शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिक बोलला की गोळ्या घालतात! राजन खान यांची स्पष्टोक्ती, सद्य:स्थितीवर केले मार्मिक भाष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 06:41 IST

देशात घडणाºया घटनांवर केवळ साहित्यिकांनीच भाष्य करावे असे नाही, तर शेतकºयांनी आणि समाजातील अन्य घटकांनीही बोलले पाहिजे. पण एखादा लेखक-साहित्यिक बोलला तर त्यांना गोळ््या घातल्या जातात, अशी परिस्थिती सध्या आहे, असे परखड मत साहित्यिक राजन खान यांनी रविवारी ‘लोकमत’कडे मांडले.

जान्हवी मोर्ये  कल्याण : देशात घडणाºया घटनांवर केवळ साहित्यिकांनीच भाष्य करावे असे नाही, तर शेतकºयांनी आणि समाजातील अन्य घटकांनीही बोलले पाहिजे. पण एखादा लेखक-साहित्यिक बोलला तर त्यांना गोळ््या घातल्या जातात, अशी परिस्थिती सध्या आहे, असे परखड मत साहित्यिक राजन खान यांनी रविवारी ‘लोकमत’कडे मांडले.जात पाळणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार असल्याचे समजणे हा आपला ढोंगीपणा आहे. ज्या देशात जात, धर्म आणि देव यांचे अवास्तव अवडंबर माजवले जाते, तो समाज आणइ या विषयावरील वाद मनोरुग्णतेचे लक्षण असते, अशी टीकाही त्यांनी मेधा खोले यांच्या सोवळ््याच्या प्रकरणावरून उठलेल्या वादावर केली. खोलेंविरोधात तक्रार करणारे स्वत: किती विज्ञाननिष्ठ आहेत, असा सवाल त्यांनी केला. खोले आणि त्यांच्यावरील टीकाकारांनी विज्ञाननिष्ठ होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. पृथ्वीसारख्या चार ग्रहांचा शोध लागला. त्यावर गेल्या दोन वर्षात किती चर्चा झाली, असा सवाल करून नेपच्यून ग्रहावर पंतप्रधानांनी अद्याप टिष्ट्वट का केले नाही, असा तिरकस सवाल केला. आपण भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान व्यक्त करतो. पण संस्कृती म्हणून आपल्याकडे काय शिल्लक आहे? सगळ््या पृथ्वीवरील संस्कृतीची सरमिसळ होत नवी संस्कृती तयार होत असते. तसे ४० लाख वर्षांपासून होत आहे. सर्वच संस्कृतींवर तिचा प्रभाव पडतो. त्यामुळे आपली संस्कृती, आपले साहित्य, आमचे मराठी साहित्य असा वृथा अभिमान बाळगून त्याबद्दल गर्वाने काही सांगत असू तर त्यातून आपला मूर्खपणाच प्रतीत होतो. साºया गोष्टी जगभरातून राबवून आपल्याकडे आल्या असल्याने हा एक प्रकारचा संकर आहे. त्यातील कशावरही हक्क सांगत आमचे म्हणून त्याचा गर्व बाळगण्याचे कारण नाही, असा टोला त्यांनी संस्कतीचे गोडवे गाणाºयांना लगावला.साहित्यातील सारेच पॅटर्न कुठून ना कुठून चोरलेले!खोले यांच्या सोवळ््याच्या प्रकरणावर लिहावे, असा साहित्याचा फॉर्मच अद्याप आपल्याकडे नाही. साहित्यचे सगळे पॅटर्न आपण चोरलेले आहे. कविता बाहेरुन आलेली आहे. अभंग आणि ओव्या या सुफी व अरबांकडून आलेल्या आहेत, असा दाखला त्यांनी दिला.ाहाराष्ट्रातील पहिली लावणी ही ४०० वर्षापूर्वी दखणी भाषेत मुस्लिम कवीने लिहिली. पण साहित्याचा इतिहासही सोयीस्कर पद्धतीने लिहिणारे ‘आपले कोण’ हे जाणून घेऊन त्यांचीच नावे इतिहासात ठासतात. तिथे दुसºया धर्मीयाने लिहिलेल्या साहित्याची दखल कशी घेणार, असा सवाल करत खान यांनी साहित्याच्या प्रांतातील जातीवादावर बोट ठेवले.ज्ञानेश्वरांना आपण आद्य कवी मानतो. त्यांनी कोणाकडे शिक्षण घेतले? त्यांच्या आधीही आणि त्यांच्या समकालात कोणी तरी कवी असतीलच ना? पण त्यांचा विचार आपण करीत नाही. त्यामुळे आद्य असे काही नसते. गौतम बुद्ध हे पहिले बुद्ध नव्हते. त्याआधीही आणखी कोणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. चिनी-अरबांनी आपल्याला लेखन शिकवले. जे काही आहे ‘ते इधर उधरसे उठाया हुआ है’ अशा शब्दांत त्यांनी साहित्यिकांना बोचरे चिमटे काढले.