शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

गर्दीच्या वेळी विशेष लोकल सोडा; मनसेचे रेल्वेला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:07 IST

कल्याण दिशेकडील पुलाचे काम तातडीने मार्गी लावा

डोंबिवली : मध्य रेल्वेवरील वाहतूक महिनाभरापासून विलंबाने धावत असल्याने कल्याण-डोंबिवली आणि कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कार्यालयात लेटमार्क लागत असल्याने वेतनात कपात होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी गर्दीच्या वेळेत डोंबिवली आणि कल्याणहून विशेष लोकल सोडाव्यात, अशी मागणी मनसेच्या डोंबिवली शिष्टमंडळाने स्थानक प्रबंधक के. ओ. अब्राहम यांच्याकडे मंगळवारी केली.मनसेच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांसदर्भात स्थानक प्रबंधकांची भेट घेत निवेदन दिले. त्यावेळी झालेल्या चर्चेत गर्दीचे योग्य नियोजन करावे, जेणेकरून प्रवाशांचे हाल कमी होतील. तसेच डोंबिवलीत विशेष अधिकारी नेमून त्याच्याद्वारे परिस्थिती नियंत्रणात येईल, याची काळजी घ्यावी, अशी मागणी मनसेने केली. स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाचे काम सुरू असल्याने प्रवासी आणि पूर्व-पश्चिमेला ये-जा करणारे पादचारी मधल्या पुलाचा वापर करत आहेत. मात्र, टीसींनी त्यांना अडवू नये. तसेच कल्याण दिशेकडील पुलाची तातडीने दुरुस्ती करून तो प्रवाशांसाठी खुला करावा, अशीही मागणी करण्यात आली. लोकलच्या वेळापत्रकात सुधारणा न झाल्यास आणि विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती न केल्यास मनसेचे शिष्टमंडळ रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांची भेट घेईल, असेही सांगण्यात आले.दरम्यान, या शिष्टमंडळात मनसेचे शहर अध्यक्ष राजेश कदम, जिल्हा संघटक राहुल कामत, उपजिल्हा सचिव निलेश भोसले, महिला शहर अध्यक्षा मंदा पाटील, स्मिता भणगे आदी उपस्थित होते.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेMNSमनसे