शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी मानवी साखळी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 16:01 IST

भिवंडीत ठिकठिकाणी आंदोलन; असंख्य स्थानिक भूमिपुत्र आंदोलनात सहभागी

नितिन पंडीत

भिवंडी: नवी मुंबई येथील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावी अशी मागणी ठाणे , नवी मुंबई व रायगड जिल्ह्यासह इतरही अन्य ठिकाणच्या स्थानिक भूमीपुत्रांनी लावून धरली आहे. दिबांच्या नामकरण संघर्ष समितीच्या मागणीकडे राज्यसरकार सकारात्म नसल्याने गुरुवार १० जून रोजी ठाणे जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र सकाळी ११ ते १२ या एका तासात ठिकठिकाणी मानवी साखळी आंदोलन करणार असल्याचा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला होता. 

संघर्ष समितीच्या इशाऱ्यानंतर गुरुवारी भिवंडीत सकाळी ११ ते १२ या वेळेत ठिकठिकाणी संघर्ष समिती व स्थानिक भूमीपुत्रांनी नवी मुंबई विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी मानवी साखळी आंदोलन केले. भिवंडीत कोनगाव ते रांजनोली नाका तसेच रांजनोली नाका ते मानकोली तसेच मानकोली ते खारेगाव टोल नाका अशी सुमारे १५ ते २० किलोमीटर पर्यंत भव्य मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. तर अंजुरफाटा ते राहनाल काल्हेर , कशेळी या मार्गावर देखील मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर भिवंडी बायपास ते येवई नाका ते सावद नाका या मार्गावर देखील भव्य मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या मानवी साखळी आंदोलनात कोनगाव, गोवे, पिंपळघर , रांजनोली , पिंपळास , ओवळी, पूर्णा, राहनाल, दापोडा, गुंदवली, हायवे दिवे, शेलार, आमने परिसर, येवई नाका, राहनाल, खारबाव अशा अनेक गावांमधील स्थानिक भूमिपुत्र सहभागी झाले होते. 

या आंदोलनादरम्यान ठिकठिकाणी पावसाने देखील हजेरी लावली होती मात्र त्यास न जुमानता स्थानिक भूमीपुत्रांनी शांततेत हे आंदोलन पार पडले . शासकीय नियमांचे पालन करून हे आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमिनी आमच्या मग नाव का तुमचा, आता आमचा निर्धार ठाम, विमानतळाला दिबांचेच नाव, नवी मुंबई विमानतळाला स्व लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, खात्री पक्की, दिबांचं नाव नक्की अशा आशयाचे फलक हातात घेत आंदोलन कर्त्यांनी शांततेत हे आंदोलन केले. जोपर्यंत दिबांचे नाव विमानतळाला देत नाहीत तो पर्यंत अशा प्रकारे नियमित आंदोलन करण्यात येतील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी या आंदोलनातून व्यक्त केली.