शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
6
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
7
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
8
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
9
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
10
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
11
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
12
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
13
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
14
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
15
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
16
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
17
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
19
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
20
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."

लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा घोळ दुसऱ्या दिवशीही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 00:48 IST

पावसाचा जोर ओसरला : मध्य रेल्वे आली रुळांवर, मात्र वेळापत्रकाचे तीनतेरा; मुंबईत अडकलेले नोकरदार सकाळी परतले घरी

डोंबिवली : संततधार पावसामुळे बुधवारी दिवसभर कोलमडलेली मध्य रेल्वे अखेर गुरुवारी पूर्वपदावर आली. त्यामुळे नोकरदारवर्गाला दिलासा मिळाला. परंतु, या गाड्या विलंबाने धावत होत्या. दुसरीकडे लांब पल्ल्यांच्या काही गाड्या या नाशिक स्थानकातून तर, कोकण रेल्वेच्या काही गाड्या पनवेल स्थानकातून सोडण्यात आल्या. त्यामुळे या गाड्यांनी प्रवास करू इच्छिणाºया प्रवाशांचे हाल झाले.

मध्य रेल्वेची ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यानची वाहतूक पूर्णत: ठप्प होती. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातून मुंबईत कामानिमित्त गेलेले प्रवासी रात्री घरी परतू शकलेले नव्हते. त्यामुळे अनेकांनी कार्यालये, विविध रेल्वेस्थानके, शाळांमध्ये रात्र काढावी लागली. गुरुवारी पहाटेपासून पावसाचा जोर कमी होताच लोकल वाहतूक सुरू झाली. त्यामुळे मुंबईत अडकून पडलेल्यांनी सकाळी मिळेल त्या लोकलने घर गाठले. अगोदर धीम्या लोकल सोडण्यात आल्या. त्यानंतर, सकाळी ८ वाजल्यापासून जलदमार्गावरील लोकलची वाहतूकही सुरू झाली. बुधवारी ठिकठिकाणी प्रवासी लटकल्याने गुरुवारी सकाळपासूनच मुंबईकडे जाणाºया लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी नसल्याचे पाहायला मिळाले.

पहाटेपासूनच मध्य रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्यांच्या अडकलेल्या गाड्या जलदमार्गे काढल्या. त्यामुळे या मार्गावरून सुरुवातीला उपनगरीवाहतूक सुरू न झाल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठवली. मात्र, सकाळी ८ वाजल्यानंतर जलदच्या अप, डाउन मार्गावर लोकल सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. सकाळी ८ च्या सुमारास सुटणारी कल्याण-सीएसटीएम महिला विशेष लोकल गुरुवारी रद्द करण्यात आल्याने महिला प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दुपारीही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, तरीही लोकलसेवेवर परिणाम झाला नव्हता.दरम्यान, कल्याण, डोंबिवली, दिवा स्थानकांमध्ये बुधवारी मध्यरात्री स्थानके तसेच स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छता करण्यात आली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला. मात्र, स्थानकांबाहेरील अस्वच्छता, दुर्गंधीमुळे प्रवासी हैराण झाले होते.नाशिकपर्यंत जायचे कसे? अनेकांची ‘जनशताब्दी’ चुकलीच्उत्तरेकडे जाणाºया लांब पल्ल्यांच्या काही गाड्या नाशिक स्थानकापुढे वळवण्यात आल्या होत्या. सकाळच्या वेळेत त्या गाड्यांसाठी आलेल्या प्रवाशांना ठाणे, कल्याण स्थानकांत ताटकळावे लागले. अनेकांना हे बदल माहितीही नसल्याने ऐनवेळी त्यांची पंचाईत झाली होती.च् नाशिक येथून गाड्या सोडल्या असल्या, तरी तिथपर्यंत जायचे कसे? आणि तेथे गेल्यावर संबंधित गाडी नसेल तर काय करायचे, असा सवाल करत प्रवाशांनी रेल्वेच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली.च् मुंबईहून कोकणात जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस पनवेलहून सकाळी ७.२० वाजता सोडण्यात आली. त्यामुळे ठाण्याहून प्रवास करणाºया प्रवाशांना पहाटे ट्रान्स-हार्बरमार्गाने पनवेल गाठावे लागले. मात्र, काहींना तेथे वेळेत पोहोचता न आल्याने त्यांची ही गाडी चुकली.

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वेlocalलोकल