शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

CoronaVirus News : कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊन?, आमदारांनी बैठकीत केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 00:40 IST

वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी शहरात पुन्हा किमान १० ते १५ दिवस लॉकडाऊन करावे, अशी मागणी आमदारांनी शनिवारी झालेल्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत केली आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या तीन हजारांच्या घरात गेली आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी शहरात पुन्हा किमान १० ते १५ दिवस लॉकडाऊन करावे, अशी मागणी आमदारांनी शनिवारी झालेल्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत केली आहे. त्यावर, शहराच्या पातळीवर लॉकडाऊन लागू करण्याबाबत आयुक्त निर्णय घेऊ शकतात, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक घेतली. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, भाजप आमदार रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड, मनसेचे आमदार राजू पाटील, महापौर विनीता राणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते.अनलॉक-१ मध्ये शहरातील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता भिवंडी महापालिकेच्या महासभेत शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. केडीएमसी हद्दीतही रुग्णांची संख्या वाढली असून मृतांची संख्याही ६९ वर पोहोचली आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा १५ दिवसांचे लॉकडाऊन करावे, अशी मागणी मनसेचे आमदार पाटील यांनी केली. आमदार चव्हाण, गायकवाड, भोईर यांनी ही मागणी उचलून धरली. त्यामुळे या मागणीचा विचार प्रशासनाने करावा, अशा सूचना पालकमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.सध्या कंटेनमेंट झोनचे पालन केले जात असले, तरी रुग्णांची संख्या काही कमी होत नाही. बैठकीनंतर १० ते १५ दिवसांचा लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने अथवा एकाच वेळी करण्यासाठी नियोजन केले जाईल, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.दरम्यान रुग्णांना बेड, आॅक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा मिळत नाही. उपचार न मिळाल्याने रुग्णांचे मृत्यू होत आहेत, याकडे आ. चव्हाण व गायकवाड यांनी यावेळी लक्ष वेधत प्रशासनास फैलावर घेतले.>बेड वाढवण्याचे आदेशपालकमंत्री शिंदे यांनी बैठकीनंतर सांगितले की, ‘वाढती रुग्णसंख्या पाहता आॅक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढविण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार, त्यांच्याकडून काम सुरू आहे. राज्य सरकारने १७ कोटींचा निधी केडीएमसीला दिला आहे. कोविड उपचारासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. आणखीन निधीची आवश्यकता भासल्यास कोविडसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.’