शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

तीन भावांना जन्मठेप; सात जण निर्दाेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 03:23 IST

मुरबाड तालुक्यातील टोकावडे, खापरी येथील जमिनीच्या वादातून १० वर्षांपूर्वी तानाजी राऊत यांची हत्या झाली होती. या खटल्याचा निकाल शनिवारी कल्याण सत्र न्यायालयाने दिला.

कल्याण/टोकावडे : मुरबाड तालुक्यातील टोकावडे, खापरी येथील जमिनीच्या वादातून १० वर्षांपूर्वी तानाजी राऊत यांची हत्या झाली होती. या खटल्याचा निकाल शनिवारी कल्याण सत्र न्यायालयाने दिला. एकूण १० आरोपींपैकी तिघांना जन्मठेपेची शिक्षा तर उर्वरित सात आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दाेष मुक्तता झाली.खापरी येथील प्रभाकर शंकर राऊत यांनी गावातील काही शेतकऱ्यांची जमीन त्यांच्या नकळत परस्पर गुजरात येथील व्यक्तीला विकण्याचा घाट घातला होता. या जमिनीपोटी राऊत यांनी बयाणा घेतला. ही बाब गावातील निवृत्त आरोग्य कर्मचारी तानाजी हिरू राऊत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सर्व शेतक-यांनी त्याची माहिती दिली. तर आम्ही कोणीही प्रभाकर राऊत यांच्यामार्फत जमीन विकलेली नाही, असे संबंधितांनी तानाजी यांना सांगितले.दरम्यान, सर्व शेतकºयांनी टोकावडे पोलीस ठाण्यात प्रभाकर राऊत यांच्याविरोधात तक्रार दिली. त्या रागातून ग्रा.पं. निवडणुकीच्या दिवशी प्रभाकर राऊत याने त्याचे भाऊ आणि पुतण्यासह तानाजी राऊत यांच्या घरात शिरकाव केला आणि तानाजी यांना रस्त्यावर आणून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तानाजी यांना टोकावडे येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील जे. जे. रु ग्णालयात हलवण्यात आले. परंतु, तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.>१० हजारांचा दंडया खटल्याची सुनावणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. हाथरोटे यांच्या न्यायालयात झाली.या वेळी आरोपी प्रभाकर शंकर राऊत, सुरेश शंकर राऊत व नारायण शंकर राऊत यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच प्रत्येकी १० हजार रु पये दंड ठोठावण्यात आला.दंड न भरल्यास आणखी दोन वर्ष सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. मात्र, यातील अन्य आरोपींची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. रचना भोईर यांनी काम पाहिले.