शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

छोट्या व्यापाऱ्यांवरील कोविडचे निर्बंध उठवा, अन्यथा...; रवींद्र चव्हाणांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 00:20 IST

अन्यथा १५ ऑगस्टनंतर उतरणार रस्त्यावर

डोंबिवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे नागरिकांप्रमाणेच शहरातील व्यापारीही आर्थिक विवंचनेत आहे. राज्य सरकारने व्यापाऱ्यांना आता नियमांच्या बंधनात अडकवून आणखी समस्येत टाकू नये. १४ आॅगस्टपूर्वी व्यापाºयांवरील कोविडचे निर्बंध उठवावेत, अन्यथा १५ आॅगस्टनंतर व्यापारी सरकारविरोधात रस्त्यावर उतरतील. त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिला.डोंबिवली ग्रेन्स अ‍ॅण्ड मर्चंट्स असोसिएशनतर्फे शनिवारी शहरात एक बैठक झाली. यावेळी डोंबिवली व्यापारी मंडळांतर्गत असलेल्या व्यापाºयांनी एकत्र येत राज्य सरकारच्या जाचक अटी, शर्तींवर नाराजी व्यक्त केली.राज्य सरकार जर मद्यविक्रीसाठी प्रयत्नशील असेल, तर या छोट्या व्यापाºयांनी काय चूक केली आहे? असा सवाल चव्हाण यांनी केला. किराणा, कपडा, हॉटेल यांसह अन्य किरकोळ, घाऊक विक्रेत्यांवर सुमारे एक लाख कामगार अवलंबून आहेत. लॉकडाऊनच्या काळात सर्वांचाच रोजगार धोक्यात आला आहे. लाखो कुटुंबीयांचा प्रश्न असल्याने राज्य सरकारने आता त्याकडे दुर्लक्ष करू नये, असे ते म्हणाले.एक लाख कामगारांना व्यापाºयांनी कधी पूर्ण तर कधी अर्धे वेतन दिले आहे. मात्र, आता त्यांची आर्थिक क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता व्यापार करायला मोकळीक द्यावी. शक्य असल्यास कर, भाडे यामध्ये सूट द्यावी आणि दिलासा द्यावा. पण यापुढे वेळेचे बंधन, वारांचे बंधन नसावे, असे असोसिएशनतर्फे व्यापारी अजित शेट्टी, दिनेश गौर आदींनी प्रातिनिधिक स्वरूपात सांगितले.अर्थचक्राला गती देण्याचा मानसआम्हाला कोणाचा निषेध, विरोध करायचा नाही की राजकारण करायचे नाही. आम्हाला रीतसर पहिल्यासारखा व्यापार, व्यवसाय करायचा आहे. सगळ्यांचा विकास त्यातूनच होणार आहे. आम्हाला रोजगाराच्या संधी देऊन अर्थकारणाला वेग द्यायचा असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. शहरातील हजारो व्यापारी एकत्र आले असून त्यांच्या संघटनांनी राज्य सरकारला ही विनंती केली आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही, असे व्यापाºयांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपा