शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
3
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
4
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
5
IND vs WI : टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
6
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
7
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
8
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
9
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
10
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
11
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
12
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
13
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
14
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
15
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
16
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
20
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?

कल्याणमध्ये साहित्य संमेलन?

By admin | Updated: April 25, 2016 03:05 IST

नाट्यसंमेलन ठाण्यात संपन्न झाल्यावर ९० वे अ.भा. साहित्यसंमेलन कल्याण-डोंबिवलीमध्ये व्हावे, याकरिता तेथील साहित्यिक, कवी, समीक्षक, ग्रंथालये यांनी कसून प्रयत्न सुरू केले

ठाणे : नाट्यसंमेलन ठाण्यात संपन्न झाल्यावर ९० वे अ.भा. साहित्यसंमेलन कल्याण-डोंबिवलीमध्ये व्हावे, याकरिता तेथील साहित्यिक, कवी, समीक्षक, ग्रंथालये यांनी कसून प्रयत्न सुरू केले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील असल्याने आणि साहित्य मंडळाचा कारभार विदर्भाकडे सोपवला जाणार असल्याने संमेलन विदर्भात घेण्याचा आग्रह तेथील साहित्य विश्वातून होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्याला मुख्यमंत्र्यांना बगल द्यायची असेल तर कल्याण-डोंबिवलीकरांचा दावा प्रबळ होऊ शकतो, अशी साहित्य वर्तुळात चर्चा आहे.महामंडळाची बैठक येत्या ३० एप्रिल रोजी नागपूर येथे होत असून त्यामध्ये ३१ मार्चपूर्वी संमेलनाकरिता आलेले एकमेव कल्याण-डोंबिवलीचे निमंत्रण स्वीकारायचे की, आणखी मुदत देऊन निमंत्रणे मागवायची, याचा निर्णय होणार आहे.कल्याण-डोंबिवलीमधील साहित्यिक गेली पाच वर्षे संमेलन आपल्याकडे व्हावे, याकरिता पाठपुरावा करीत आहेत. मात्र, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जे १७५ सदस्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड करतात, त्यामध्ये कल्याण-डोंबिवलीमधील केवळ हाताच्या बोटांवर मोजता येतील, एवढेच सदस्य आहेत. राज्यातील वेगवेगळ्या साहित्य परिषदा व संस्थांच्या सदस्यांची संख्या १३०० ते १४०० असून त्यामध्ये डोंबिवलीतील १८०, तर कल्याणमधील १८९ सदस्य आहेत. निर्णय प्रक्रियेत इतके कमी प्रतिनिधित्व दिले गेल्याने या सांस्कृतिक शहरांची डाळ शिजलेली नाही. मसापचे नवीन कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी अलीकडेच कल्याणला भेट दिली, तेव्हा साहित्यसंमेलन आयोजित करण्याची तयारी कल्याण सार्वजनिक वाचनालयाने व स्थानिक लेखक, कवी यांना दाखवली. जोशी यांनीही या प्रस्तावाचे स्वागत केले. मात्र, संमेलनाच्या आयोजनाची धुरा मिळवणे, तेवढी सोपी गोष्ट नाही.गेली तीन वर्षे साहित्य मंडळाचे कार्यालय पुण्याकडे होते. त्यामुळे ८९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद श्रीपाल सबनीस यांना मिळवून देण्यात शरद पवार व पश्चिम महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले. आता साहित्य मंडळाचे कार्यालय पुढील तीन वर्षांकरिता विदर्भात हलवण्यात येईल. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विदर्भातील देवेंद्र फडणवीस असताना साहजिकच विदर्भाकडे ९० व्या साहित्य संमेलनाची धुरा जावी, असा आग्रह तेथील साहित्यिकांकडून धरला जाणार, हे उघड आहे. त्यानंतर, साहित्य मंडळाची धुरा मराठवाडा व त्यानंतर मुंबईकडे येईल म्हणजे कल्याण-डोंबिवलीस संमेलनाकरिता पुन्हा किमान सहा वर्षे वाट पाहावी लागेल. (प्रतिनिधी)> गेली तीन वर्षे साहित्य मंडळाचे कार्यालय पुण्याकडे होते. त्यामुळे ८९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद श्रीपाल सबनीस यांना मिळवून देण्यात शरद पवार व पश्चिम महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले. आता पुढील तीन वर्षांकरिता कार्यालय विदर्भात हलवण्यात येईल. स्वतंत्र विदर्भाची मागणी व संमेलनात तसा ठराव आणण्याकरिता विदर्भातील साहित्यिकांचा रेटा टाळण्यासाठी खुद्द फडणवीस हेच कल्याण-डोंबिवलीच्या पारड्यात संमेलनाचे दान टाकू शकतात, असे स्थानिकांना वाटते. > साहित्यसंमेलनाच्या आयोजनाकरिता आतापर्यंत केवळ कल्याण-डोंबिवलीचा प्रस्ताव आला आहे. येत्या ३० एप्रिल रोजी नागपूर येथील बैठकीत हाच प्रस्ताव स्वीकारायचा की, आणखी काही प्रस्ताव मागवायचे, याचा निर्णय घेतला जाईल. कल्याणमधील वाचनालय गेली कित्येक वर्षे निष्ठेने काम करीत असून कल्याण-डोंबिवलीस साहित्यसंमेलनाच्या आयोजनाची संधी दिली गेली, तर तेथे निर्माण होणाऱ्या वाड्.मयीन वातावरणामुळे साहित्य चळवळीला निश्चित बळ मिळेल. - मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद