शहरं
Join us  
Trending Stories
1
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
2
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
3
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
4
थरार: भरझोपेत पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
5
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
6
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
7
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
8
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
9
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या
10
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
11
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
12
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
13
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
14
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
15
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
16
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
17
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
18
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
19
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
20
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी मानवी साखळी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 4:01 PM

भिवंडीत ठिकठिकाणी आंदोलन; असंख्य स्थानिक भूमिपुत्र आंदोलनात सहभागी

नितिन पंडीत

भिवंडी: नवी मुंबई येथील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावी अशी मागणी ठाणे , नवी मुंबई व रायगड जिल्ह्यासह इतरही अन्य ठिकाणच्या स्थानिक भूमीपुत्रांनी लावून धरली आहे. दिबांच्या नामकरण संघर्ष समितीच्या मागणीकडे राज्यसरकार सकारात्म नसल्याने गुरुवार १० जून रोजी ठाणे जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र सकाळी ११ ते १२ या एका तासात ठिकठिकाणी मानवी साखळी आंदोलन करणार असल्याचा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला होता. 

संघर्ष समितीच्या इशाऱ्यानंतर गुरुवारी भिवंडीत सकाळी ११ ते १२ या वेळेत ठिकठिकाणी संघर्ष समिती व स्थानिक भूमीपुत्रांनी नवी मुंबई विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी मानवी साखळी आंदोलन केले. भिवंडीत कोनगाव ते रांजनोली नाका तसेच रांजनोली नाका ते मानकोली तसेच मानकोली ते खारेगाव टोल नाका अशी सुमारे १५ ते २० किलोमीटर पर्यंत भव्य मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. तर अंजुरफाटा ते राहनाल काल्हेर , कशेळी या मार्गावर देखील मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर भिवंडी बायपास ते येवई नाका ते सावद नाका या मार्गावर देखील भव्य मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या मानवी साखळी आंदोलनात कोनगाव, गोवे, पिंपळघर , रांजनोली , पिंपळास , ओवळी, पूर्णा, राहनाल, दापोडा, गुंदवली, हायवे दिवे, शेलार, आमने परिसर, येवई नाका, राहनाल, खारबाव अशा अनेक गावांमधील स्थानिक भूमिपुत्र सहभागी झाले होते. 

या आंदोलनादरम्यान ठिकठिकाणी पावसाने देखील हजेरी लावली होती मात्र त्यास न जुमानता स्थानिक भूमीपुत्रांनी शांततेत हे आंदोलन पार पडले . शासकीय नियमांचे पालन करून हे आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमिनी आमच्या मग नाव का तुमचा, आता आमचा निर्धार ठाम, विमानतळाला दिबांचेच नाव, नवी मुंबई विमानतळाला स्व लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, खात्री पक्की, दिबांचं नाव नक्की अशा आशयाचे फलक हातात घेत आंदोलन कर्त्यांनी शांततेत हे आंदोलन केले. जोपर्यंत दिबांचे नाव विमानतळाला देत नाहीत तो पर्यंत अशा प्रकारे नियमित आंदोलन करण्यात येतील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी या आंदोलनातून व्यक्त केली.