शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा घोळ दुसऱ्या दिवशीही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 00:48 IST

पावसाचा जोर ओसरला : मध्य रेल्वे आली रुळांवर, मात्र वेळापत्रकाचे तीनतेरा; मुंबईत अडकलेले नोकरदार सकाळी परतले घरी

डोंबिवली : संततधार पावसामुळे बुधवारी दिवसभर कोलमडलेली मध्य रेल्वे अखेर गुरुवारी पूर्वपदावर आली. त्यामुळे नोकरदारवर्गाला दिलासा मिळाला. परंतु, या गाड्या विलंबाने धावत होत्या. दुसरीकडे लांब पल्ल्यांच्या काही गाड्या या नाशिक स्थानकातून तर, कोकण रेल्वेच्या काही गाड्या पनवेल स्थानकातून सोडण्यात आल्या. त्यामुळे या गाड्यांनी प्रवास करू इच्छिणाºया प्रवाशांचे हाल झाले.

मध्य रेल्वेची ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यानची वाहतूक पूर्णत: ठप्प होती. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातून मुंबईत कामानिमित्त गेलेले प्रवासी रात्री घरी परतू शकलेले नव्हते. त्यामुळे अनेकांनी कार्यालये, विविध रेल्वेस्थानके, शाळांमध्ये रात्र काढावी लागली. गुरुवारी पहाटेपासून पावसाचा जोर कमी होताच लोकल वाहतूक सुरू झाली. त्यामुळे मुंबईत अडकून पडलेल्यांनी सकाळी मिळेल त्या लोकलने घर गाठले. अगोदर धीम्या लोकल सोडण्यात आल्या. त्यानंतर, सकाळी ८ वाजल्यापासून जलदमार्गावरील लोकलची वाहतूकही सुरू झाली. बुधवारी ठिकठिकाणी प्रवासी लटकल्याने गुरुवारी सकाळपासूनच मुंबईकडे जाणाºया लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी नसल्याचे पाहायला मिळाले.

पहाटेपासूनच मध्य रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्यांच्या अडकलेल्या गाड्या जलदमार्गे काढल्या. त्यामुळे या मार्गावरून सुरुवातीला उपनगरीवाहतूक सुरू न झाल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठवली. मात्र, सकाळी ८ वाजल्यानंतर जलदच्या अप, डाउन मार्गावर लोकल सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. सकाळी ८ च्या सुमारास सुटणारी कल्याण-सीएसटीएम महिला विशेष लोकल गुरुवारी रद्द करण्यात आल्याने महिला प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दुपारीही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, तरीही लोकलसेवेवर परिणाम झाला नव्हता.दरम्यान, कल्याण, डोंबिवली, दिवा स्थानकांमध्ये बुधवारी मध्यरात्री स्थानके तसेच स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छता करण्यात आली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला. मात्र, स्थानकांबाहेरील अस्वच्छता, दुर्गंधीमुळे प्रवासी हैराण झाले होते.नाशिकपर्यंत जायचे कसे? अनेकांची ‘जनशताब्दी’ चुकलीच्उत्तरेकडे जाणाºया लांब पल्ल्यांच्या काही गाड्या नाशिक स्थानकापुढे वळवण्यात आल्या होत्या. सकाळच्या वेळेत त्या गाड्यांसाठी आलेल्या प्रवाशांना ठाणे, कल्याण स्थानकांत ताटकळावे लागले. अनेकांना हे बदल माहितीही नसल्याने ऐनवेळी त्यांची पंचाईत झाली होती.च् नाशिक येथून गाड्या सोडल्या असल्या, तरी तिथपर्यंत जायचे कसे? आणि तेथे गेल्यावर संबंधित गाडी नसेल तर काय करायचे, असा सवाल करत प्रवाशांनी रेल्वेच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली.च् मुंबईहून कोकणात जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस पनवेलहून सकाळी ७.२० वाजता सोडण्यात आली. त्यामुळे ठाण्याहून प्रवास करणाºया प्रवाशांना पहाटे ट्रान्स-हार्बरमार्गाने पनवेल गाठावे लागले. मात्र, काहींना तेथे वेळेत पोहोचता न आल्याने त्यांची ही गाडी चुकली.

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वेlocalलोकल