शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

लोकमत इम्पॅक्ट : डोंबिवलीचे ते गतीरोधक अवैध? चौकशी व्हावी - राजेश मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 17:47 IST

डोंबिवली येथिल मानपाडा रोडवरील रातोरात टाकण्यात आलेले गतीरोधक अवैध असून ते नेमके कोणी, कशासाठी आणि का टाकले याबाबतची सत्यता पडताळण्याचे काम कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अभियंत्यांनी करावी, आणि संबंधितांवर काय कारवाई करणार याची माहिती द्यावी अशी मागणी महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी केली.

ठळक मुद्दे गतीरोधकांची उंची नियमानूसार नाही  केडीएमसी अभियंत्यांचाही दुजोरा

डोंबिवली: येथिल मानपाडा रोडवरील रातोरात टाकण्यात आलेले गतीरोधक अवैध असून ते नेमके कोणी, कशासाठी आणि का टाकले याबाबतची सत्यता पडताळण्याचे काम कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अभियंत्यांनी करावी, आणि संबंधितांवर काय कारवाई करणार याची माहिती द्यावी अशी मागणी महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी केली.मोरे यांनी ‘लोकमत’च्या हॅलो ठाणेमधील डोंबिवलीचे ते गतीरोधक ठरताहेत जीवघेणे या वृत्ताची दखल घेत त्या जीवघेण्या गतीरोधकाची बुधवारी पाहणी केली. त्या पाहणी दरम्यान मानपाडा रस्त्यावर गावदेवी मंदिराजवळच्या दोन्ही दिशेकडील रस्त्यांवर तीन गतीरोधक शनिवारी रात्रीत टाकण्यात आले, त्यानंतर तेथे ६ अपघात झाले, परिसरातील एका दुकानदाराने त्याबाबत विचारणा केली असता, ज्येष्ठ नागरिकांची मागणी असल्याचे सांगण्यात आले. मोरे यांनी या माहितीच्या आधारे केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यावर ते गतीरोधक अवैध असून कोणी टाकले याची चौकशी सुरु असून पाटील तसे लेखी आदेश काढणार असल्याचे मोरे म्हणाले. चुकीच्या पद्धतीने गतीरोधक टाकण्यात आले असून त्याची उंची नियमानूसार नाही, हे मोरे यांनी महापालिका अधिका-यांच्या नीदर्शनास आणले. त्यांनी फुटपट्टी घेत गतीरोधकाची उंची मोजली, त्यात ती उंची योग्य नसल्याचे त्यांना जाणवले, त्यांनी तशी माहिती महापालिकेला दिली.पाटील यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता त्यांनीही सदरहू गतीरोधक अत्यंत चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आले असून त्याची चौकशी सुरु आहे. त्यासंदर्भात शहर वाहतूक नियंत्रण विभागाशी संपर्क साधणे, त्यांना तेथे गतीरोधकाची आवश्यकता आहे की नाही ते विचारणे, नसेल तर ते काढुन टाकणे, तसेच जर आवश्यकता असेल तर त्याची योग्य ती डागडुजी करणे आदी तांत्रिक बाबींची स्पष्टता करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे ते म्हणाले.दरम्यान अपघातग्रस्त जसुमती मेस्त्री यांची प्रकृति स्थिर असून दोन दिवसात त्यांच्या डाव्या हाताच्या कोपराची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांचे पती रमेश मेस्त्री हे मात्र त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. ते म्हणाले की, जर अवैधपणे गतीरोधक टाकलेत आणि, त्याची महापालिका दप्तरी नोंद नसेल तर या महापालिकेत किती अनागोंदी कारभार सुरु आहे हे स्पष्ट होते. असा मनमानी कारभार करणा-यांवर महापालिका, सत्ताधारी नेते काय कारवाई करणार हे स्पष्ट करावेत. तसेच ते कोणाच्या सांगण्यावरुन टाकले त्यांनी कुटूंबियांच्या औषधोपराचा खर्च द्यावा, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही केली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवलीkalyanकल्याण