शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

लोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 06:38 IST

मध्य,पश्चिम रेल्वेतून प्रवास करणाऱ्या ८० लाखांहून अधिक प्रवाशांपैकी दररोज सरासरी १२ जणांचा अपघाती मृत्यू होतो

डोंबिवली : मध्य,पश्चिम रेल्वेतून प्रवास करणाऱ्या ८० लाखांहून अधिक प्रवाशांपैकी दररोज सरासरी १२ जणांचा अपघाती मृत्यू होतो तर १५ जण जखमी होतात. हे प्रकार टाळण्याकरिता लोकलचे दरवाजे बंद होतील, अशी व्यवस्था करावी तसेच रेल्वेच्या फे-यांची संख्या वाढवावी, अशी शिफारस करणारा अहवाल ठाणे डिस्ट्रीक्ट रेल्वे पॅसेेंजर असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी रेल्वेमंत्री पीयुष गोयल आणि रेल्वे बोर्ड यांना पाठवला आहे.शर्मा म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर रेल्वे अपघातामधील मृत्यू जगात कुठेही होत नाहीत. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने बघावे. सातत्याने सूचना देऊनही रेल्वेच्या वृत्तीत मात्र कोणताही बदल होत नाहीत. अपघाताचे सत्र सुरूच आहे. संघटनेच्या सेफ्टी कमिटीने पाठवलेल्या अहवालानुसार, अपघात होणारे रेल्वे मार्गातील खांब त्वरित हटवावेत. लोकल फेºयांमधील अंतर कमी करून १० मिनिटांवर आणावे. कल्याण बदलापूर, कर्जत तसेच कल्याण आसनगाव, कसारा मार्गावर लोकल फेºया वाढवाव्यात. एक्स्प्रेस मेल रेल्वे गाड्यांच्या धर्तीवर उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या पास व तिकिटांवर विमा कवच मिळावे. रेल्वे रूळ ओलांडणाºयांवर कठोर कारवाई व्हावी आदी सूचना समितीने केल्या आहेत.अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, मृत प्रवाशांच्या वारसांना तातडीने भरपाई मिळावी, रेल्वे क्लेम ट्रिब्युनलची संख्या वाढवून प्रवाशांना दिलासा द्यावा. मुंबईची उपनगरीय सेवा लाइफलाइन म्हणून ओळखली जात होती. मात्र सध्या ती डेथलाइन झाली आहे हे योग्य नाही. मुंबईत सर्वसामान्यांचे अपघात कमी करून प्रवाशांचा सुरक्षा कवच द्यावे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :localलोकल