शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

कवींचे वाचनानुभव ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध

By admin | Updated: May 11, 2017 01:55 IST

‘येऊ घातले भेटीला, जणू कवितांचे गावं! त्यांचा वाचानानुभवं, ऐकायला जमू सारे!! शब्दयात्रामध्ये सामिल होण्यासाठी इंद्रधनुने रसिकांना

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ‘येऊ घातले भेटीला, जणू कवितांचे गावं! त्यांचा वाचानानुभवं, ऐकायला जमू सारे!! शब्दयात्रामध्ये सामिल होण्यासाठी इंद्रधनुने रसिकांना जणू काही अशीच साद घातली आणि त्याला प्रतिसाद देऊन श्रोत्यांनी मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात चांगलीच गर्दी केली होती. अरुण म्हात्रे आणि अशोक बागवे या दोन कवींचे वाचनानुभव ऐकायला आलेल्या रसिकांनी मंत्रमुग्ध होण्याचा शब्दश: अनुभव घेतला.‘रंग माझा वेगळा’ या संग्रहाला पुलंनी प्रस्तावना लिहिली आहे. पुलस्पर्श झालेली कविता असे जेव्हा विवेचन येते तेव्हा कौतुकाने डोळे भारले जातात. प्रस्तावना नसून ते निरूपणच असते. त्यातून पुलं पुन्हा आपल्याला भेटतात. असे रंग भरले होते कवी म्हात्रे यांनी. गोव्याच्या कवयित्री ‘डॉ. अनुजा जोशी’ यांच्या ‘उत्सव’ या काव्यसंग्रहातून त्यांची रसिकांना ओळख करून दिली. ‘यथेच्छ’ आणि ‘आई, आजीवर रागवू नकोस गं’ या दोन कवितांचे वाचन करून डॉ. जोशींच्या प्रतिभेचा मर्मग्राही परिचय करून दिला. म्हात्रे यांच्या पोतडीतून पुढले निघालेले पुस्तक पाहून मात्र रसिक चकितच झाले. कल्पनांचा लंबक झुलतो तो फक्त कविंचाच नव्हे तर रहस्यकथा लिहिणाऱ्याचाही आणि वाचकाला वर्षानुवर्ष मोहिनी घालून ठेवतो. सतीश भावसार यांनी संकलित केलेले ‘बाबुराव अर्नाळकर’ त्यांनी रसिकांच्या भेटीस आणले होते. दाजी पणशीकर यांनी लिहीलेल्या ‘महाभारत एक सूडाचा प्रवास’ या पुस्तकाचे निरु पण सादर केले कवी अशोक बागवे यांनी. सत्यवतीने आपल्या वंशाला राज्य मिळावे यासाठी नकळत सुरु केले हे सूडसत्र शेवटी अगदी कृष्णाचा आणि पांडवांचा संहार करूनच थांबले. त्यातल्या विविध प्रसंगातली नाट्यमयता आणि सूडाभोवती फिरत असलेले हे जीवनचक्र , याचे बागवे यांनी अप्रतिम विवेचन केले. असुया या भावनेचे, सूड या कृतीत जेव्हा रु पांतर होते तेव्हाच महाभारत घडते असे या पुस्तकाचे सार त्यांनी श्रोत्यांच्या मनावर बिंबवले. कार्यक्र माच्या शेवटी प्रेक्षकांच्या आग्रहाखातर म्हात्रे यांनी ‘उंच माझा झोका’ हे स्वरचित मालिका शीर्षकगीत गायले. आम्हाला कविता आणि कविता याविषयीच बोलायला आमंत्रण मिळते. पण इथे मात्र आम्ही काय वाचतो या विषयावर बोलायला मिळाले याचा विशेष आनंद झाला असून पुन्हा या व्यासपीठावर येऊन असाच वाचकांशी संवाद साधण्याची इच्छा बागवे आणि म्हात्रे यांनी व्यक्त केली.