शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

गर्दीच्या वेळी विशेष लोकल सोडा; मनसेचे रेल्वेला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:07 IST

कल्याण दिशेकडील पुलाचे काम तातडीने मार्गी लावा

डोंबिवली : मध्य रेल्वेवरील वाहतूक महिनाभरापासून विलंबाने धावत असल्याने कल्याण-डोंबिवली आणि कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कार्यालयात लेटमार्क लागत असल्याने वेतनात कपात होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी गर्दीच्या वेळेत डोंबिवली आणि कल्याणहून विशेष लोकल सोडाव्यात, अशी मागणी मनसेच्या डोंबिवली शिष्टमंडळाने स्थानक प्रबंधक के. ओ. अब्राहम यांच्याकडे मंगळवारी केली.मनसेच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांसदर्भात स्थानक प्रबंधकांची भेट घेत निवेदन दिले. त्यावेळी झालेल्या चर्चेत गर्दीचे योग्य नियोजन करावे, जेणेकरून प्रवाशांचे हाल कमी होतील. तसेच डोंबिवलीत विशेष अधिकारी नेमून त्याच्याद्वारे परिस्थिती नियंत्रणात येईल, याची काळजी घ्यावी, अशी मागणी मनसेने केली. स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाचे काम सुरू असल्याने प्रवासी आणि पूर्व-पश्चिमेला ये-जा करणारे पादचारी मधल्या पुलाचा वापर करत आहेत. मात्र, टीसींनी त्यांना अडवू नये. तसेच कल्याण दिशेकडील पुलाची तातडीने दुरुस्ती करून तो प्रवाशांसाठी खुला करावा, अशीही मागणी करण्यात आली. लोकलच्या वेळापत्रकात सुधारणा न झाल्यास आणि विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती न केल्यास मनसेचे शिष्टमंडळ रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांची भेट घेईल, असेही सांगण्यात आले.दरम्यान, या शिष्टमंडळात मनसेचे शहर अध्यक्ष राजेश कदम, जिल्हा संघटक राहुल कामत, उपजिल्हा सचिव निलेश भोसले, महिला शहर अध्यक्षा मंदा पाटील, स्मिता भणगे आदी उपस्थित होते.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेMNSमनसे