शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

केंद्रांवर कोरोना लसीकरण कमी आणि गोंधळच जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 00:27 IST

नागरिकांची होतेय हेळसांड : ऑनलाइन नोंदणी आम्ही कशी करणार, ज्येष्ठ नागरिकांचा सवाल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लसीकरणावर सरकारने अधिक भर दिला आहे. ४५ वयोगटापुढील नागरिकांचे आधीच लसीकरण सुरु केले आहे. आता १८ वर्षांपुढील सर्वांनाच लस दिली जाणार आहे. मात्र लसींचा अपुरा पुरवठा होत असल्याने ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांनाही दुसरा डोस मिळणे कठीण झाले आहे. अशातच १८ वर्षांपुढील नागरिकांची भर पडल्याने केंद्रांवर गोंधळ उडाला आहे. अपुऱ्या लसींमुळे पालिकांना केंद्रे बंद करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत आम्ही लस कशी घ्यायची असा सवाल नागरिक विचारत आहेत. लसीकरण केंद्रांवरील नेमक्या परिस्थितीचा ‘लोकमत’ने घेतलेला हा आढावा.

ग्रामीण भागात लसीकरणाला रजिस्ट्रेशनच्या अटीमुळे खाे 

तरुणांमध्ये राेष : लसीकरण केंद्रे ओस

सुरेश लोखंडे

ठाणे : राज्यभरातील गावखेड्यांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी लाभार्थींची आधीच उदासीनता दिसून आली आहे. ग्रामस्थांसह आदिवासींमध्ये लसीकरणाविरोधात गैरसमज झाल्याने ज्येष्ठ नागरिक अजून पुढे आले नाहीत. पण, लाभार्थी तरुण पुढे येऊ घातला असतानाच रजिस्ट्रेशनची अट घातल्याने त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याचे चित्र ठाणे, पालघरसह राज्यभरातील गावखेड्यांत दिसत आहे.ग्रामीण भागातील लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी गावखेड्यांतील युवक लसीकरणासाठी पुढे आला आहे. ग्रामीण भागात फोनचा वापर फारसा हाेत नाही. त्यामुळे लसीकरणासाठी रजिस्ट्रेशनची अट ही डोकेदुखी ठरली आहे. ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात राज्य शासन व जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संताप व्यक्त असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. 

१ मेचा मुहूर्त जात असल्याच्या टीकेमुळे राज्य सरकारने तरुणांचे लसीकरण हाती घेतले. मात्र, लसींच्या तुटवड्यामुळे शहरांसह ग्रामीण भागाला रजिस्ट्रेशनची अट घालून केंद्रांवरील गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामीण भागात लाभार्थींच्या प्रतीक्षेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रांतील लसीकरण केंद्रे ओस पडलेली आहेत. लसीकरणासाठी नागरिकांनी पुढे यावे यासाठी जिल्हा परिषद प्रशासन गावपाड्यांमध्ये त्यांच्या भाषेत जनजागृती करत आहे. लसीकरण वाढवण्यासाठी पथकांमधील अधिकाऱ्यांच्या गाड्या गावपाड्यांच्या रस्त्यांनी धावत आहेत. 

लसीचा साठा सांभाळण्याची समस्यालसीकरण हाेत नसल्यामुळे ग्रामीण भागात उन्हाळ्यात आरोग्य केंद्रांवरील लसीचा साठा सांभाळण्याची गंभीर समस्या उभी राहिली आहे. ग्रामीण तरुणांच्या लसीकरणासाठी रजिस्ट्रेशनच्या घातलेल्या अटीमुळे आरोग्य केंद्रांवरील डाॅक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांवर तरुण राग काढत आहेत. याकडे राज्य शासनाने लक्ष देऊन लसीकरणासाठी रजिस्ट्रेशनची अट शिथिल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

 

टॅग्स :thaneठाणे