शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

स्वामी विवेकानंदांप्रमाणेच स्वतःची ओळख कळायला हवी तरच आयुष्यात यशस्वी होता येते - प्रा.डाॅ.प्रदीप ढवळ

By जितेंद्र कालेकर | Updated: January 14, 2024 17:22 IST

रात्र महाविद्यालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त, राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधुन, राष्ट्रीय सेवा योजना, कै. वामनराव ओक रक्तपेढी आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

ठाणे: स्वामी विवेकानंद यांनी कालीमातेकडे प्रार्थना करताना ज्ञान दे, बुद्धी दे,वैराग्य दे असे मागणे मागितले होते. विवेकानंदाना स्वतःची ओळख कळली होती. अध्यात्म हेच जीवनकार्य असल्याचे त्यांना ओळख झाली. यामुळेच स्वामी विवेकानंद अध्यात्मिक गुरु होऊ शकले, स्वामी विवेकानंदांप्रमाणेच आयुष्यात काय करायचे ते समजायला हवे, त्यासाठी स्वतःची ओळख कळायला हवी.  तरच आयुष्यात यशस्वी होता येते असे मत ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार, नाटककार प्रा.डाॅ.प्रदीप ढवळ यांनी व्यक्त केले.

आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त, राष्ट्रीय युवा दिनी, राष्ट्रीय सेवा योजना आयोजित ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार, नाटककार, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष व शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. ढवळ यांचे 'नरेंद्र ते विवेकानंद एक झंझावात ' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे,  प्राचार्या डाॅ. हर्षला लिखिते, सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे खजिनदार सतीश शेठ आदी  उपस्थित होते.

वडिल वारले, काकाने घराबाहेर काढले, दोन बहिणी व आई यांना घेऊन दारोदार फिरत, नोकरी शोधत, बिकट आयुष्य जगत असताना आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांना भेटण्यासाठी विवेकानंद आले असताना परमहंसांनी, कालीमातेकडे आयुष्यातील सुख-समृध्दीसाठी प्रार्थना करण्याविषयी सुचविले. यानुसार विवेकानंदांनी साक्षात प्रसन्न झालेल्या कालीमातेकडे प्रार्थना करताना आयुष्यातील सुख-समृध्दी ऐवजी, मला ज्ञान दे, बुद्धी दे, वैराग्य दे असे मागणे मागितले. भारतभर भ्रमण करतांना विवेकानंदांचे अध्यात्मिक विचार पक्के झाले. यामुळेच अमेरिकेतील सर्वधर्मसभेतील आपल्या ११ भाषणांत स्वामी विवेकानंद, जागतिक सर्वधर्मसभेतील विद्धानांना, जगाला, खरा धर्म समजावू शकल्याचे प्रा..ढवळ यांनी सांगितले. व्यक्त केले. सूत्रसंचालन सोहम खटकूळ व श्रावणी श्रेष्ठा या विद्यार्थ्यांनी केले.

रात्र महाविद्यालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त, राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधुन, राष्ट्रीय सेवा योजना, कै. वामनराव ओक रक्तपेढी आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला आणि ८८ बाटल्या रक्त यावेळी जमा झाले, अशी माहिती प्राचार्य डाॅ. हर्षला लिखिते यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे