शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शाडूच्या मातीचा करूया पुनर्वापर, यंदाच्या गणेशोत्सवात ठाण्यात पर्यावरणपुरक उपक्रम

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 1, 2022 20:29 IST

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे ठाणेकर वळू लागले आहेत. अनेक जण सोसायटीच्या आवारात किंवा घरच्या घरी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यावर भर देत आहेत.

ठाणे : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी दरवर्षी वैयक्तीक स्तरावर किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. यावर्षी अनोखा पर्यावरणपूरक उपक्रम ठाण्यात राबविला जात आहे. पुनरावर्तन या उपक्रमांतर्गत शाडूच्या मातीचा पुनर्वापर केला जाणार आहे. ही शाडूची माती गणेश भक्तांकडून संकलित करून ती मूर्ती बनविणाऱ्या कलाकारांना दिली जाणार आहे. 

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे ठाणेकर वळू लागले आहेत. अनेक जण सोसायटीच्या आवारात किंवा घरच्या घरी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यावर भर देत आहेत. शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यानंतर अनेकदा त्या मातीचे काय करायचे हा गणेशभक्तांसमोर प्रश्न उभा राहतो. परंतू पुनरावर्तन या उपक्रमाने त्याचे उत्तर शोधले आहे. ही माती गणेशभक्तांकडून संकलित करुन ती गणेशमूर्ती बनविणाऱ्या कलाकारांना दिली जाणार आहे जेणेकरुन शाडूच्या मातीचा पुनर्वापर करण्याची साखळी ही सुरू राहील. घरी विसर्जन करा, गोळा करा, माती सुकवा आणि तिचा पुनर्वापर करा, असा संदेश पुनरावर्तनने दिला आहे. एमईईच्या संस्थापिका श्रीलता मेनन यांनी ठाण्यातील जबाबदारी स्वीकारली आहे. 

पर्यावरण साखळी पूर्ण करा आणि पुनरावर्तन मोहिमेमध्ये सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी ठाण्यातील गणेशभक्तांना केले आहे. ही माती स्विकारण्यासाठी चार केंद्रे उभारण्यात आली आहेत. अंजना देवस्थेळे (९०८२३३३६३३) १००१ नक्षत्र रेसिडेन्सी, उदयनगर, पाचपाखाडी, ठाणे या ठिकाणी ५ ते १२ सप्टेंबर, श्रीलता मेनन (९६१९५५२२२१) १०३, टॉवर ए, व्हीराज गार्डन व्हॅली, कोलशेत रोड, ठाणे (प.). संजीवनी भागवत (८८७९८३४४४६) ६०४ ए, रोझवुड, प्रेस्टीज रेसिडेन्सी, घोडबंर रोड, ठाणे (प.). श्रीलता मेनन, विशाल शिंदे (९६१९५५२२२१, ७९७७४७२४८६) एव्हरेस्ट वर्ल्ड सर्कल, ढोकाळी पाडा, ढोकाळी, ठाणे (प.). या पत्त्यावर गणेशभक्तांनी शाडूची माती आणून देण्याचे आवाहन केले आहे. 

१. शाडू माती एक मर्यादीत संसाधन आहे२. या मातीच्या उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो३. मातीच्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे गाळ निर्माण होतो४. नदीपात्रात गाळ साठल्याने सागरी जीवनावर परिणाम होतो५. शाडू मातीचा पुनर्वापर करता येऊ शकतो 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवthaneठाणे