शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

Lockdown: उद्योजक, व्यापारी नाराज; कोरोना नष्ट करताना आर्थिक पाया उखडण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 03:31 IST

कोरोनाला नियंत्रित करायचे आहे हे बरोबर आहे. परंतु कोरोना नष्ट करण्याच्या नादात आपण आपली अर्थव्यवस्था नष्ट करून बसणार असल्याची भीती उद्योजक, व्यापारी व्यक्त करीत आहेत

ठाणे : कोरोनामुळे झालेल्या तब्बल ७५ दिवसांच्या लॉकडाऊननंतर गेल्या २५ दिवसात उद्योग, व्यापार सावरण्यास सुरुवात झाली होती. ग्राहकांना दुकानात आकर्षित करण्याचे तर मजुरांना पुन्हा कामावर आणण्याचे प्रयत्न सुरु होते. परंतु महापालिकेने पुन्हा लॉकडाऊन जाहीर केल्याने त्याचे गंभीर परिणाम उद्योग आणि व्यापाऱ्यांना सोसावे लागणार आहेत.

लघु उद्योगांनी महापालिकेचा लॉकडाऊन अपरिहार्यतेतून स्वीकारला असला तरी व्यापाऱ्यांनी मात्र या निर्णयाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. मागील तीन महिने कोरोनामुळे उद्योग, व्यापार, मार्केट सर्वच बंद होते. जवळजवळ ७५ दिवसांच्या या लॉकडाऊनमध्ये सर्वाचेच हाल झाले. यातून उद्योजक किंवा व्यापारी किंवा साधा भाजी विक्रेताही सुटू शकलेला नाही. त्यानंतर २ जून पासून पहिला अनलॉक जाहीर करण्यात आला. सम आणि विषम तारखांना दुकाने सुरु झाली. त्यामुळे अडचण होत असली तरीही अपरिहार्यतेतून हा निर्णय मान्य केला. अत्यावश्यक सेवेतील उद्योगही सुरु झाले. सर्व काही सुरु होताच त्यांना वाढीव वीजबिलांचा शॉक बसला. यातून ते अद्यापही सावरु शकलेले नाहीत. ही बिले कशी भरायची असा पेच त्यांना सतावत आहे. त्यात कामगारांचे पगार, दुकानाचे भाडे आणि ग्राहकांना आकर्षित करण्याचे आव्हान यातून त्यांना मार्ग काढत उद्योजक, व्यापारी पायावर उभे रहात असताना महापालिकेने पुन्हा १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्याने पुन्हा सर्व अडखळले आहेत. मागील २५ दिवसात ग्राहक फारसे फिरकले नाहीत. परंतु कामावर असलेल्या कामगारांचे पगार, वीजबील आणि दुकानाचे भाडे कसे द्यायचे, या विंवचनेत ठाण्यातील व्यापारी आहे. लघु उद्योजकही ट्रान्सपोर्ट खर्च वाढल्याने आणि वीजबिलामुळे मेटाकुटीला आले आहेत. परंतु लॉकडाऊन आल्याने आता कसे करायचे, असा पेच त्यांच्याही समोर आहे.

कोरोनाला नियंत्रित करायचे आहे हे बरोबर आहे. परंतु कोरोना नष्ट करण्याच्या नादात आपण आपली अर्थव्यवस्था नष्ट करून बसणार असल्याची भीती उद्योजक, व्यापारी व्यक्त करीत आहेत. लॉकडाऊन म्हणजे पुन्हा पोलिसी राज, दंडेली. छोट्या कारणाकरिता दंडवसुलीचा बडगा किंवा भ्रष्टाचार. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये काही कर्मचाºयांचे फावते. त्याचा व्यापारी व उद्योजकांना जाच होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.लॉकडाऊनमुळे कोरोनाचा नायनाट झाला तर सगळ्यांच्या दृष्टीने ती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे लोकांच्या वावरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्याचे स्वागत आहे. जे कारखाने सध्या सुरू आहेत, ते सुरुच राहणार आहेत. हा प्रशासनाचा निर्णय योग्य, परंतु कामगाराला कामाच्या ठिकाणी येताच आले नाही, तर अडचण येईल. - डॉ. अप्पासाहेब खांबेटे, अध्यक्ष, लघु उद्योग संघटना, ठाणे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस