शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

उपराष्ट्रपतींकडून ‘त्या’ बांधकामाची दखल, मुख्य सचिवांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:51 IST

केडीएमसीने आरक्षित जागेत ‘ई’ प्रभागाचे कार्यालय थाटल्याच्या तक्रारीची दखल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी घेतली आहे.

डोंबिवली : केडीएमसीने आरक्षित जागेत ‘ई’ प्रभागाचे कार्यालय थाटल्याच्या तक्रारीची दखल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी घेतली आहे. यासंदर्भात नायडू यांचे अवर सचिव हुरबी शकील यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून या प्रकरणाची दखल घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच केलेल्या कार्यवाहीची माहिती तक्रारदाराला द्यावी, असेही पत्रात म्हटले आहे.दावडी परिसरातील रिजन्सी गार्डन संकुलातील प्रशस्त जागेत ‘ई’ प्रभागाचे कार्यालय थाटण्यात आले आहे. १२ फेब्रुवारीला या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. परंतु, ही जागा येथील ज्ञानेश्वर सोसायटीच्या मालकीची असल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केल्याने शुभारंभाचा कार्यक्रम वादग्रस्त ठरला होता. स्थानिक रहिवासी विश्वनाथ पटवर्धन यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सोसायटीने तत्कालीन महापालिका आयुक्त ई. रवींद्रन, महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह अन्य काही जणांना कायदेशीर नोटिसाही बजावल्या आहेत.केडीएमसीच्या नगररचना विभागाने मंजुरी दिल्याप्रमाणे ही जागा दवाखाना व बालवाडी, यासाठी आरक्षित होती, याकडे पटवर्धन यांनी लक्ष वेधले आहे. या आरक्षित जागेवर ‘ई’ प्रभाग कार्यालय थाटणे म्हणजे एक प्रकारे महापालिकेकडूनच अतिक्रमण झाल्यासारखे आहे. पटवर्धन यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या तपशिलात जेथे हे कार्यालय उभारले आहे, ती जागा अ‍ॅमेनिटी स्पेस म्हणून दवाखाना आणि बालवाडी, यासाठी आरक्षित असल्याचेही समोर आले आहे. या क्षेत्राचा वापर हा स्थानिक तसेच संकुलातील रहिवाशांनी करावयाचा आहे.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूkdmcकल्याण डोंबिवली महापालिका