शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

लोकमत इफेक्ट : उल्हासनगरातील पाणी टंचाई विभागाची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

By सदानंद नाईक | Updated: March 28, 2024 19:52 IST

उल्हासनगरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे.

उल्हासनगर : सुभाष टेकडी भागातील दहाचाळ या पाणी टंचाईग्रस्त भागाचा अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी पाहणी करून जलवाहिनी दुरुस्ती काम सुरू करण्याचे आदेश दिले. येत्या काही दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे आश्वासन लेंगरेकर यांनी नागरिकांना दिले.

उल्हासनगरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे. गटारीचे पाईप टाकण्यासाठी सुभाष टेकडी परिसरातील दहाचाळ भागात रस्ते खोदतांना पिण्याची जलवाहिनी फुटली. जलवाहिणीत दगड व माती गेल्याने जलवाहिनीतील पाणी वितरणात अडथळे निर्माण झाले. गेल्या आठवड्या पासून परिसरात पाणी टंचाई निर्माण झाल्याने, संतप्त महिलांनी नेताजी चौकातील विभागीय पाणी पुरवठा विभागावर मोर्चा काढून अधिकाऱ्याना घेराव घालत जाब विचारला होता. मोर्चाची बातमी लोकमत मध्ये गुरवारी प्रसिद्ध झाल्याची दखल अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी घेऊन, पाणी टंचाईग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच महिलांच्या समस्या एकून घेतल्या आहेत.

शहरातील रस्ते खोदून भुयारी गटारीचे पाईप टाकण्याच्या कामावेळी जलवाहिनी फुटून पाणी टंचाईचा प्रश्न सर्वत्र उभा ठाकत आहे. दहाचाळ येथील फुटलेल्या जलवाहिणीत दगड, माती गेल्याने, जलवाहिनेत अडथळे निर्माण होऊन, ते अडथळे काढण्याचे काम महापालिका करीत आहेत. जलवाहिणीतील अडथळे दूर करून दोन दिवसा पाणीपुरवठा नियमित होणार असल्याचें आश्वासन अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी दिले. यावेळी नागरिकांनी नव्याने ब्ल्यूलाईन जलवाहिनी टाकण्याची मागणी केली. शहरात भुयारी गटारीच्या योजनेमुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून खोदलेले रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने, धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. या धुळीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर