शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

छोट्या व्यापाऱ्यांवरील कोविडचे निर्बंध उठवा, अन्यथा...; रवींद्र चव्हाणांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 00:20 IST

अन्यथा १५ ऑगस्टनंतर उतरणार रस्त्यावर

डोंबिवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे नागरिकांप्रमाणेच शहरातील व्यापारीही आर्थिक विवंचनेत आहे. राज्य सरकारने व्यापाऱ्यांना आता नियमांच्या बंधनात अडकवून आणखी समस्येत टाकू नये. १४ आॅगस्टपूर्वी व्यापाºयांवरील कोविडचे निर्बंध उठवावेत, अन्यथा १५ आॅगस्टनंतर व्यापारी सरकारविरोधात रस्त्यावर उतरतील. त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिला.डोंबिवली ग्रेन्स अ‍ॅण्ड मर्चंट्स असोसिएशनतर्फे शनिवारी शहरात एक बैठक झाली. यावेळी डोंबिवली व्यापारी मंडळांतर्गत असलेल्या व्यापाºयांनी एकत्र येत राज्य सरकारच्या जाचक अटी, शर्तींवर नाराजी व्यक्त केली.राज्य सरकार जर मद्यविक्रीसाठी प्रयत्नशील असेल, तर या छोट्या व्यापाºयांनी काय चूक केली आहे? असा सवाल चव्हाण यांनी केला. किराणा, कपडा, हॉटेल यांसह अन्य किरकोळ, घाऊक विक्रेत्यांवर सुमारे एक लाख कामगार अवलंबून आहेत. लॉकडाऊनच्या काळात सर्वांचाच रोजगार धोक्यात आला आहे. लाखो कुटुंबीयांचा प्रश्न असल्याने राज्य सरकारने आता त्याकडे दुर्लक्ष करू नये, असे ते म्हणाले.एक लाख कामगारांना व्यापाºयांनी कधी पूर्ण तर कधी अर्धे वेतन दिले आहे. मात्र, आता त्यांची आर्थिक क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता व्यापार करायला मोकळीक द्यावी. शक्य असल्यास कर, भाडे यामध्ये सूट द्यावी आणि दिलासा द्यावा. पण यापुढे वेळेचे बंधन, वारांचे बंधन नसावे, असे असोसिएशनतर्फे व्यापारी अजित शेट्टी, दिनेश गौर आदींनी प्रातिनिधिक स्वरूपात सांगितले.अर्थचक्राला गती देण्याचा मानसआम्हाला कोणाचा निषेध, विरोध करायचा नाही की राजकारण करायचे नाही. आम्हाला रीतसर पहिल्यासारखा व्यापार, व्यवसाय करायचा आहे. सगळ्यांचा विकास त्यातूनच होणार आहे. आम्हाला रोजगाराच्या संधी देऊन अर्थकारणाला वेग द्यायचा असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. शहरातील हजारो व्यापारी एकत्र आले असून त्यांच्या संघटनांनी राज्य सरकारला ही विनंती केली आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही, असे व्यापाºयांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपा