शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

ठाण्यामुळे वाढला कल्याण, डोंबिवलीचा लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:54 IST

अनलॉक-१ मध्ये नागरिक अनावश्यक फिरू लागल्याने दिवसाला ६०० पेक्षा जास्त रुग्ण आढळू लागले. त्यासाठी केडीएमसीने आरोग्य विभाग व पोलिसांचे मत घेऊन लॉकडाऊन केला.

कल्याण : केडीएमसी हद्दीत लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या स्थिरावली आहे. लॉकडाऊन केले नसते तर कदाचित जास्त रुग्णसंख्या असती. मात्र, लॉकडाऊन पुन्हा वाढवायचे की नाही, याबाबत केडीएमसीने अद्याप निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, सर्वसामान्यांकडून लॉकडाऊनला तीव्र विरोध होत आहे.अनलॉक-१ मध्ये नागरिक अनावश्यक फिरू लागल्याने दिवसाला ६०० पेक्षा जास्त रुग्ण आढळू लागले. त्यासाठी केडीएमसीने आरोग्य विभाग व पोलिसांचे मत घेऊन लॉकडाऊन केला. मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, लॉकडाऊन वाढविल्याने रुग्णसंख्या ४५० ते ५०० च्या दरम्यान स्थिरावली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास प्राधान्य आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनची पहिली घोषणा ठाणे महापालिकेने केली होती. लॉकडाऊनची मुदतही ठामपाने वाढवली. केडीएमसीने त्याचे अनुकरण केले. त्यामुळे ठामपा आता काय निर्णय घेते, याकडे केडीएमसी लक्ष ठेवून आहे.लॉकडाऊनची मुदत १९ जुलैपर्यंत आहे. २० जुलैपासून रिक्षाचालकांना शहरात रिक्षा चालविण्यास परवानगी द्यावी.- प्रकाश पेणकर, अध्यक्ष, कोकण विभागीय रिक्षा-टॅक्सी महासंघलॉकडाऊनमुळे लक्ष्मी भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मनपाने चार महिन्यांपासून दुकाने उघडू दिलेली नाही. आयुक्तांकडे मागणी करूनही त्यांनी दखल घेतली नाही. अन्नधान्य मार्केटला मुभा दिली जाते, मात्र भाजीविक्रेत्यांना परवानगी दिली जात नाही. त्यामुळे आमच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे.- मोहन नाईक, पदाधिकारी,भाजीविक्रेता संघटना

टॅग्स :kalyanकल्याण