शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

उल्हासनगरात वाढत्या कोरोना रूग्णामुळे लाॅकडाऊन; व्यापारी संघटनेस राजकीय नेत्यांचा विरोध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 18:25 IST

उल्हासनगरात लॉकडाऊनच्या दरम्यान कोरोना रुग्णाची संख्या वाढली असून कोरोनाची संख्या ५ हजार पार झाली.

उल्हासनगर : साथरोग तंज्ञाचा सल्लाने नव्हेतर, कोरोना रूग्णाच्या वाढत्या संख्येमुळे लॉकडाऊनचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला. सततच्या लॉकडाऊनला व्यापारी संघटनेसह राजकीय नेते विरोध करीत असून लोकडाऊन दरम्यान महापालिकेने काय उपाययोजना केल्या? असा प्रश्न विचारला जात आहे. 

उल्हासनगरात लॉकडाऊनच्या दरम्यान कोरोना रुग्णाची संख्या वाढली असून कोरोनाची संख्या ५ हजार पार झाली. सततच्या लॉक डाऊनमुळे व्यापारी, नागरिकांवर उपासमारीची वेळ आली असून रूग्णांना ब्रेक लागण्या ऐवजी रुग्णाची संख्या वाढल्याची टीका महापालिका आयुक्तावर होत आहे. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २ ते १२ जुलै दरम्यान महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी कोणालाही विश्वासात न घेता लॉकडाऊन जाहीर केला. त्यावेळी व्यापारी संघटनेने एक आठवडा लॉकडाऊन करा. असे पत्र आयुक्तांना दिले होते. तर इतर पक्षांच्या नेत्यांनी सहकार्याची भावना व्यक्त केली. मात्र भाजपने लॉकडाऊन कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचा उपाय नव्हे, असे ठणकावून सांगितले होते. लॉक डाऊन च्या १० दिवसात कोरोना रूग्णांना ब्रेक लागण्या ऐवजी तब्बल २ हजार रुग्ण वाढले. 

महापालिका आयुक्तांनी लॉकडाऊन दरम्यान काहीएक उपाययोजना केली नाही. असा आरोप सर्वस्तरातून होत असताना, आयुक्तांनी साथरोग तंज्ञाचा सल्ला विचारात न घेता १२ ते २२ जुलै दरम्यान लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय कसा? असा प्रश्न व्यापारी संघटना, भाजप, मनसे, रीपाइ यांच्यासह कामगार, नागरिक करीत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संख्येला लॉकडाऊन पर्याय होऊ शकत नसुन लॉकडाऊन मुळे व्यापारी, कामगार, नागरिकांवर उपासमारीची वेळ आल्याचे बोलले जात आहे. लॉकडाऊन विरोध असल्याचे निवेदन पालिका आयुक्तांना दिल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी दिली. 

व्यापारी केंद्र असलेल्या शहरात सततच्या लाॅकडाऊन मुळे व्यवसायावर अवकळा आली असून व्यापाऱ्यास ह नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. लॉकडाऊन कोरोना संख्येवर उपाययोजना होऊ शकत नाही. आयुक्तांनी कोरो नाचा प्रभाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याची गरज आहे.- राजेश वधारिया, स्थायी समिती सभापती

शहरात कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी व्यापारी संघटनेने स्वतःहून महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते. मात्र नंतर कोणालाही विश्वासात न घेता आयुक्तांनी लॉकडाऊन जाहीर केला. पहिल्या लॉकडाऊन दरम्यान आयुक्तांनी काय उपाययोजना केल्या, रुग्णाची संख्या कमी होण्या ऐवजी वाढली कशी?. याबाबत माहिती दिली नाही. व्यापारी संघटनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन देऊन लॉकडाऊन उठविण्याची मागणी केली.-  सुमित चक्रवर्ती, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेulhasnagarउल्हासनगर