शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

CoronaVirus News : कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊन?, आमदारांनी बैठकीत केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 00:40 IST

वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी शहरात पुन्हा किमान १० ते १५ दिवस लॉकडाऊन करावे, अशी मागणी आमदारांनी शनिवारी झालेल्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत केली आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या तीन हजारांच्या घरात गेली आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी शहरात पुन्हा किमान १० ते १५ दिवस लॉकडाऊन करावे, अशी मागणी आमदारांनी शनिवारी झालेल्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत केली आहे. त्यावर, शहराच्या पातळीवर लॉकडाऊन लागू करण्याबाबत आयुक्त निर्णय घेऊ शकतात, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक घेतली. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, भाजप आमदार रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड, मनसेचे आमदार राजू पाटील, महापौर विनीता राणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते.अनलॉक-१ मध्ये शहरातील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता भिवंडी महापालिकेच्या महासभेत शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. केडीएमसी हद्दीतही रुग्णांची संख्या वाढली असून मृतांची संख्याही ६९ वर पोहोचली आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा १५ दिवसांचे लॉकडाऊन करावे, अशी मागणी मनसेचे आमदार पाटील यांनी केली. आमदार चव्हाण, गायकवाड, भोईर यांनी ही मागणी उचलून धरली. त्यामुळे या मागणीचा विचार प्रशासनाने करावा, अशा सूचना पालकमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.सध्या कंटेनमेंट झोनचे पालन केले जात असले, तरी रुग्णांची संख्या काही कमी होत नाही. बैठकीनंतर १० ते १५ दिवसांचा लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने अथवा एकाच वेळी करण्यासाठी नियोजन केले जाईल, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.दरम्यान रुग्णांना बेड, आॅक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा मिळत नाही. उपचार न मिळाल्याने रुग्णांचे मृत्यू होत आहेत, याकडे आ. चव्हाण व गायकवाड यांनी यावेळी लक्ष वेधत प्रशासनास फैलावर घेतले.>बेड वाढवण्याचे आदेशपालकमंत्री शिंदे यांनी बैठकीनंतर सांगितले की, ‘वाढती रुग्णसंख्या पाहता आॅक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढविण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार, त्यांच्याकडून काम सुरू आहे. राज्य सरकारने १७ कोटींचा निधी केडीएमसीला दिला आहे. कोविड उपचारासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. आणखीन निधीची आवश्यकता भासल्यास कोविडसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.’