शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
3
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
4
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
6
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
7
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
8
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
9
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
11
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
12
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
13
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
14
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
15
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
16
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
17
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
18
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 
19
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
20
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही

सूर्याच्या पाण्यासाठी स्थानिक एकवटले

By admin | Published: May 03, 2017 5:13 AM

सूर्या नदीचे पाणी वसई-विरार, मीरा-भाईंदर व अन्य महानगरासाठी वळविण्यास जिल्ह्यातील तीन तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी प्रखर

हितेन नाईक/ निखिल मेस्त्री / पालघर/ नंडोरेसूर्या नदीचे पाणी वसई-विरार, मीरा-भाईंदर व अन्य महानगरासाठी वळविण्यास जिल्ह्यातील तीन तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी प्रखर विरोध दर्शविला असून ४ मे रोजी मासवण येथे निषेधाची सभाही आयोजिली आहे.नदी तीरावरील पालघर-डहाणू-विक्र्रमगड तालुक्यातील असंख्य गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. धरणाचे बहुतांश पाणी वसई-विरार व अन्य प्रकल्पक्षेत्राबाहेरील ठिकाणी वळविल्यामुळे प्रकल्पक्षेत्रातील तालुक्यांना पुढे सिंचनासाठीच नव्हे तर पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होणार नाही. सूर्याचे पाणी इतरत्र वळविल्यामुळे प्रकल्पक्षेत्रातील तालुक्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमिवर ४ मे रोजी सूर्या नदी तीरावरील मासवण येथे निषेध सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत तिन्ही तालुक्यातील शेतकरी व आदिवासी एकत्र जमून पाणी वळविण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणार आहेत. धामणी व कवडास धरणांचा सूर्य प्रकल्प हा पालघर-डहाणू-विक्रमगड या तीन तालुक्यांसाठी प्रामुख्याने उभारण्यात आला असून या प्रकल्पाअंतर्गत १४६८६ हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. १९७८ ते १९८० दरम्यान उभारण्यात आलेल्या या दोन्ही धरणातील पाणी साठा २९९.०१ दलघमी इतका आहे. या प्रकल्पाचे पाणी बिगरसिंचनासाठी पालघर व डहाणू या तालुक्याकरिता वापरण्यात येते आज या दोन्ही तालुक्यांना पिण्यासाठी ४० दलघमी इतके पाणी देण्यात आलेले आहे. याउलट प्रकल्प क्षेत्राबाहेर वसई-विरार, मीरा-भाईदर व मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाकरिता आजवर १८० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आलेले आहे. सिंचनासाठीच्या या प्रकल्पाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर हे पाणी या ठिकाणी वळविल्यामुळे १४६८६ हेक्टर सिंचन उद्दिष्टयापैकी ७०८१ हेक्टर जमीन सिंचनातून वगळली जाणार आहे. याचा मोठा फटका आदिवासी व शेतकरी बांधवाना बसणार आहे. परिणामी दुबार पिके घेणाऱ्या या आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन जाऊन त्यांना बेरोजगारी व पुढे कुपोषणाच्या गर्तेत ढकलले जाणार आहे.