शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

स्वामी विवेकानंदांप्रमाणेच स्वतःची ओळख कळायला हवी तरच आयुष्यात यशस्वी होता येते - प्रा.डाॅ.प्रदीप ढवळ

By जितेंद्र कालेकर | Updated: January 14, 2024 17:22 IST

रात्र महाविद्यालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त, राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधुन, राष्ट्रीय सेवा योजना, कै. वामनराव ओक रक्तपेढी आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

ठाणे: स्वामी विवेकानंद यांनी कालीमातेकडे प्रार्थना करताना ज्ञान दे, बुद्धी दे,वैराग्य दे असे मागणे मागितले होते. विवेकानंदाना स्वतःची ओळख कळली होती. अध्यात्म हेच जीवनकार्य असल्याचे त्यांना ओळख झाली. यामुळेच स्वामी विवेकानंद अध्यात्मिक गुरु होऊ शकले, स्वामी विवेकानंदांप्रमाणेच आयुष्यात काय करायचे ते समजायला हवे, त्यासाठी स्वतःची ओळख कळायला हवी.  तरच आयुष्यात यशस्वी होता येते असे मत ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार, नाटककार प्रा.डाॅ.प्रदीप ढवळ यांनी व्यक्त केले.

आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त, राष्ट्रीय युवा दिनी, राष्ट्रीय सेवा योजना आयोजित ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार, नाटककार, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष व शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. ढवळ यांचे 'नरेंद्र ते विवेकानंद एक झंझावात ' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे,  प्राचार्या डाॅ. हर्षला लिखिते, सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे खजिनदार सतीश शेठ आदी  उपस्थित होते.

वडिल वारले, काकाने घराबाहेर काढले, दोन बहिणी व आई यांना घेऊन दारोदार फिरत, नोकरी शोधत, बिकट आयुष्य जगत असताना आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांना भेटण्यासाठी विवेकानंद आले असताना परमहंसांनी, कालीमातेकडे आयुष्यातील सुख-समृध्दीसाठी प्रार्थना करण्याविषयी सुचविले. यानुसार विवेकानंदांनी साक्षात प्रसन्न झालेल्या कालीमातेकडे प्रार्थना करताना आयुष्यातील सुख-समृध्दी ऐवजी, मला ज्ञान दे, बुद्धी दे, वैराग्य दे असे मागणे मागितले. भारतभर भ्रमण करतांना विवेकानंदांचे अध्यात्मिक विचार पक्के झाले. यामुळेच अमेरिकेतील सर्वधर्मसभेतील आपल्या ११ भाषणांत स्वामी विवेकानंद, जागतिक सर्वधर्मसभेतील विद्धानांना, जगाला, खरा धर्म समजावू शकल्याचे प्रा..ढवळ यांनी सांगितले. व्यक्त केले. सूत्रसंचालन सोहम खटकूळ व श्रावणी श्रेष्ठा या विद्यार्थ्यांनी केले.

रात्र महाविद्यालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त, राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधुन, राष्ट्रीय सेवा योजना, कै. वामनराव ओक रक्तपेढी आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला आणि ८८ बाटल्या रक्त यावेळी जमा झाले, अशी माहिती प्राचार्य डाॅ. हर्षला लिखिते यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे