शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
4
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
5
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
6
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
7
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
9
Viral Video: लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
10
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
11
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
12
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम
13
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
14
पैशाचा खेळ! ऑनलाईन सेलचं धक्कादायक सत्य; घाईत महागड्या वस्तुंची खरेदी, बेस्ट डील कोणती?
15
GST कपात व्यतिरिक्त नवीन गाडी घेताना १५ हजारांची करा बचत! खरेदी करण्यापूर्वी वापरा 'या' ५ स्मार्ट टिप्स!
16
इस्रायलवर भारताचे मोठे उपकार! १०० वर्षांनी समोर आलं 'हाइफा' शहराच्या इतिहासातील सत्य, काय घडलं?
17
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
18
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
19
Rakhi Sawant : Video - "डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
20
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी मानवी साखळी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 16:01 IST

भिवंडीत ठिकठिकाणी आंदोलन; असंख्य स्थानिक भूमिपुत्र आंदोलनात सहभागी

नितिन पंडीत

भिवंडी: नवी मुंबई येथील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावी अशी मागणी ठाणे , नवी मुंबई व रायगड जिल्ह्यासह इतरही अन्य ठिकाणच्या स्थानिक भूमीपुत्रांनी लावून धरली आहे. दिबांच्या नामकरण संघर्ष समितीच्या मागणीकडे राज्यसरकार सकारात्म नसल्याने गुरुवार १० जून रोजी ठाणे जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र सकाळी ११ ते १२ या एका तासात ठिकठिकाणी मानवी साखळी आंदोलन करणार असल्याचा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला होता. 

संघर्ष समितीच्या इशाऱ्यानंतर गुरुवारी भिवंडीत सकाळी ११ ते १२ या वेळेत ठिकठिकाणी संघर्ष समिती व स्थानिक भूमीपुत्रांनी नवी मुंबई विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी मानवी साखळी आंदोलन केले. भिवंडीत कोनगाव ते रांजनोली नाका तसेच रांजनोली नाका ते मानकोली तसेच मानकोली ते खारेगाव टोल नाका अशी सुमारे १५ ते २० किलोमीटर पर्यंत भव्य मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. तर अंजुरफाटा ते राहनाल काल्हेर , कशेळी या मार्गावर देखील मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर भिवंडी बायपास ते येवई नाका ते सावद नाका या मार्गावर देखील भव्य मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या मानवी साखळी आंदोलनात कोनगाव, गोवे, पिंपळघर , रांजनोली , पिंपळास , ओवळी, पूर्णा, राहनाल, दापोडा, गुंदवली, हायवे दिवे, शेलार, आमने परिसर, येवई नाका, राहनाल, खारबाव अशा अनेक गावांमधील स्थानिक भूमिपुत्र सहभागी झाले होते. 

या आंदोलनादरम्यान ठिकठिकाणी पावसाने देखील हजेरी लावली होती मात्र त्यास न जुमानता स्थानिक भूमीपुत्रांनी शांततेत हे आंदोलन पार पडले . शासकीय नियमांचे पालन करून हे आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमिनी आमच्या मग नाव का तुमचा, आता आमचा निर्धार ठाम, विमानतळाला दिबांचेच नाव, नवी मुंबई विमानतळाला स्व लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, खात्री पक्की, दिबांचं नाव नक्की अशा आशयाचे फलक हातात घेत आंदोलन कर्त्यांनी शांततेत हे आंदोलन केले. जोपर्यंत दिबांचे नाव विमानतळाला देत नाहीत तो पर्यंत अशा प्रकारे नियमित आंदोलन करण्यात येतील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी या आंदोलनातून व्यक्त केली.