शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

स्थानिकांनी मर्यादा सांभाळून बोलायला हवे, नरेश म्हस्के यांचा केळकर यांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 08:59 IST

दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील: प्रताप सरनाईक

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: शिवसेना असेल किंवा भाजपचे असतील त्यानुसार ज्येष्ठ नेते जेव्हा निर्णय घेतात, तेव्हा आमच्यासारख्या गल्लीतील नेत्यांनी आपल्या मर्यादा ओळखायला हव्यात आणि त्या मर्यादा सांभाळून बोलायला हवे, असा सल्ला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांना दिला आहे. आज सत्तेचा फायदा अनेकांना झालेला असून, रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री झाल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

रविवारी ठाण्यात भाजपच्या वतीने आयोजित मेळाव्यात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाणे आणि कल्याण भाजपचाच असल्याचा दावा केला होता. त्यानंतर यावर म्हस्के यांनी मत व्यक्त केले आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे तरुण खासदार आहेत, हजारो, करोडो रुपयांची कामे त्यांनी त्यांच्या मतदारसंघात केली आहेत, रेल्वेचे प्रश्न मार्गी लावले आहेत. आपले मुख्यमंत्री असताना टीका करणाऱ्यांनी आपल्या मतदारसंघात काय केले? याचे उत्तर द्यावे, असा टोलाही त्यांनी चव्हाण यांचे नाव न घेता लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या १० महिन्यांपासून केलेली कामे आणि आलेली सत्ता या गोष्टी बहुतेक केळकर यांना पटलेल्या दिसत नाहीत, त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून नेहमी हे दिसून येत असल्याचेही ते म्हणाले. परंतु, केळकर यांचे बोलणे फारसे गांभीर्याने घेणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले.

दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील : सरनाईक

सन २०१९ ला लोकसभा निवडणुकीत कल्याण आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. तेव्हा सेना - भाजप युतीचे मिळून ४२ खासदार राज्यातून लोकसभेत गेले होते. त्यामुळे यावर भाष्य करणे उचित होणार नसल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. यावर दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. त्यावर स्थानिक पातळीवर कोणीही कुरघोडी करणे अयोग्य असल्याचे मत सरनाईक यांनी व्यक्त केले. ठाण्यातील नालेसफाई तसेच रस्त्यांची कामे याबाबत सरनाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. दरम्यान, मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल त्यांनी थेट बोलणे टाळले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मी ३० वर्षांपासून काम करत आहे. ते दिलेला शब्द पाळणारे व्यक्तिमत्व आहे, परिणामी दिलेला शब्द ते पाळतील, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाpratap sarnaikप्रताप सरनाईक