शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

बदलापूरच्या ग्रामीण भागात वीज गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 00:21 IST

ग्रामीण भागातील राहटोली भागात चार दिवसांपासून अंधार पडला आहे.

बदलापूर : ग्रामीण भागातील राहटोली भागात चार दिवसांपासून अंधार पडला आहे. गावाला वीजपुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) बंद पडल्याने तो बदलण्यासाठी विलंब झाला आहे. ज्या ठिकाणी हे रोहित्र आहे, त्या ठिकाणी गाडी पोहोचत नसल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विलंब झाल्याचे वीज वितरण विभागाने स्पष्ट केला आहे. तर, ग्रामपंचायतीने रोहित्राच्या मार्गावरील अतिक्रमण न काढल्याने हा घोळ झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे चार दिवस राहटोलीकरांना अंधारात काढावे लागले.बदलापूर शहरातील महावितरणचा भोंगळ कारभार अनेकदा नागरिकांना अनुभवास येतो. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनाही त्याचा मोठा त्रास आहे. बदलापूरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या राहटोली गावातील वीजपुरवठा शुक्र वारी खंडित झाला होता. त्यावेळी गावातील रोहित्र नादुरुस्त झाल्याचे उघड झाले. याबाबत ग्रामस्थांनी बदलापूरच्या महावितरण कार्यालयाशी संपर्ककेला. त्यांना तातडीने रोहित्र बसवण्यात येईल, असे आश्वासन मिळाले; मात्र चार दिवस उलटूनही रोहित्र बसवण्यात महावितरणला अपयश येत होते. ज्या ठिकाणी रोहित्र बसवायचे नियोजन होते, त्या ठिकाणी रोहित्र नेण्यासाठी योग्य रस्ताच नसल्याची बाब समोर आली.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारावर येथील ग्रामस्थ संताप व्यक्त करत होते. महावितरण विभाग रोहित्र बसवण्यास तयार असतानाही त्याठिकाणी रोहित्र पोहोचवणे अवघड जात आहे. भविष्याचा विचार करून रोहित्राच्या मार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मागणीही होत आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी