शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

उल्हासनगरात वाढत्या कोरोना रूग्णामुळे लाॅकडाऊन; व्यापारी संघटनेस राजकीय नेत्यांचा विरोध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 18:25 IST

उल्हासनगरात लॉकडाऊनच्या दरम्यान कोरोना रुग्णाची संख्या वाढली असून कोरोनाची संख्या ५ हजार पार झाली.

उल्हासनगर : साथरोग तंज्ञाचा सल्लाने नव्हेतर, कोरोना रूग्णाच्या वाढत्या संख्येमुळे लॉकडाऊनचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला. सततच्या लॉकडाऊनला व्यापारी संघटनेसह राजकीय नेते विरोध करीत असून लोकडाऊन दरम्यान महापालिकेने काय उपाययोजना केल्या? असा प्रश्न विचारला जात आहे. 

उल्हासनगरात लॉकडाऊनच्या दरम्यान कोरोना रुग्णाची संख्या वाढली असून कोरोनाची संख्या ५ हजार पार झाली. सततच्या लॉक डाऊनमुळे व्यापारी, नागरिकांवर उपासमारीची वेळ आली असून रूग्णांना ब्रेक लागण्या ऐवजी रुग्णाची संख्या वाढल्याची टीका महापालिका आयुक्तावर होत आहे. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २ ते १२ जुलै दरम्यान महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी कोणालाही विश्वासात न घेता लॉकडाऊन जाहीर केला. त्यावेळी व्यापारी संघटनेने एक आठवडा लॉकडाऊन करा. असे पत्र आयुक्तांना दिले होते. तर इतर पक्षांच्या नेत्यांनी सहकार्याची भावना व्यक्त केली. मात्र भाजपने लॉकडाऊन कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचा उपाय नव्हे, असे ठणकावून सांगितले होते. लॉक डाऊन च्या १० दिवसात कोरोना रूग्णांना ब्रेक लागण्या ऐवजी तब्बल २ हजार रुग्ण वाढले. 

महापालिका आयुक्तांनी लॉकडाऊन दरम्यान काहीएक उपाययोजना केली नाही. असा आरोप सर्वस्तरातून होत असताना, आयुक्तांनी साथरोग तंज्ञाचा सल्ला विचारात न घेता १२ ते २२ जुलै दरम्यान लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय कसा? असा प्रश्न व्यापारी संघटना, भाजप, मनसे, रीपाइ यांच्यासह कामगार, नागरिक करीत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संख्येला लॉकडाऊन पर्याय होऊ शकत नसुन लॉकडाऊन मुळे व्यापारी, कामगार, नागरिकांवर उपासमारीची वेळ आल्याचे बोलले जात आहे. लॉकडाऊन विरोध असल्याचे निवेदन पालिका आयुक्तांना दिल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी दिली. 

व्यापारी केंद्र असलेल्या शहरात सततच्या लाॅकडाऊन मुळे व्यवसायावर अवकळा आली असून व्यापाऱ्यास ह नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. लॉकडाऊन कोरोना संख्येवर उपाययोजना होऊ शकत नाही. आयुक्तांनी कोरो नाचा प्रभाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याची गरज आहे.- राजेश वधारिया, स्थायी समिती सभापती

शहरात कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी व्यापारी संघटनेने स्वतःहून महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते. मात्र नंतर कोणालाही विश्वासात न घेता आयुक्तांनी लॉकडाऊन जाहीर केला. पहिल्या लॉकडाऊन दरम्यान आयुक्तांनी काय उपाययोजना केल्या, रुग्णाची संख्या कमी होण्या ऐवजी वाढली कशी?. याबाबत माहिती दिली नाही. व्यापारी संघटनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन देऊन लॉकडाऊन उठविण्याची मागणी केली.-  सुमित चक्रवर्ती, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेulhasnagarउल्हासनगर