शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

भिवंडीतील दोन आदिवासी मुलांची वेढबिगारीतून मुक्तता

By नितीन पंडित | Updated: September 20, 2022 19:22 IST

इगतपुरी येथील घटनेनंतर श्रमजीवी संघटनेने अशा प्रकारच्या वेठबिगरीसाठी राबणाऱ्या मुलांचा शोध घेतला असता भिवंडी तालुक्यातील दोन मुलांना अहमदनगर जिल्ह्यात वेढबिगारी साठी राबविले जात असल्याचे उघड झाले आहे.

भिवंडी - इगतपुरी तालुक्यातील गौरी आगविले या मुलीच्या संशयास्पद मृत्यू नंतर नाशिक अहमदनगर भागात लहान बालकांना मेंढया राखण्यासाठी मेंढपाळांनी त्यांच्या पालकांना कवडीमोल दाम देऊन मुलांना घेऊन गेल्याचे उघड झाल्या नंतर या प्रकरणांमध्ये श्रमजीवी संघटनेने पाठपुरावा करून दोन वेठबिगार बाल कामगारांची सुटका केली असून सोमवारी पडघा पोलीस ठाण्यात दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इगतपुरी येथील घटनेनंतर श्रमजीवी संघटनेने अशा प्रकारच्या वेठबिगरीसाठी राबणाऱ्या मुलांचा शोध घेतला असता भिवंडी तालुक्यातील दोन मुलांना अहमदनगर जिल्ह्यात वेढबिगारी साठी राबविले जात असल्याचे उघड झाले आहे. राहुल दिलीप पवार वय १७ व अरुण रामू वाघे वय १२ असे वेठ बिगरीतून मुक्त केलेल्या मुलांची नावे आहेत.

पडघा नजीकच्या वडवली येथील खोताचा पाडा येथील दिलीप पवार यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्यातील भिवा गोयकर रा.ताजु ता. कर्जत हा येऊन त्याने आपल्याकडे मेंढया राखण्यासाठी कामगाराची गरज असल्याचे सांगत त्यांचा सतरा वर्षांचा मुलगा राहुल यास आपल्या सोबत देण्याची मागणी केली व मुलाचे लग्न पण आपण लावून देऊ असे सांगत कुटुंबियांना फक्त १५०० रुपये देऊन सोबत घेऊन गेला .मागील दीड वर्षे त्यास आपल्याकडे ठेवून त्याच्या कडून शारीरिक श्रमाची कामे करून घेत होता व त्यास कामाचे पैसे देखील न देता त्याची शारीरिक व आर्थिक पिळवणूक केली.

तर दुसऱ्या प्रकरणात पडघा नजीकच्याच वाफाळे येथील सागपाडा येथील रामू वाघे यांच्या गावात मागील वर्षी मेंढ्या घेऊन आलेले मेंढपाळ संभाजी खताळ रा. ढवळपुरी ता पारनेर जि अहमदनगर याने आपली पत्नी नेहमी आजारी असल्याने मेंढ्या राखण्यासाठी कामगाराची गरज असून मुलगा अरुण यास महिना ५०० रुपये मोबदला देऊन आपल्या सोबत घेऊन गेले.सुमारे दीड वर्षे अरुण हा संभाजी खताळ यांच्या कडे काम करीत होता.इगतपुरी येथील घटनेच्या वाच्यते नंतर मेंढपाळाने अरुण यास त्याच्या घरी आणून सोडले.ही बाब श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्या जया केशव पारधी, आशा नारायण भोईर,मारुती भांगरे,संतोष भेरे यांना समजताच या वेढबिगारी म्हणून राबलेल्या मुलांसह त्यांच्या पालकांना घेऊन पडघा पोलीस ठाण्यात भिवा गोयकर व संभाजी खताळ या दोन मेंढपाळां विरोधात वेठबिगारी उच्चाटन अधिनियमासह विविध कालमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणानंतर श्रमजीवी संघटनेने अधिक आक्रमक झाली असून अशा प्रकारच्या वेठबिगरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करणे गरजेचे असून वेठबिगारी मुक्त मजुरांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून देणे गरजेचे आहे तसेच पडघा पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी