शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
4
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
5
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
6
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
7
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
8
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
9
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
10
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
11
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
12
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
13
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
14
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
15
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
16
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
17
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
18
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
19
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
20
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

उल्हासनगरात वाढत्या कोरोना रूग्णामुळे लाॅकडाऊन; व्यापारी संघटनेस राजकीय नेत्यांचा विरोध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 18:25 IST

उल्हासनगरात लॉकडाऊनच्या दरम्यान कोरोना रुग्णाची संख्या वाढली असून कोरोनाची संख्या ५ हजार पार झाली.

उल्हासनगर : साथरोग तंज्ञाचा सल्लाने नव्हेतर, कोरोना रूग्णाच्या वाढत्या संख्येमुळे लॉकडाऊनचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला. सततच्या लॉकडाऊनला व्यापारी संघटनेसह राजकीय नेते विरोध करीत असून लोकडाऊन दरम्यान महापालिकेने काय उपाययोजना केल्या? असा प्रश्न विचारला जात आहे. 

उल्हासनगरात लॉकडाऊनच्या दरम्यान कोरोना रुग्णाची संख्या वाढली असून कोरोनाची संख्या ५ हजार पार झाली. सततच्या लॉक डाऊनमुळे व्यापारी, नागरिकांवर उपासमारीची वेळ आली असून रूग्णांना ब्रेक लागण्या ऐवजी रुग्णाची संख्या वाढल्याची टीका महापालिका आयुक्तावर होत आहे. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २ ते १२ जुलै दरम्यान महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी कोणालाही विश्वासात न घेता लॉकडाऊन जाहीर केला. त्यावेळी व्यापारी संघटनेने एक आठवडा लॉकडाऊन करा. असे पत्र आयुक्तांना दिले होते. तर इतर पक्षांच्या नेत्यांनी सहकार्याची भावना व्यक्त केली. मात्र भाजपने लॉकडाऊन कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचा उपाय नव्हे, असे ठणकावून सांगितले होते. लॉक डाऊन च्या १० दिवसात कोरोना रूग्णांना ब्रेक लागण्या ऐवजी तब्बल २ हजार रुग्ण वाढले. 

महापालिका आयुक्तांनी लॉकडाऊन दरम्यान काहीएक उपाययोजना केली नाही. असा आरोप सर्वस्तरातून होत असताना, आयुक्तांनी साथरोग तंज्ञाचा सल्ला विचारात न घेता १२ ते २२ जुलै दरम्यान लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय कसा? असा प्रश्न व्यापारी संघटना, भाजप, मनसे, रीपाइ यांच्यासह कामगार, नागरिक करीत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संख्येला लॉकडाऊन पर्याय होऊ शकत नसुन लॉकडाऊन मुळे व्यापारी, कामगार, नागरिकांवर उपासमारीची वेळ आल्याचे बोलले जात आहे. लॉकडाऊन विरोध असल्याचे निवेदन पालिका आयुक्तांना दिल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी दिली. 

व्यापारी केंद्र असलेल्या शहरात सततच्या लाॅकडाऊन मुळे व्यवसायावर अवकळा आली असून व्यापाऱ्यास ह नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. लॉकडाऊन कोरोना संख्येवर उपाययोजना होऊ शकत नाही. आयुक्तांनी कोरो नाचा प्रभाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याची गरज आहे.- राजेश वधारिया, स्थायी समिती सभापती

शहरात कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी व्यापारी संघटनेने स्वतःहून महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते. मात्र नंतर कोणालाही विश्वासात न घेता आयुक्तांनी लॉकडाऊन जाहीर केला. पहिल्या लॉकडाऊन दरम्यान आयुक्तांनी काय उपाययोजना केल्या, रुग्णाची संख्या कमी होण्या ऐवजी वाढली कशी?. याबाबत माहिती दिली नाही. व्यापारी संघटनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन देऊन लॉकडाऊन उठविण्याची मागणी केली.-  सुमित चक्रवर्ती, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेulhasnagarउल्हासनगर