शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात सत्ताधाऱ्यांना मिळाला घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 04:28 IST

वाद अधिक रंगणार : क्लस्टरविरोधात शिवसेना नगरसेवकाचे रणशिंगलोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : एकीकडे क्लस्टरविरोधात काँग्रेसने उडी घेतली असताना आता गावठाण आणि कोळीवाड्यातील रहिवासीदेखील या योजनेविरोधात आंदोलन उभे करत आहेत. आता यामध्ये सत्ताधारी शिवसेना पक्षातील नगरसेवक संजय भोईर यांनीदेखील उडी घेतली आहे. त्यामुळे क्लस्टरचा वाद आणखी रंगण्याची चिन्हे यानिमित्ताने निर्माण झाली आहेत. महापालिकेने प्रसिद्ध केलेली अधिसूचना रद्द करावी आणि नव्याने महासभेची मंजुरी घेऊन अधिसूचना आणि आराखडा प्रसिद्ध करावा, अशी मागणी त्यांनी गुरुवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली.क्लस्टर योजनेचा नारळ फुटण्याआधीच त्याच्या विरोधातील एकेक बार आता फुटू लागले आहेत. एमआरटीपी कायद्याच्या कलम ३७ (१) अन्वये यूआरपीच्या प्रस्तावित नकाशांना व अधिसूचना प्रसिद्ध करण्यापूर्वी महासभेची मान्यता घेणे आवश्यक असल्याचा आक्षेप भोईर यांनी घेतला आहे. यूआरपीच्या अधिसूचनेमध्ये फक्त क्लस्टर पॉकेटचे नाव आणि क्षेत्रफळ नमूद केले असून अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा केवळ दिखावा किंवा औपचारिकता केली असल्याचे दिसून येत आहे. क्लस्टर योजनेसंबंधी शासनाच्या अधिसूचना हरकती यांचे उल्लंघन करण्यात आले आहे. यात बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, माजिवडा, गायमुख, राबोडी, कोळीवाडा, मुंब्रा, कौसा, विटावा, कोळीवाडा तसेच गावठाण परिसराचा समावेश केला आहे. परंतु, या ठिकाणाचा समावेश करण्यापूर्वी येथील रहिवाशांना विश्वासात घेणे गरजेचे होते, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. क्लस्टर योजनेबाबत अधिसूचना आणि आराखडे जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले, तरी शासनाच्या अधिसूचनेचे उल्लंघन करून तसेच एमआरटीपी कायदा १९६६ च्या कलम (१) व ३७ (१) चे उल्लंघन करून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तरी, या अधिसूचना आणि आराखडे पुनश्च सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी आणावेत, असे पत्र त्यांनी आयुक्तांना दिले. सत्ताधारी पक्षातील नगरसेवकानेच आता थेट या पत्राच्या माध्यमातून क्लस्टरला आणि आपल्याच पक्षाला आव्हान देण्याचे काम केल्याचे दिसत आहे.आधीची अधिसूचना रद्द करून नव्याने काढाक्लस्टर योजनेच्या अधिसूचनेविरोधात आता विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनीदेखील उडी घेतली आहे. त्यांनीही यासंदर्भात आयुक्तांना पत्र देऊन महापालिकेने प्रसिद्ध केलेली अधिसूचना रद्द करून ती नव्याने काढून महासभेची मान्यता घेऊन त्यानंतरच आराखडे तयार करावेत, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसShiv Senaशिवसेना