शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये साहित्य संमेलन?

By admin | Updated: April 25, 2016 03:05 IST

नाट्यसंमेलन ठाण्यात संपन्न झाल्यावर ९० वे अ.भा. साहित्यसंमेलन कल्याण-डोंबिवलीमध्ये व्हावे, याकरिता तेथील साहित्यिक, कवी, समीक्षक, ग्रंथालये यांनी कसून प्रयत्न सुरू केले

ठाणे : नाट्यसंमेलन ठाण्यात संपन्न झाल्यावर ९० वे अ.भा. साहित्यसंमेलन कल्याण-डोंबिवलीमध्ये व्हावे, याकरिता तेथील साहित्यिक, कवी, समीक्षक, ग्रंथालये यांनी कसून प्रयत्न सुरू केले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील असल्याने आणि साहित्य मंडळाचा कारभार विदर्भाकडे सोपवला जाणार असल्याने संमेलन विदर्भात घेण्याचा आग्रह तेथील साहित्य विश्वातून होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्याला मुख्यमंत्र्यांना बगल द्यायची असेल तर कल्याण-डोंबिवलीकरांचा दावा प्रबळ होऊ शकतो, अशी साहित्य वर्तुळात चर्चा आहे.महामंडळाची बैठक येत्या ३० एप्रिल रोजी नागपूर येथे होत असून त्यामध्ये ३१ मार्चपूर्वी संमेलनाकरिता आलेले एकमेव कल्याण-डोंबिवलीचे निमंत्रण स्वीकारायचे की, आणखी मुदत देऊन निमंत्रणे मागवायची, याचा निर्णय होणार आहे.कल्याण-डोंबिवलीमधील साहित्यिक गेली पाच वर्षे संमेलन आपल्याकडे व्हावे, याकरिता पाठपुरावा करीत आहेत. मात्र, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जे १७५ सदस्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड करतात, त्यामध्ये कल्याण-डोंबिवलीमधील केवळ हाताच्या बोटांवर मोजता येतील, एवढेच सदस्य आहेत. राज्यातील वेगवेगळ्या साहित्य परिषदा व संस्थांच्या सदस्यांची संख्या १३०० ते १४०० असून त्यामध्ये डोंबिवलीतील १८०, तर कल्याणमधील १८९ सदस्य आहेत. निर्णय प्रक्रियेत इतके कमी प्रतिनिधित्व दिले गेल्याने या सांस्कृतिक शहरांची डाळ शिजलेली नाही. मसापचे नवीन कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी अलीकडेच कल्याणला भेट दिली, तेव्हा साहित्यसंमेलन आयोजित करण्याची तयारी कल्याण सार्वजनिक वाचनालयाने व स्थानिक लेखक, कवी यांना दाखवली. जोशी यांनीही या प्रस्तावाचे स्वागत केले. मात्र, संमेलनाच्या आयोजनाची धुरा मिळवणे, तेवढी सोपी गोष्ट नाही.गेली तीन वर्षे साहित्य मंडळाचे कार्यालय पुण्याकडे होते. त्यामुळे ८९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद श्रीपाल सबनीस यांना मिळवून देण्यात शरद पवार व पश्चिम महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले. आता साहित्य मंडळाचे कार्यालय पुढील तीन वर्षांकरिता विदर्भात हलवण्यात येईल. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विदर्भातील देवेंद्र फडणवीस असताना साहजिकच विदर्भाकडे ९० व्या साहित्य संमेलनाची धुरा जावी, असा आग्रह तेथील साहित्यिकांकडून धरला जाणार, हे उघड आहे. त्यानंतर, साहित्य मंडळाची धुरा मराठवाडा व त्यानंतर मुंबईकडे येईल म्हणजे कल्याण-डोंबिवलीस संमेलनाकरिता पुन्हा किमान सहा वर्षे वाट पाहावी लागेल. (प्रतिनिधी)> गेली तीन वर्षे साहित्य मंडळाचे कार्यालय पुण्याकडे होते. त्यामुळे ८९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद श्रीपाल सबनीस यांना मिळवून देण्यात शरद पवार व पश्चिम महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले. आता पुढील तीन वर्षांकरिता कार्यालय विदर्भात हलवण्यात येईल. स्वतंत्र विदर्भाची मागणी व संमेलनात तसा ठराव आणण्याकरिता विदर्भातील साहित्यिकांचा रेटा टाळण्यासाठी खुद्द फडणवीस हेच कल्याण-डोंबिवलीच्या पारड्यात संमेलनाचे दान टाकू शकतात, असे स्थानिकांना वाटते. > साहित्यसंमेलनाच्या आयोजनाकरिता आतापर्यंत केवळ कल्याण-डोंबिवलीचा प्रस्ताव आला आहे. येत्या ३० एप्रिल रोजी नागपूर येथील बैठकीत हाच प्रस्ताव स्वीकारायचा की, आणखी काही प्रस्ताव मागवायचे, याचा निर्णय घेतला जाईल. कल्याणमधील वाचनालय गेली कित्येक वर्षे निष्ठेने काम करीत असून कल्याण-डोंबिवलीस साहित्यसंमेलनाच्या आयोजनाची संधी दिली गेली, तर तेथे निर्माण होणाऱ्या वाड्.मयीन वातावरणामुळे साहित्य चळवळीला निश्चित बळ मिळेल. - मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद