शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

विद्युत वाहिन्यांखालील उद्यानांच्या वापरावर मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 04:15 IST

सुरक्षेसाठी निर्णय; महापारेषणच्या सूचनांची होणार अंमलबजावणी

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : ऐरोली येथील दुर्घटनेनंतर अखेर उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील उद्यानात नागरिकांच्या वावरण्यावर मर्यादा येणार आहे. महापारेषणच्या सूचनांची दखल घेत सोमवारी पालिका अधिकाऱ्यांची आयुक्तांसोबत बैठक झाली. यावेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुमारे ३० उद्यानांत फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महापारेषणच्या अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील मोकळ्या जागेत होणारे अतिक्रमण टाळण्यासाठी पालिकेने त्याठिकाणची जागा विकसित केली आहे. त्यानुसार सद्यस्थितीला शहरातली सुमारे ३० उद्याने अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली आहेत. त्यापैकी ऐरोली येथील काम सुरू असलेल्या उद्यानात २ आॅगस्टला दुर्घटना घडली. विद्युत वायरच्या इन्सुलेटरचा स्फोट होवून त्याचा एक तुकडा उद्यानातून चाललेल्या मृणाल महाडिक (५२) यांच्या डोक्यात पडला. यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर गेली १८ दिवसांपासून मुलुंडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी महापारेषणसह पालिका अधिकाºयांविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील उद्याने, नर्सरी व इतर बांधकामांमुळे त्याठिकाणी वावरणाºया नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली कसलेही काम करू नये अशा सूचना महापारेषणच्या अधिकाºयांनी पालिका व सिडकोला यापूर्वीच केलेल्या आहेत. त्यानंतरही पालिकेने त्याठिकाणची अतिक्रमणे टाळण्यासाठी उद्याने विकसित केली आहेत. यावेळी पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाकडून झालेल्या निष्काळजीमुळे अशा उद्यानांमध्ये नागरिकांच्या जिवावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.उद्यान विकसित करताना टाकलेल्या भरावामुळे उच्च दाबाच्या वायरीचे जमिनीपासूनचे अंतर कमी झाले आहेत. अशातच ऐरोलीतील चिंचोली उद्यानात वायरीखालीच पाण्याचा कारंजा बसवण्यात आलेला. सर्व काम झाल्यानंतर घडलेली चूक अधिकाºयांच्या निदर्शनास आल्याने तो बंद करण्यात आला. तर बहुतांश उद्यानांमध्ये वायरीखालीच जॉगिंग ट्रॅक बनवले गेल्याने त्यावर चालतानाही नागरिकांना शॉक लागत आहेत. पावसाळ्यात हवेतील ओलाव्यामुळे असे प्रकार सर्वाधिक घडत आहेत. त्यामुळे ऐरोलीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर महापारेषण विभागाने पुन्हा एकदा महापालिका व सिडकोला अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील उद्याने नागरिकांच्या वापरासाठी बंद करण्याचे कळवले आहे. त्यावर पालिका आयुक्तांनी सोमवारी उद्यान व अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाºयांसोबत चर्चा केली. यावेळी अतिउच्च दाबाच्या विद्युत वायरींखालील ३० उद्याने बंद केल्यास त्यावर झालेला खर्च व्यर्थ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही उद्याने नागरिकांसाठी बंद करण्याऐवजी तिथे फेरबदल करून नागरी वापरावर मर्यादा घालण्याचा निर्णय झाला आहे. याकरिता वायरीच्या आसपासच्या खेळण्यांची जागा बदलली जाणार आहे. शिवाय सूचना फलकाद्वारे नागरिकांनाही खबरदारीच्या सूचना दिल्या जाणार आहेत. मात्र विद्युत वायरीखाली पूर्णपणे नागरिकांचा वावर टाळण्याच्या महापारेषणच्या सूचना आहेत. त्यानंतरही उद्यानावरील खर्च वाया जावू नये यासाठी नागरिकांवरच सुरक्षेची जबाबदारी ढकलली जात आहे.महापारेषणच्या अतिउच्च दाबाच्या विद्युत वायरींखालील जागा रिक्त ठेवणे गरजेचे आहे. यानंतरही पालिकेने अनेक ठिकाणी उद्याने विकसित केली आहेत. ऐरोलीतील दुर्घटनेनंतर अशा सर्वच उद्यानात वावरणाºया नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानुसार अशी उद्याने नागरिकांच्या वापरासाठी बंद करण्याच्या सूचना पालिकेला केल्या आहेत.- महेश भागवत, अधीक्षक अभियंता, महापारेषणऐरोलीतील दुर्घटनेनंतर अतिउच्च दाबाच्या विद्युत वायरींखाली पालिकेने विकसित केलेल्या उद्यानांमध्ये फेरबदल केले जाणार आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीत आयुक्तांनी आवश्यक सूचना केल्या आहेत. त्यानुसार अशा उद्यानात सूचना फलक लावून नागरिकांना सतर्क केले जाणार आहे, तर वायरींखालील जॉगिंग ट्रॅक, खेळणी सुरक्षित ठिकाणी हलवली जाणार आहेत. - नितीन काळे, उपआयुक्त, उद्यान विभाग.

टॅग्स :electricityवीजthaneठाणे