शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

तीन भावांना जन्मठेप; सात जण निर्दाेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 03:23 IST

मुरबाड तालुक्यातील टोकावडे, खापरी येथील जमिनीच्या वादातून १० वर्षांपूर्वी तानाजी राऊत यांची हत्या झाली होती. या खटल्याचा निकाल शनिवारी कल्याण सत्र न्यायालयाने दिला.

कल्याण/टोकावडे : मुरबाड तालुक्यातील टोकावडे, खापरी येथील जमिनीच्या वादातून १० वर्षांपूर्वी तानाजी राऊत यांची हत्या झाली होती. या खटल्याचा निकाल शनिवारी कल्याण सत्र न्यायालयाने दिला. एकूण १० आरोपींपैकी तिघांना जन्मठेपेची शिक्षा तर उर्वरित सात आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दाेष मुक्तता झाली.खापरी येथील प्रभाकर शंकर राऊत यांनी गावातील काही शेतकऱ्यांची जमीन त्यांच्या नकळत परस्पर गुजरात येथील व्यक्तीला विकण्याचा घाट घातला होता. या जमिनीपोटी राऊत यांनी बयाणा घेतला. ही बाब गावातील निवृत्त आरोग्य कर्मचारी तानाजी हिरू राऊत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सर्व शेतक-यांनी त्याची माहिती दिली. तर आम्ही कोणीही प्रभाकर राऊत यांच्यामार्फत जमीन विकलेली नाही, असे संबंधितांनी तानाजी यांना सांगितले.दरम्यान, सर्व शेतकºयांनी टोकावडे पोलीस ठाण्यात प्रभाकर राऊत यांच्याविरोधात तक्रार दिली. त्या रागातून ग्रा.पं. निवडणुकीच्या दिवशी प्रभाकर राऊत याने त्याचे भाऊ आणि पुतण्यासह तानाजी राऊत यांच्या घरात शिरकाव केला आणि तानाजी यांना रस्त्यावर आणून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तानाजी यांना टोकावडे येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील जे. जे. रु ग्णालयात हलवण्यात आले. परंतु, तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.>१० हजारांचा दंडया खटल्याची सुनावणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. हाथरोटे यांच्या न्यायालयात झाली.या वेळी आरोपी प्रभाकर शंकर राऊत, सुरेश शंकर राऊत व नारायण शंकर राऊत यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच प्रत्येकी १० हजार रु पये दंड ठोठावण्यात आला.दंड न भरल्यास आणखी दोन वर्ष सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. मात्र, यातील अन्य आरोपींची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. रचना भोईर यांनी काम पाहिले.