शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Lockdown: उद्योजक, व्यापारी नाराज; कोरोना नष्ट करताना आर्थिक पाया उखडण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 03:31 IST

कोरोनाला नियंत्रित करायचे आहे हे बरोबर आहे. परंतु कोरोना नष्ट करण्याच्या नादात आपण आपली अर्थव्यवस्था नष्ट करून बसणार असल्याची भीती उद्योजक, व्यापारी व्यक्त करीत आहेत

ठाणे : कोरोनामुळे झालेल्या तब्बल ७५ दिवसांच्या लॉकडाऊननंतर गेल्या २५ दिवसात उद्योग, व्यापार सावरण्यास सुरुवात झाली होती. ग्राहकांना दुकानात आकर्षित करण्याचे तर मजुरांना पुन्हा कामावर आणण्याचे प्रयत्न सुरु होते. परंतु महापालिकेने पुन्हा लॉकडाऊन जाहीर केल्याने त्याचे गंभीर परिणाम उद्योग आणि व्यापाऱ्यांना सोसावे लागणार आहेत.

लघु उद्योगांनी महापालिकेचा लॉकडाऊन अपरिहार्यतेतून स्वीकारला असला तरी व्यापाऱ्यांनी मात्र या निर्णयाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. मागील तीन महिने कोरोनामुळे उद्योग, व्यापार, मार्केट सर्वच बंद होते. जवळजवळ ७५ दिवसांच्या या लॉकडाऊनमध्ये सर्वाचेच हाल झाले. यातून उद्योजक किंवा व्यापारी किंवा साधा भाजी विक्रेताही सुटू शकलेला नाही. त्यानंतर २ जून पासून पहिला अनलॉक जाहीर करण्यात आला. सम आणि विषम तारखांना दुकाने सुरु झाली. त्यामुळे अडचण होत असली तरीही अपरिहार्यतेतून हा निर्णय मान्य केला. अत्यावश्यक सेवेतील उद्योगही सुरु झाले. सर्व काही सुरु होताच त्यांना वाढीव वीजबिलांचा शॉक बसला. यातून ते अद्यापही सावरु शकलेले नाहीत. ही बिले कशी भरायची असा पेच त्यांना सतावत आहे. त्यात कामगारांचे पगार, दुकानाचे भाडे आणि ग्राहकांना आकर्षित करण्याचे आव्हान यातून त्यांना मार्ग काढत उद्योजक, व्यापारी पायावर उभे रहात असताना महापालिकेने पुन्हा १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्याने पुन्हा सर्व अडखळले आहेत. मागील २५ दिवसात ग्राहक फारसे फिरकले नाहीत. परंतु कामावर असलेल्या कामगारांचे पगार, वीजबील आणि दुकानाचे भाडे कसे द्यायचे, या विंवचनेत ठाण्यातील व्यापारी आहे. लघु उद्योजकही ट्रान्सपोर्ट खर्च वाढल्याने आणि वीजबिलामुळे मेटाकुटीला आले आहेत. परंतु लॉकडाऊन आल्याने आता कसे करायचे, असा पेच त्यांच्याही समोर आहे.

कोरोनाला नियंत्रित करायचे आहे हे बरोबर आहे. परंतु कोरोना नष्ट करण्याच्या नादात आपण आपली अर्थव्यवस्था नष्ट करून बसणार असल्याची भीती उद्योजक, व्यापारी व्यक्त करीत आहेत. लॉकडाऊन म्हणजे पुन्हा पोलिसी राज, दंडेली. छोट्या कारणाकरिता दंडवसुलीचा बडगा किंवा भ्रष्टाचार. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये काही कर्मचाºयांचे फावते. त्याचा व्यापारी व उद्योजकांना जाच होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.लॉकडाऊनमुळे कोरोनाचा नायनाट झाला तर सगळ्यांच्या दृष्टीने ती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे लोकांच्या वावरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्याचे स्वागत आहे. जे कारखाने सध्या सुरू आहेत, ते सुरुच राहणार आहेत. हा प्रशासनाचा निर्णय योग्य, परंतु कामगाराला कामाच्या ठिकाणी येताच आले नाही, तर अडचण येईल. - डॉ. अप्पासाहेब खांबेटे, अध्यक्ष, लघु उद्योग संघटना, ठाणे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस