शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

धनगर समाजाच्या सवलतींच्या निर्णयाविरोधात उद्या लाँग मार्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 00:09 IST

धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व सवलती लागू करून राज्य शासनाने विश्वासघात केल्याचा आरोप करून त्या त्वरित रद्द करण्याच्या मागण्यांसाठी राज्यभरातील सुमारे २५ हजार आदिवासी कार्यकर्ते नाशिक येथून मुंबईला पायी लाँग मार्च काढणार आहेत.

ठाणे : धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व सवलती लागू करून राज्य शासनाने विश्वासघात केल्याचा आरोप करून त्या त्वरित रद्द करण्याच्या मागण्यांसाठी राज्यभरातील सुमारे २५ हजार आदिवासी कार्यकर्ते नाशिक येथून मुंबईला पायी लाँग मार्च काढणार आहेत. ६ मार्चपासून हा लाँग मार्च सुरू होईल. तो ९ मार्चपर्यंत मुंबईला पोहोचणार असल्याचे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष लकी जाधव यांनी लोकमतला सांगितले.आदिवासींच्या सवलती धनगर समाजास लागू केल्यामुळे आदिवासी समाजाचा विश्वासघात केल्याचे त्यांनी सांगितले. धनगर समाजाच्या या सवलती त्वरित रद्द करून घेण्यासाठी या लाँग मार्चमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी नेते, विद्यार्थी तसेच महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.नाशिक येथील गोल क्लब मैदानाहून हा लाँग मार्च सुरू होईल. यामध्ये ठिकठिकाणचे कार्यकर्ते सहभागी होऊन सुमारे २५ ते ५० हजार कार्यकर्ते आदिवासींच्या सवलती वाचवण्यासाठी सहभागी होणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या दोन दिवसांपासून ठिकठिकाणी सभा, बैठका घेऊन आज हा निर्णय घेऊन लाँग मार्च निश्चित केला आहे.सभा, बैठकांमध्ये कार्यकर्त्यांनी भाजपा-शिवसेना या सत्ताधारी पक्षांचा जाहीर निषेध करत सरकारचा धिक्कार केला आहे. धनगरांना मुख्यमंत्र्यांनी ज्या आदिवासी योजना लागू केल्या आहे. त्यातील एकही योजनेचा लाभ धनगरांना मिळू देणार नसल्याचा निर्धार या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.>२५ ते ५० हजार कार्यकर्त्यांचा समावेशया लाँग मार्चमध्ये अखिल भारतीय अदिवासी विकास परिषदेचे, राज्यभरातील आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते, युवायुवती, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन सरकारला निर्णय मागे घेण्यास भाग पाडणार असल्याचा निर्धार केल्याचे लकी जाधव यांनी लोकमतला सांगितले. नाशिक येथील गोल क्लब मैदानाहून हा लाँग मार्च सुरू होईल. यामध्ये ठिकठिकाणचे कार्यकर्ते सहभागी होऊन सुमारे २५ ते ५० हजार कार्यकर्ते आदिवासींच्या सवलती वाचवण्यासाठी सहभागी होतील.