शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी विवेकानंदांप्रमाणेच स्वतःची ओळख कळायला हवी तरच आयुष्यात यशस्वी होता येते - प्रा.डाॅ.प्रदीप ढवळ

By जितेंद्र कालेकर | Updated: January 14, 2024 17:22 IST

रात्र महाविद्यालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त, राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधुन, राष्ट्रीय सेवा योजना, कै. वामनराव ओक रक्तपेढी आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

ठाणे: स्वामी विवेकानंद यांनी कालीमातेकडे प्रार्थना करताना ज्ञान दे, बुद्धी दे,वैराग्य दे असे मागणे मागितले होते. विवेकानंदाना स्वतःची ओळख कळली होती. अध्यात्म हेच जीवनकार्य असल्याचे त्यांना ओळख झाली. यामुळेच स्वामी विवेकानंद अध्यात्मिक गुरु होऊ शकले, स्वामी विवेकानंदांप्रमाणेच आयुष्यात काय करायचे ते समजायला हवे, त्यासाठी स्वतःची ओळख कळायला हवी.  तरच आयुष्यात यशस्वी होता येते असे मत ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार, नाटककार प्रा.डाॅ.प्रदीप ढवळ यांनी व्यक्त केले.

आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त, राष्ट्रीय युवा दिनी, राष्ट्रीय सेवा योजना आयोजित ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार, नाटककार, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष व शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. ढवळ यांचे 'नरेंद्र ते विवेकानंद एक झंझावात ' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे,  प्राचार्या डाॅ. हर्षला लिखिते, सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे खजिनदार सतीश शेठ आदी  उपस्थित होते.

वडिल वारले, काकाने घराबाहेर काढले, दोन बहिणी व आई यांना घेऊन दारोदार फिरत, नोकरी शोधत, बिकट आयुष्य जगत असताना आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांना भेटण्यासाठी विवेकानंद आले असताना परमहंसांनी, कालीमातेकडे आयुष्यातील सुख-समृध्दीसाठी प्रार्थना करण्याविषयी सुचविले. यानुसार विवेकानंदांनी साक्षात प्रसन्न झालेल्या कालीमातेकडे प्रार्थना करताना आयुष्यातील सुख-समृध्दी ऐवजी, मला ज्ञान दे, बुद्धी दे, वैराग्य दे असे मागणे मागितले. भारतभर भ्रमण करतांना विवेकानंदांचे अध्यात्मिक विचार पक्के झाले. यामुळेच अमेरिकेतील सर्वधर्मसभेतील आपल्या ११ भाषणांत स्वामी विवेकानंद, जागतिक सर्वधर्मसभेतील विद्धानांना, जगाला, खरा धर्म समजावू शकल्याचे प्रा..ढवळ यांनी सांगितले. व्यक्त केले. सूत्रसंचालन सोहम खटकूळ व श्रावणी श्रेष्ठा या विद्यार्थ्यांनी केले.

रात्र महाविद्यालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त, राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधुन, राष्ट्रीय सेवा योजना, कै. वामनराव ओक रक्तपेढी आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला आणि ८८ बाटल्या रक्त यावेळी जमा झाले, अशी माहिती प्राचार्य डाॅ. हर्षला लिखिते यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे