शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

Lok Sabha Election 2019: निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधींचे वादग्रस्त प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:19 IST

लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने महापालिका स्थायी समितीच्या १५ दिवसांत झालेल्या सहा बैठकांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावांना एकमताने मंजुरी दिली गेली.

- सदानंद नाईक, उल्हासनगरलोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने महापालिका स्थायी समितीच्या १५ दिवसांत झालेल्या सहा बैठकांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावांना एकमताने मंजुरी दिली गेली. यामध्ये अनेक वादग्रस्त प्रस्तावाला मंजुरी दिल्याचा आरोप आहे. यामुळे प्रशासन वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सुरुवातीला ‘स्वच्छ व सुंदर शहरा’वर भर देणाऱ्या प्रशासनाने शहरवासीयांची मने जिंकली होती. मात्र रस्त्याची दुरवस्था, पाणी गळती, पाणीटंचाई, विकास कामांची संथगती, साफसफाई, महापालिका विभागातील सावळागोंधळ, अवैध बांधकामे, कल्याण ते बदलापूर रस्त्याची पुनर्बांधणी रखडणे, उल्हास नदीतील जलपर्णी, वालधुनी नदीचे प्रदूषण, डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न, पालिका उत्पन्नातील घट यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.महापालिकेत भाजपाच्या बहुंताश निर्णयाला विरोध करणारे विरोधी पक्ष गेल्या एका महिन्यापासून शांत झाले आहेत . लोकसभा निवडणुकीत भाजपा व शिवसेनेची युती झाल्याने, दोन्ही पक्षाचे स्थानिक नेते गळ््यात गळे घालतांनाचे चित्र दिसत आहे. महापालिका महासभा व स्थायी समिती यामध्ये बहुतांश विषय विरोधाविना मंजूर होत असल्याने, शहरात विरोधी पक्ष शिल्लक आहे का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. गेल्या १५ दिवसात स्थायी समितीच्या सहा सभांमध्ये बहुतांश प्रस्ताव एकमताने मंजूर झाले. शहर हितापेक्षा ठेकेदार व गोल्डन गँगच्या फायद्याचे प्रस्ताव मंजूर झाल्याची चर्चा आहे.महापालिका तिजोरीत खडखडाट असतानाही स्थायी समितीने कोट्यवधी रुपयांच्या कामाला मंजुरी दिली. यामध्ये मुख्य रस्त्याऐवजी नाले, सीसी पायवाटा, पाण्याच्या लाईन टाकणे, आदी कामाचा सर्वाधिक भरणा आहे. शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करता यावी म्हणून पाच कोटींच्या निधीतून तीन मजली अभ्यासिका बांधण्यात आली. अभ्यासिकेत युपीएससी, एमपीएसी आदी स्पर्धात्मक परीक्षेच्या पुस्तकाशिवाय गं्रथालय सुरु करण्याची संकल्पना होती. तसेच मार्गदर्शन वर्ग घेण्यात येणार होते. त्याकरिता तरतूद करण्याऐवजी मुला-मुलींच्या सुरक्षेचे कारण पुढे करून, चक्क ४९ लाखांच्या निधीतून ६५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली. म्हारळ येथील राणा खदान डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तब्बल साडेतीन कोटींच्या निधीला मंजुरी दिली. कचºयावर काय प्रक्रिया करणार याबाबत सविस्तर माहिती प्रस्तावात नसल्याने, सशंय निर्माण झाला. दुर्गंधीमुक्त डम्पिंग ग्राऊंडचा प्रयोग यापूर्वी फसला असून पालिकेचे लाखो रूपये वाया गेले आहेत. पालिका शाळा क्रं.१८ व २४ च्या इमारतीची पुनर्बांधणीचा विषयही असाच वादात सापडला आहे. नवीन विकास आराखड्यात शाळेची इमारत ६० टक्के रस्त्यात येत असतांनाही चार कोटींच्या निधीतून पुनर्बांधणीला मान्यता दिली. तसेच १३ कि.मी. क्षेत्रफळाच्या शहरात खाजगी ठेकेदाराने सुरू केलेल्या तब्बल २७ नागरिक सुविधा केंद्रासाठी कर्मचारी पुरवठा करण्यासाठी तब्बल पाच कोटींच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.शहरातील मालमत्तेचे जीआयएस सर्वेक्षणाचे दर कल्याण-डोंबिवली, बदलापूर, पनवेल आदी शहरापेक्षा दुप्पट असताना, तब्बल १४ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. समाधानाची बाब म्हणजे मीरा-भाईंदर व उल्हासनगर महापालिकेचा दर समान असून दोन्ही पालिकेत दुप्पट दरावरून ठेक्याला विरोध होत आहे. भुयारी गटार योजनेंंतर्गत शांतीनगर येथे मलनिसा:रण केंद्र उभारण्यात येत आहे. त्याच्या अतिरिक्त कामाला मंजुरी न देण्याची अट असतांना मलनिसा:रण केंद्राच्या पाईल फांऊंडेशन व कचरा उचलण्यासाठी अतिरिक्त १३ कोटींच्या कामाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली. नवीन सार्वजनिक शौचालय बीओअी तत्वावर देणे, ठेकेदारामार्फत सुरक्षा रक्षक नेमणे, वाहतूक पोलीस गार्डा नेमणे, पाणीपुरवठा करण्यासाठी व्हॉल्व्हमन व मजूर, वाहनचालक कंत्राटी पद्धतीने ठेकेदाराकडून घेणे, जलकुंभांना कोट्यवधी रूपयाच्या निधीतून पंपिंग मशिन बसवणे प्रस्तावाला मंजुरी दिली.उल्हासनगरात आतापर्यंत भाजपा सत्तेत तर शिवसेना विरोधात असे चित्र होते. मात्र युती जाहीर होताच दोन्ही पक्षाचे नेते गळ््यात गळे घालून फिरत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर १५ दिवसांत स्थायी समितीच्या सहा बैठका घेऊन कोट्यवधी रुपयांचे मंजूर केलेले काही प्रस्ताव वादग्रस्त ठरले आहेत.महापौर स्पर्धेच्या खर्चावर प्रश्नचिन्हमहापौर क्रिकेट स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धेवर ३५ लाखांचा खर्च करण्यात आला. शहरातील शाळां व्यतिरिक्त कुठेच स्पर्धा घेतली नसतांना ३५ लाखांचा खर्च कसा आला? असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच महापौर कबड्डी स्पर्धेवर तब्बल ६० लाख खर्च करण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली. महापालिका आर्थिक अडचणीत असतांना महापौर मॅरेथॉन, क्रिकेट स्पर्धा व कबड्डी स्पर्धेवर खर्च करणे योग्य आहे का? असा सवाल केला जात आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिका