शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

अंगारकी असूनही टिटवाळा गणपती मंदिरात तुरळक गर्दी; पूजा साहित्य विक्रेते चिंतेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 17:00 IST

फारशी विक्री न झाल्याने विक्रेते

- उमेश जाधवटिटवाळा:अंगारकी चतुर्थी निमित्त टिटवाळा येथील महागणपती मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मंगळवारी तुरळक गर्दी दिसून आली. सोमवारी रात्री 12 वाजता गणपती देवाला दुग्ध अभिषेक करून आरती नंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले. अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्याने मंदिरात विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीचा महापूर येईल अशी मंदिरातील पुजारी व येथील पूजा साहित्य विक्रत्यांची भावना होती. मात्र आज मंदिरात अतिशय कमी गर्दी पाहायला मिळाली.    सोमवारी रात्री दहा वाजल्यापासून मंदिर विश्वस्तांनी अंगारकी चतुर्थी म्हणून देवाच्या पुजेची तयारी सुरू केली होती.  रात्री 12 वाजता देवाला अभिषेक केल्यावर आरतीनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया... मंगल मूर्ती मोरया.. उंदीर मामा की जय.. या घोषणांनी मंदिर, मंदिर परिसर व सभामंडप दणाणून गेले होते. रात्री पासूनच मंदिर सभामंडपातील दर्शन बारीत भाविकांनी काही प्रमाणात गर्दी केली होती. तसेच सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर काही प्रमाणात भाविकांनी हजेरी लावली. मात्र नेहमीप्रमाणे आवारातील व तलावा सभोवतालची दर्शन बारी पूर्णपणे भाविकांनी भरली नाही. रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने आणि त्यात रेल्वेची लोकल सेवाही उशिराने धावत असल्याने भाविकांची गर्दी कमी असल्याचे मंदिर विश्वस्तांनी सांगितले. 

दुपारी 12 नंतर तुरळक प्रमाणात का होईना गर्दीत वाढ झाली. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ या उपनगरांसह मुंबई व ठाणे या शहरातील भाविकांनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. अंगारकी चतुर्थी असल्या कारणाने येथील पूजा साहित्य विक्रेत्यांनी हार, फुले, मोदक, नारळ व इतर पुजेचे साहित्य जास्त प्रमाणात मागवले आहे. मात्र फारशी विक्री न झाल्याने बरेचसे साहित्य पडून आहे. टिटवाळा पोलीस ठाण्याच्या वतीने मंदिर परिसरात 40 कर्मचारी व 8 अधिकारी असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर सुरक्षा रक्षक, अनिरुद्ध बापू साधक व काही सामाजिक संस्थांचे साधकदेखील याठिकाणी आपले कर्तव्य बजावताना दिसत होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची अग्निशमन दलाची व आरोग्य खात्याची यंत्रणादेखील मंदिर प्रांगणात सज्ज होती. रात्री उशिरापर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी भाविकांची गर्दी वाढली तर वाढेल अशा प्रकारचे मत मंदिर विश्वस्त योगेश जोशी यांनी लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.    

नेहमीच्या अंगारकी चतुर्थीला ज्या प्रमाणे गर्दी असते त्याच्या पंचवीस टक्केदेखील गर्दी आज नसल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. मोठ्या प्रमाणात पूजा साहित्य आणले आहे ते अंगावर पडणार असून‌ आम्हाला नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. गणेश दलाल, पुजा साहित्य विक्रेता.