शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

धनगर समाजाच्या सवलतींच्या निर्णयाविरोधात उद्या लाँग मार्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 00:09 IST

धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व सवलती लागू करून राज्य शासनाने विश्वासघात केल्याचा आरोप करून त्या त्वरित रद्द करण्याच्या मागण्यांसाठी राज्यभरातील सुमारे २५ हजार आदिवासी कार्यकर्ते नाशिक येथून मुंबईला पायी लाँग मार्च काढणार आहेत.

ठाणे : धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व सवलती लागू करून राज्य शासनाने विश्वासघात केल्याचा आरोप करून त्या त्वरित रद्द करण्याच्या मागण्यांसाठी राज्यभरातील सुमारे २५ हजार आदिवासी कार्यकर्ते नाशिक येथून मुंबईला पायी लाँग मार्च काढणार आहेत. ६ मार्चपासून हा लाँग मार्च सुरू होईल. तो ९ मार्चपर्यंत मुंबईला पोहोचणार असल्याचे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष लकी जाधव यांनी लोकमतला सांगितले.आदिवासींच्या सवलती धनगर समाजास लागू केल्यामुळे आदिवासी समाजाचा विश्वासघात केल्याचे त्यांनी सांगितले. धनगर समाजाच्या या सवलती त्वरित रद्द करून घेण्यासाठी या लाँग मार्चमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी नेते, विद्यार्थी तसेच महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.नाशिक येथील गोल क्लब मैदानाहून हा लाँग मार्च सुरू होईल. यामध्ये ठिकठिकाणचे कार्यकर्ते सहभागी होऊन सुमारे २५ ते ५० हजार कार्यकर्ते आदिवासींच्या सवलती वाचवण्यासाठी सहभागी होणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या दोन दिवसांपासून ठिकठिकाणी सभा, बैठका घेऊन आज हा निर्णय घेऊन लाँग मार्च निश्चित केला आहे.सभा, बैठकांमध्ये कार्यकर्त्यांनी भाजपा-शिवसेना या सत्ताधारी पक्षांचा जाहीर निषेध करत सरकारचा धिक्कार केला आहे. धनगरांना मुख्यमंत्र्यांनी ज्या आदिवासी योजना लागू केल्या आहे. त्यातील एकही योजनेचा लाभ धनगरांना मिळू देणार नसल्याचा निर्धार या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.>२५ ते ५० हजार कार्यकर्त्यांचा समावेशया लाँग मार्चमध्ये अखिल भारतीय अदिवासी विकास परिषदेचे, राज्यभरातील आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते, युवायुवती, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन सरकारला निर्णय मागे घेण्यास भाग पाडणार असल्याचा निर्धार केल्याचे लकी जाधव यांनी लोकमतला सांगितले. नाशिक येथील गोल क्लब मैदानाहून हा लाँग मार्च सुरू होईल. यामध्ये ठिकठिकाणचे कार्यकर्ते सहभागी होऊन सुमारे २५ ते ५० हजार कार्यकर्ते आदिवासींच्या सवलती वाचवण्यासाठी सहभागी होतील.