शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

कायदा, सुव्यवस्थेची जबाबदारी घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:19 IST

केडीएमसीचा रेल्वेला सवाल : कोपर दिशेकडील पुलासंदर्भात पाठवले पत्र

कल्याण : डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल २७ मेपासून बंद करावा, असे पत्र मध्य रेल्वे प्रशासनाने केडीएमसीला दिले आहे. रेल्वेकडे या पुलाची देखभाल दुरुस्ती असतानाही ती का केली नाही. आता तडकाफडकी पूल बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला गेला आहे. मात्र, पूल बंद केल्यावर शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. त्याची जबाबदारी रेल्वे प्रशासन घेणार आहे का, असा सवाल केडीएमसीने बुधवारी रेल्वे प्रशासनाला लिहिलेल्या पत्रात विचारला आहे.

कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल हा अरुंद असला, तरी त्यावरून मोठ्या प्रमाणात डोंबिवली पूर्व-पश्चिमेला वाहतूक होते. या पुलाची देखभाल दुरुस्ती रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारित होती. मात्र, रेल्वेने पुलाची वेळच्या वेळी देखभाल-दुरुस्ती करण्याऐवजी आताच पुलाचे बांधकाम जीर्ण झालेले असून तो वाहतुकीसाठी सुरक्षित नाही, असे रेल्वेने महापालिकेस पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेच्या शहर अभियंत्या सपना देवनपल्ली कोळी यांनी रेल्वेला पाठवलेल्या पत्रात प्रतिप्रश्न उपस्थित केले आहेत.

मुंबईतील पूल दुर्घटनांनंतर मध्य रेल्वेने उड्डाणपूल आणि पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट आयआयटी मुंबईकडून करून घेतले आहे. आयआयटीने दिलेल्या अहवालात डोंबिवलीतील पुलाबाबत नेमके काय म्हटले आहे, याचा कोणताच हवाला रेल्वेने महापालिकेस दिलेला नाही. अहवालातील तपशील महापालिकेस का दिला नाही, अशी विचारणा या पत्रात केली आहे.

त्याचबरोबर महापालिकेने पुलाच्या दुरुस्तीसाठी किती पैसे भरावेत, असेही रेल्वेने सांगितलेले नाही. शंभर टक्के खर्च महापालिकेने उचलायचा आहे की, निम्मा खर्च करावा लागणार आहे, याविषयी पत्रात काहीच उल्लेख केलेला नाही, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल २७ मे रोजी बंद केल्यास पर्यायी वाहतुकीची व्यवस्थाही केडीएमसीने करावी, असे रेल्वेने पत्रात म्हटले आहे. अलिकडेच महापालिका आणि रेल्वेने निम्मा खर्च उचलून ठाकुर्ली येथे रेल्वे उड्डाणपूल तयार केला आहे. मात्र, हा पूल अरुंद असल्याने त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक करणे शक्य नाही. कोपर उड्डाणपूल बंद केल्यास ठाकुर्ली पुलावरूनच पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली तरी, ठाकुर्ली पश्चिमेतील बावनचाळ परिसरातील रेल्वेच्या हद्दीतील रस्ते अरुंद आहेत. त्यावरून वाहतूक वळवणे शक्य होणार नाही. तसेच १० जूनपासून शाळा सुरूहोत आहे. पूल बंद झाल्यास शाळेच्या बसची वाहतूक कशी करायची, असा प्रश्नही कोळी यांनी रेल्वेला विचारला आहे.पर्यायी वाहतुकीचा मार्ग दिला नसल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पूल बंद केल्यावर उद्भवू शकतो. तसेच पूल बंद करण्याची सूचना वाहतूक पोलिसांना दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे की नाही, याचीही सुस्पष्टता नाही.

‘लोकग्राम’च्या पत्रावरही मौनकल्याण रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक ७ ते लोकग्रामकडे जाणारा लोकग्राम हा पादचारी पूल १८ मेच्या रात्रीपासून बंद करण्यात आला आहे. त्याविषयीही महापालिका आयुक्तांनी रेल्वेकडे विचारणा केली होती. त्यावरही रेल्वे प्रशासनाने मौन बाळगले आहे. लोकग्राम पुलाचा वापर रेल्वेचे प्रवासीच करत होते. तरीदेखील त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे रेल्वेकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने नागरिकांसह प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

पत्रीपूल सहा महिन्यांत का झाला नाही?रेल्वेने कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा ब्रिटिशकालीन पत्रीपूल धोकादायक झाला असल्याने पाडला. हा पूल सहा महिन्यांत तयार करू, असा दावा रेल्वेने केला होता. तो सहा महिन्यांत तयार का झाला नाही, असा प्रश्न कोपर पूल बंद करण्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी केला आहे.