादीने दिला पाठींबाकोस्टल रोड रद्द करण्याची मागणी

ठाणे - विविध कारणांसाठी शासनाने घेतलेल्या भुमीपुत्रांच्या जमीनी परत करा, कोस्टल रोड रद्द करा, गावठाण कोळीवाड्यांचे सीमांकन निश्चित करा, अशा विविध घोषणा करीत बुधवारी आगरी- कोळीबांधव जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धडकले होते. यावेळी राबोडी ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा लॉँग मार्च काढून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.                         येत्या २० डिसेंबर रोजी होणाऱ्या महासभेत महापालिका प्रशासनाच्या वतीने पाच भागांमध्ये क्लस्टर राबविण्या संदर्भातील प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावात या भागातील गावठाण आणि कोळीवाडे वगळण्यात आल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळेच आता या प्रस्तावाच्या विरोधात गावठाण आणि कोळीवाडे एकत्र आले असून त्यांनी या विरोधात बुधवारी आवाज उठविण्यात आला. बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, माजीवडे, राबोडी, कळवा आणि घोडबंदर भागातील शेतजमीनी औद्योगिक प्रयोजनाकरीता घेण्यात आल्या. त्यासाठी काही शेतकºयांना अत्यल्प मोबदला तर काहींना मोबदलाच देण्यात आला नाही. आता या जमिनींचे प्रयोजन बदलून निवासी बांधकामे असे केले जात आहे. मात्र, या प्रक्रि येमुळे मुळ मालक असलेल्या शेतकºयांना साधी बाजू मांडण्याची संधीही दिली जात नसल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणने आहे. क्लस्टर योजना राबवित असतांना आधीच गावठाण आणि कोळीवाड्यांचे सीमांकन निश्चित करण्यात आलेले नाही. असे असतांनासुध्दा योजनेचा प्रस्ताव महासभेत आलाच कसा असा सवाल यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.                      परंतु या आंदोलनाच्या निमित्ताने घोडबंदर भागात राबविण्यात येत असलेल्या कोस्टल रोडचा मुद्दाही या निमित्ताने पुन्हा एकदा रडारवर आला आहे. हा रोड शेतकरी, भुमीपुत्रांच्या दृष्टीने चुकीचा असून त्यामुळे येथील भुमीपुत्रांच्या जमीनी जाणार असल्याचा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे. यापूर्वी विविध विकास कामांसाठी घेतलेल्या जमीनींच्या बाबतीमधील अनेकांना अजून योग्य तो मोबदला मिळालेला नाही. असे असतांना पुन्हा नव नवीन प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने पुढे आणले जात आहेत. त्यामुळे प्रस्तावित कोस्टल रोडला भुमीपुत्रांचा विरोध असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवाय मेट्रो कास्टींग यार्ड प्रकल्पास नागरिकांचा विरोध असून त्यासाठी शेतकरी जमीन देण्यास तयार नाहीत. खाडी किनारी भराव टाकून कांदळवन नष्ट केले जात असून त्याकडेही दुर्लक्ष झाले आहे. या सर्व मागण्यांकडे राज्य शासन आणि महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी ठाण्यातील राबोडी भागातील पोलीस चौकी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा लाँग मार्च काढण्यात आला होता. यामध्ये ठाणे, घोडबंदर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई आणि मुंबई या भागातील भुमिपुत्र सहभागी झाले होते.समाजातील शिवसेनेच्या प्रतिनिधींनी प्रशासनावर दबाव टाकावा - जितेंद्र आव्हाडयावेळी राष्ट्रवादीने या आगरी कोळीबांधवांची भेट घेऊन त्यांच्या या आंदोलनाला जाहीर पाठींबा दर्शविला. महापालिकेत सत्ता ही शिवसेनेची असल्याने आगरी कोळी समाजातील शिवसेनेच्या प्रतिनिधींनी प्रशासनावर दबावा टाकावा असे आवाहन यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड केले. तर गावठाणे आणि कोळीवाड्यांचे आधी सिमांकन निश्चित करावे, बुलेट ट्रेनसाठी जाणाऱ्या जमीनींच्या विरोधातही आम्ही शेतकऱ्यांसोबत असल्याचे आश्वासन यावेळी शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाShetkari Jagar Manchशेतकरी जागर मंच