शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा करावा

By admin | Updated: April 24, 2017 02:11 IST

लव्ह जिहादचे प्रमाण वाढते आहे. पण त्याची आकडेवारी केंद्र व राज्य सरकारकडे नाही. धर्माचा आयुध म्हणून वापर करुन अनेक

ठाणे : लव्ह जिहादचे प्रमाण वाढते आहे. पण त्याची आकडेवारी केंद्र व राज्य सरकारकडे नाही. धर्माचा आयुध म्हणून वापर करुन अनेक मुलींची, महिलांची फसवणूक केली जाते. याविरोधात केंद्र व राज्य सरकारने कडक कायदा करावा, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. २९ व्या अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनात गडकरी रंगायतन येथे ‘भारतातल्या समाज सुधारणा : विविध प्रयत्न’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात त्या बोलत होत्या.सावरकरांचे कृतीशील विचार अंगीकारण्याची गरज आहे. स्वातंत्र्यवीर सावरकारांनी स्पर्श बंदी, व्यवसाय बंदी, वेदोक्त बंदी, सिंधु बंदी, शुद्धी बंदी, रोटी - बेटी बंदी यासारख्या सात बंदीचा उल्लेख केला आहे. त्या सात बंदी आजही समाजात मूळ धरून असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सावरकरांचे विचार स्वीकारणे सोपे नाही. त्यांनी हिंदु धर्मातील सुधारणेसाठी एक प्रकारे आव्हान दिले होते आणि या आव्हानासाठी त्यांना अनेक वेळा संघर्ष करावा लागला. स्त्री विषयक ज्या ज्या सुधारणा भारतात झाल्या त्या सहजासहजी स्वीकारल्या गेल्या नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कर्वे, फुले, सावरकरांनी धर्माची चौकट बदलण्याचा प्रयत्न केला. फसवणूकीने केलेल्या धर्मांतराविरुद्ध कायदा केला पाहिजे अशी मागणी गोऱ्हे यांनी केली. आत्महत्त्या करण्यापेक्षा सावरकरांना अपेक्षित सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबावा. श्रद्धा असावी यात दुमत नाही. परंतु अंधश्रद्धेमुळे होणारे स्त्रियांचे शोषण रोखण्यासाठी कडक कायदा होण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.समाजातील अनिष्ट रुढी रोखण्यासाठी सरकारने वाट बघायला लावू नये. हिंदू धर्म सुधारावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनेक वर्षे वाट पाहावी लागली. पण तसे झाले नाही. त्यामुळे त्यांच्यासारखे धर्मांतर पुन्हा घडू नये यासाठी राजकीय नेत्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सहा ते सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. तिला न्याय मिळविण्यासाठी किती वाट बघायची, असा प्रश्न देखील उपस्थित केला. रोटी बेटी बंदी प्रमाणे काही बंदी या समाजात शिल्लक आहेत. स्वेच्छा विवाहबंदी आजही समाजात आहे असे सांगून आर्थिक- समता बंदी, जातीय समानता बंदी, स्त्री पुरूष समानता बंदी, मानव अधिकार बंदी यांचा पगडा आजही समाजावर आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)परिसंवादात सहभागी झालेले वक्ते अ‍ॅड. किशोर जावळे यांनी सावरकर ही फुंकून फुंकून पिण्यासारखी गोष्ट नाही असे सांगितले. आम्हाला सावरकर सिलेक्टेड हवे असतात. जिथे सावरकरांच्या समाजसुधारणेचा, विज्ञाननिष्ठेचा विचार येतो तेव्हा आम्ही त्यांच्यापासून दूर जातो. त्यांना एकटे पाडल्याची किंमत आज समाज मोजत आहे. हिंदुत्वाचा गाडा पुढे नेण्यासाठी त्यांना डावलून पुढे जाता येणार नाही. आज आणि उद्या त्यांचे विचार स्वीकारावेच लागतील, असे सांगत सावकरांचे विचार वाचा आणि त्यातून तुमच्यात बदल घडवा. तेव्हा समाज सुधारेल, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अशोक मोडक यांनी समाज सुधारणेसाठी दीर्घकाळ प्रयत्न करावे लागतील, यावर भर दिला. समाजातील विषमता, उच्च-नीचता संपविण्यासाठी सावरकरांचे विचार सर्वत्र पोहोचविण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)