शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

तलावांच्या संवर्धनासाठी 'चला तलावांशी हात मिळवूया'; जागतिक जलदिनानिमित्त मानवी साखळी तयार करणार

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: March 18, 2024 15:44 IST

मानवी साखळी तयार करून संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत तलावांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. 

ठाणे : तलाव संवर्धन ही काळाची गरज आहे. तलावांचे शहर' म्हणून ओळख असलेल्या आपल्या ठाणे शहरात पूर्वी ६० तलाव होते आणि आता केवळ ४२ तलाव शिल्लक आहेत आणि ही या शहराची शोकांतिका आहे. तलाव संवर्धनाची माझा तलाव ही मोहीम जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी येत्या २२ मार्च रोजी म्हणजेच ' जागतिक जलदिना निमित्त' मासुंदा तलाव (तलावपाळी) येथे ठाण्यातील सर्व तलाव आपल्या भेटीला येणार आहेत. मानवी साखळी तयार करून संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत तलावांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. 

पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'माझा तलाव' या चळवळीची सुरुवात झाली. 'या तलावांचे संवर्धन करण्यासाठी माझा तलाव ही मोहीम सुरू झाली. ठाण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी माझा तलाव मोहिमेचा पहिला जाहीर कार्यक्रम संपन्न झाला. शाळेतील मुलांचा सहभाग या मोहिमेत अग्रस्थानी आहे. आत्तापर्यंत एकूण १५ शाळांनी त्यांच्या नजीकचे तलाव दत्तक घेतले असून निरीक्षणाद्वारे मुले तलावबाबत जागरुक होत आहेत.  २२ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या सुरवातीला जमलेल्या सर्व पर्यावरणप्रेमींना 'माझा तलाव' मोहिमेची माहिती देण्यात येईल. त्यानंतर शाळेतील मुलांनी तयार केलेले पोस्टर्स आणि ४२ तलावांचे फोटो यांच्यासमवेत तलावाभोवती मानवी साखळी तयार केली जाईल. 

मुले आणि पर्यावरण दक्षता मंडळाचे कार्यकर्ते तलावावर येणाऱ्या लोकांना मोहिमेची माहिती देतील. 'माझा तलाव' मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्वांची नोंदणी सुद्धा त्याठिकाणी केली जाईल. आपल्या ठाणे शहरातील तलावांच्या संवर्धनासाठी या मोहिमेत एक जबाबदार ठाणेकर म्हणून सहभागी होण्याचे आणि जलदिन खऱ्या अर्थाने साजरा करण्याचे आवाहन पर्यावरण दक्षता मंडळ आपल्याला करत आहे. 

 

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी