शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शाडूच्या मातीचा करूया पुनर्वापर, यंदाच्या गणेशोत्सवात ठाण्यात पर्यावरणपुरक उपक्रम

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 1, 2022 20:29 IST

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे ठाणेकर वळू लागले आहेत. अनेक जण सोसायटीच्या आवारात किंवा घरच्या घरी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यावर भर देत आहेत.

ठाणे : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी दरवर्षी वैयक्तीक स्तरावर किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. यावर्षी अनोखा पर्यावरणपूरक उपक्रम ठाण्यात राबविला जात आहे. पुनरावर्तन या उपक्रमांतर्गत शाडूच्या मातीचा पुनर्वापर केला जाणार आहे. ही शाडूची माती गणेश भक्तांकडून संकलित करून ती मूर्ती बनविणाऱ्या कलाकारांना दिली जाणार आहे. 

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे ठाणेकर वळू लागले आहेत. अनेक जण सोसायटीच्या आवारात किंवा घरच्या घरी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यावर भर देत आहेत. शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यानंतर अनेकदा त्या मातीचे काय करायचे हा गणेशभक्तांसमोर प्रश्न उभा राहतो. परंतू पुनरावर्तन या उपक्रमाने त्याचे उत्तर शोधले आहे. ही माती गणेशभक्तांकडून संकलित करुन ती गणेशमूर्ती बनविणाऱ्या कलाकारांना दिली जाणार आहे जेणेकरुन शाडूच्या मातीचा पुनर्वापर करण्याची साखळी ही सुरू राहील. घरी विसर्जन करा, गोळा करा, माती सुकवा आणि तिचा पुनर्वापर करा, असा संदेश पुनरावर्तनने दिला आहे. एमईईच्या संस्थापिका श्रीलता मेनन यांनी ठाण्यातील जबाबदारी स्वीकारली आहे. 

पर्यावरण साखळी पूर्ण करा आणि पुनरावर्तन मोहिमेमध्ये सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी ठाण्यातील गणेशभक्तांना केले आहे. ही माती स्विकारण्यासाठी चार केंद्रे उभारण्यात आली आहेत. अंजना देवस्थेळे (९०८२३३३६३३) १००१ नक्षत्र रेसिडेन्सी, उदयनगर, पाचपाखाडी, ठाणे या ठिकाणी ५ ते १२ सप्टेंबर, श्रीलता मेनन (९६१९५५२२२१) १०३, टॉवर ए, व्हीराज गार्डन व्हॅली, कोलशेत रोड, ठाणे (प.). संजीवनी भागवत (८८७९८३४४४६) ६०४ ए, रोझवुड, प्रेस्टीज रेसिडेन्सी, घोडबंर रोड, ठाणे (प.). श्रीलता मेनन, विशाल शिंदे (९६१९५५२२२१, ७९७७४७२४८६) एव्हरेस्ट वर्ल्ड सर्कल, ढोकाळी पाडा, ढोकाळी, ठाणे (प.). या पत्त्यावर गणेशभक्तांनी शाडूची माती आणून देण्याचे आवाहन केले आहे. 

१. शाडू माती एक मर्यादीत संसाधन आहे२. या मातीच्या उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो३. मातीच्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे गाळ निर्माण होतो४. नदीपात्रात गाळ साठल्याने सागरी जीवनावर परिणाम होतो५. शाडू मातीचा पुनर्वापर करता येऊ शकतो 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवthaneठाणे