शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

ठाण्यामुळे वाढला कल्याण, डोंबिवलीचा लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:54 IST

अनलॉक-१ मध्ये नागरिक अनावश्यक फिरू लागल्याने दिवसाला ६०० पेक्षा जास्त रुग्ण आढळू लागले. त्यासाठी केडीएमसीने आरोग्य विभाग व पोलिसांचे मत घेऊन लॉकडाऊन केला.

कल्याण : केडीएमसी हद्दीत लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या स्थिरावली आहे. लॉकडाऊन केले नसते तर कदाचित जास्त रुग्णसंख्या असती. मात्र, लॉकडाऊन पुन्हा वाढवायचे की नाही, याबाबत केडीएमसीने अद्याप निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, सर्वसामान्यांकडून लॉकडाऊनला तीव्र विरोध होत आहे.अनलॉक-१ मध्ये नागरिक अनावश्यक फिरू लागल्याने दिवसाला ६०० पेक्षा जास्त रुग्ण आढळू लागले. त्यासाठी केडीएमसीने आरोग्य विभाग व पोलिसांचे मत घेऊन लॉकडाऊन केला. मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, लॉकडाऊन वाढविल्याने रुग्णसंख्या ४५० ते ५०० च्या दरम्यान स्थिरावली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास प्राधान्य आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनची पहिली घोषणा ठाणे महापालिकेने केली होती. लॉकडाऊनची मुदतही ठामपाने वाढवली. केडीएमसीने त्याचे अनुकरण केले. त्यामुळे ठामपा आता काय निर्णय घेते, याकडे केडीएमसी लक्ष ठेवून आहे.लॉकडाऊनची मुदत १९ जुलैपर्यंत आहे. २० जुलैपासून रिक्षाचालकांना शहरात रिक्षा चालविण्यास परवानगी द्यावी.- प्रकाश पेणकर, अध्यक्ष, कोकण विभागीय रिक्षा-टॅक्सी महासंघलॉकडाऊनमुळे लक्ष्मी भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मनपाने चार महिन्यांपासून दुकाने उघडू दिलेली नाही. आयुक्तांकडे मागणी करूनही त्यांनी दखल घेतली नाही. अन्नधान्य मार्केटला मुभा दिली जाते, मात्र भाजीविक्रेत्यांना परवानगी दिली जात नाही. त्यामुळे आमच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे.- मोहन नाईक, पदाधिकारी,भाजीविक्रेता संघटना

टॅग्स :kalyanकल्याण