शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

रेल्वे दुर्गांनी आणली ‘जीवनवाहिनी’त जान, महिला प्रवाशांची लगबग वाढली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 10:09 IST

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना राज्य सरकार व रेल्वेनी सर्वप्रथम प्रवासाची मुभा दिल्याने डॉक्टर, परिचारिका, सरकारी महिला कर्मचारी आदींना प्रवासाची परवानगी होती. मात्र त्याची संख्या एकूण लक्षावधी प्रवाशांच्या तुलनेत मर्यादीत होती.

डोंबिवली : मुंबईच्या जीवनवाहिनीला लटकून प्रवास करणाऱ्या ‘दुर्गां’ना तब्बल सात महिन्यांनंतर ऐन नवरात्रात रेल्वे प्रवासाची अनुमती मिळाल्याने बुधवारी रेल्वेस्थानकावरील तिकीट खिडक्यांवर आणि फलाटावर महिलांची लगबग दिसली. महिला लोकलची संख्या वाढवण्याची मागणी करणाऱ्या महिलांनाच फक्त प्रवासाची मुभा असल्याने पुरुषांच्या मोकळ्या डब्यातूनही काही महिलांनी प्रवास केला. मात्र सकाळी ११ नंतर आणि सायंकाळी सात नंतर प्रवासाची असलेली बंधने अन्यायकारक असल्याची तक्रार अनेक महिला प्रवाशांनी केली.अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना राज्य सरकार व रेल्वेनी सर्वप्रथम प्रवासाची मुभा दिल्याने डॉक्टर, परिचारिका, सरकारी महिला कर्मचारी आदींना प्रवासाची परवानगी होती. मात्र त्याची संख्या एकूण लक्षावधी प्रवाशांच्या तुलनेत मर्यादीत होती. मात्र आता सरसकट सर्व महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी दिली गेल्याने खासगी क्षेत्रातील काही महिला कर्मचाऱ्यांचा अत्यंत कंटाळवाणा, त्रासदायक बस प्रवास संपला आहे. तो आनंद आणि रेल्वे प्रवासातील मैत्रिणी भेटल्याचा आनंद यामुळे महिलांच्या डब्यात सोशल डिस्टन्सिंग राखूनही प्रवासाचा आनंद घेताना महिला, मुली बुधवारी, पहिल्या दिवशी दिसत होत्या. नवरात्रीत वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या, ड्रेस परिधान करण्याची प्रथा असल्याने बुधवारी निळ्या रंगाची निळाई डब्याडब्यात दिसत होती. रेल्वे डब्यात सेल्फी घेण्यात येत होते, ग्रुप फोटोही काढले जात होते.

गुलाबपुष्प देऊन महिलांचे केले स्वागतडोंबिवली पश्चिमेतील रेल्वे तिकीट खिडकीपाशी सकाळी ११ नंतर महिलांनी गर्दी केली होती. सकाळी ११ ते १२ पर्यंत ही गर्दी होती. पहिला दिवस असल्याने कमी गर्दी होती, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महिलांंनी सांगितले की, गेल्या सात महिन्यांत कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्याकरिता सकाळी पाण्याच्या वेळात झटपट काम करण्याची सवय सुटली आहे. इतके दिवस घरी असल्याने हळूहळू कामे करण्याची सवय लागली होती. मात्र, यापुढे ही सवय झटकून पटापट निघावे लागेल, असे मत महिलांनी व्यक्त केले. अंबरनाथ, बदलापूर व अन्य काही रेल्वेस्थानकांवर महिलांचे गुलाब देऊन स्वागत करण्यात आले. घरकाम करणाऱ्या काही महिला या आंबिवली, शहाड, विठ्ठलवाडी भागातून डोंबिवलीत येतात. नवी मुंबई, ठाणे, कुर्ला तसेच पश्चिम रेल्वेने त्या भागात जाणाऱ्या आणि कल्याण, डोंबिवली येथून जाणाऱ्या काही महिलांनी सकाळची रेल्वेची वेळ प्रवासाला योग्य असल्याचे म्हटले. मात्र काही महिलांनी एक-दीडच्या सुमारास कामावर पोहोचणाऱ्या महिला रात्री कामावरून सुटणार कधी आणि परत येताना सहप्रवासी नसल्यास सुरक्षेचे काय, असे सवाल उपस्थित केले.वेळेच्या बंधनावर नाराजीमहिलांना रेल्वे प्रवासाकरिता सकाळी ११ ते दुपारी ३ तसेच संध्याकाळी ७ वाजल्यानंतर मुभा दिली. परंतु, अनेक महिलांची कार्यालयीन वेळ ही ११ किंवा त्या अगोदरची असल्याने त्यांना या निर्णयाचा लाभ होत नाही. महिलांना सेकंड शिफ्टकरिता या अनुमतीचा लाभ होणार आहे. सकाळी ८ ते ८.३० वाजता सर्व महिला प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी महिला प्रवाशांनी केली. महिला प्रवाशांना परवानगी देताना कामाच्या वेळा बदलण्याची चर्चा राज्य सरकार व रेल्वे प्रशासनाने केली होती. मात्र वेळेच्या मर्यादा जाहीर केल्याने अनेक महिलांना या परवानगीचा लाभ होणार नाही. 

सामान्य महिला रेल्वे प्रवाशांना प्रवासाची परवानगी देण्याकरिता बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत प्रवासाची वेळ बदलावी, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली होती. परंतु, आणखी काही काळ थांबा, आठवड्यानंतर बघू, असे उत्तर राज्य शासनाच्या आपत्कालीन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यामुळे येत्या पंधरवड्यात महिलांचा प्रतिसाद पाहून प्रवासाच्या वेळेबाबत निर्णय होईल.- ॲॅड. आदेश भगत, अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना

महिलांकरिता रेल्वे प्रवासाची सरसकट मुभा मिळाली ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. मात्र अकरानंतर प्रवासाची अट अनेक महिलांना त्रासदायक असून त्यामुळे अनेक महिला प्रवाशांची रस्ते मार्गे सध्या सुरु असलेल्या खडतर प्रवासातून तूर्त सुटका होणार नाही.-सायली जोशी, नोकरदार

महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी दिली हे चांगले आहे. तसेच वेळेचे बंधन घातल्याने विनाकारण कुणीही महिला, मुली प्रवास करायला बाहेर पडणार नाहीत. शिफ्ट ड्युटी करणाऱ्यांना ही वेळ सोयीची आहे.- शलाका सावंत, नोकरदार

 

टॅग्स :localलोकलrailwayरेल्वेthaneठाणे