शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

लिव्हरपूल स्टार्टअप परिषद : आयुक्त-महापौर वाद शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 04:18 IST

मागील काही महिन्यांपासून शिवसेना आणि प्रशासन यांच्यातील मैत्रीच्या सलोख्यात पुन्हा आयुक्त-महापौरांच्या वादाने ठिणगी पडली आहे.

ठाणे  - मागील काही महिन्यांपासून शिवसेना आणि प्रशासन यांच्यातील मैत्रीच्या सलोख्यात पुन्हा आयुक्त-महापौरांच्या वादाने ठिणगी पडली आहे. लिव्हरपूल, लंडन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बिझनेस फेस्टिव्हलमध्ये देशातील सर्वात मोठा स्टार्टअप प्रकल्प सादर करण्यास महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ऐनवेळी मंजुरी न दिल्याने संधी हुकली असल्याचा आरोप थेट आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पत्रक काढून केला आहे. यापूर्वी होणारे वाद हे चार भिंतीआड होत होते. परंतु, आता असे काय घडले की, आयुक्तांना थेट हे पत्रकच काढावे लागले, याचे कुतूहल मात्र वाढले आहे.ठाणे महापालिकेने केंद्र सरकारच्या स्टार्टअप प्रोग्राममध्ये सहभागी होऊन रुस्तमजी येथे स्टार्टअप संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, येथे सुमारे लाखभर रोजगार निर्माण होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. ब्रिटिश सरकारने येत्या १८ ते २२ तारखांच्या कालावधीत लिव्हरपूल, लंडन येथे आंतरराष्ट्रीय बिझनेस फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. त्यामध्ये महापालिका देशातील सर्वात मोठ्या स्टार्टअप प्रकल्पाचे प्रदर्शन मांडणार होती.महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना या प्रकल्पाविषयी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळणार होती. यासाठी एकूण ८.५० लाखांचा खर्च अपेक्षित होता. आयत्या वेळेचा विषय म्हणून तो महासभेसमोर पाठवला होता. त्यास मान्यता मिळाली नाही.यासंदर्भात महापालिका सचिव अशोक बुरपल्ले व उपायुक्त संदीप माळवी यांनी महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांना विनंती केली होती. परंतु, त्यांनी त्यास नकार दिल्याने आता या फेस्टिव्हलमधून बाहेर पडावे लागल्याचे प्रशासनाने प्रसिद्धिपत्रकात नमूद करून महापौरांनाच जबाबदार ठरवले आहे.याबाबत, महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, दोन दिवसांपूर्वी मला दोन अधिकारी भेटण्यास आले होते. मागील महिन्यात झालेल्या महासभेतील विषयात आयत्या वेळेचा विषय म्हणून या विषयाला तुम्ही मान्यता द्या, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु, २२ दिवस उलटल्यानंतर मी अशा प्रकारे या विषयाला कशी काय मंजुरी देणार, तसेच त्याला नुसती माझी मंजुरीच गरजेची नसून महासभेचीही मंजुरी हवी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील वर्षभरात आयत्यावेळच्या कोणत्याच विषयांना मंजुरी दिलेली नाही. त्यातही आयुक्तांना स्वत:ला २५ लाखांच्या खर्चाबाबत अधिकार आहेत, त्या अधिकारात ते मंजूर करून घेऊ शकले असते. यापूर्वीही मागील वर्षभरात आयुक्तांनी विदेश दौरे केले आहेत, त्यावेळी त्यांना कधी महासभेच्या मंजुरीची गरज भासली नव्हती का, असा सवाल महापौरांनी उपस्थित केला आहे.वादाचे कारण की...रस्टार्ट अप प्रकल्पाविषयी आंतरराष्टÑीय तज्ज्ञांसमोर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल सादरीकरण करणार होते.या सादरीकरणासाठी ८.५० लाखांचा खर्च अपेक्षित होता. त्या खर्चाला महासभेने मान्यता नाकारली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाnewsबातम्या