शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

बदलापूरच्या ग्रामीण भागात वीज गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 00:21 IST

ग्रामीण भागातील राहटोली भागात चार दिवसांपासून अंधार पडला आहे.

बदलापूर : ग्रामीण भागातील राहटोली भागात चार दिवसांपासून अंधार पडला आहे. गावाला वीजपुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) बंद पडल्याने तो बदलण्यासाठी विलंब झाला आहे. ज्या ठिकाणी हे रोहित्र आहे, त्या ठिकाणी गाडी पोहोचत नसल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विलंब झाल्याचे वीज वितरण विभागाने स्पष्ट केला आहे. तर, ग्रामपंचायतीने रोहित्राच्या मार्गावरील अतिक्रमण न काढल्याने हा घोळ झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे चार दिवस राहटोलीकरांना अंधारात काढावे लागले.बदलापूर शहरातील महावितरणचा भोंगळ कारभार अनेकदा नागरिकांना अनुभवास येतो. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनाही त्याचा मोठा त्रास आहे. बदलापूरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या राहटोली गावातील वीजपुरवठा शुक्र वारी खंडित झाला होता. त्यावेळी गावातील रोहित्र नादुरुस्त झाल्याचे उघड झाले. याबाबत ग्रामस्थांनी बदलापूरच्या महावितरण कार्यालयाशी संपर्ककेला. त्यांना तातडीने रोहित्र बसवण्यात येईल, असे आश्वासन मिळाले; मात्र चार दिवस उलटूनही रोहित्र बसवण्यात महावितरणला अपयश येत होते. ज्या ठिकाणी रोहित्र बसवायचे नियोजन होते, त्या ठिकाणी रोहित्र नेण्यासाठी योग्य रस्ताच नसल्याची बाब समोर आली.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारावर येथील ग्रामस्थ संताप व्यक्त करत होते. महावितरण विभाग रोहित्र बसवण्यास तयार असतानाही त्याठिकाणी रोहित्र पोहोचवणे अवघड जात आहे. भविष्याचा विचार करून रोहित्राच्या मार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मागणीही होत आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी