शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बदलापूरच्या ग्रामीण भागात वीज गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 00:21 IST

ग्रामीण भागातील राहटोली भागात चार दिवसांपासून अंधार पडला आहे.

बदलापूर : ग्रामीण भागातील राहटोली भागात चार दिवसांपासून अंधार पडला आहे. गावाला वीजपुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) बंद पडल्याने तो बदलण्यासाठी विलंब झाला आहे. ज्या ठिकाणी हे रोहित्र आहे, त्या ठिकाणी गाडी पोहोचत नसल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विलंब झाल्याचे वीज वितरण विभागाने स्पष्ट केला आहे. तर, ग्रामपंचायतीने रोहित्राच्या मार्गावरील अतिक्रमण न काढल्याने हा घोळ झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे चार दिवस राहटोलीकरांना अंधारात काढावे लागले.बदलापूर शहरातील महावितरणचा भोंगळ कारभार अनेकदा नागरिकांना अनुभवास येतो. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनाही त्याचा मोठा त्रास आहे. बदलापूरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या राहटोली गावातील वीजपुरवठा शुक्र वारी खंडित झाला होता. त्यावेळी गावातील रोहित्र नादुरुस्त झाल्याचे उघड झाले. याबाबत ग्रामस्थांनी बदलापूरच्या महावितरण कार्यालयाशी संपर्ककेला. त्यांना तातडीने रोहित्र बसवण्यात येईल, असे आश्वासन मिळाले; मात्र चार दिवस उलटूनही रोहित्र बसवण्यात महावितरणला अपयश येत होते. ज्या ठिकाणी रोहित्र बसवायचे नियोजन होते, त्या ठिकाणी रोहित्र नेण्यासाठी योग्य रस्ताच नसल्याची बाब समोर आली.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारावर येथील ग्रामस्थ संताप व्यक्त करत होते. महावितरण विभाग रोहित्र बसवण्यास तयार असतानाही त्याठिकाणी रोहित्र पोहोचवणे अवघड जात आहे. भविष्याचा विचार करून रोहित्राच्या मार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मागणीही होत आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी