शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

...हा तर कायद्यावरील हल्ला : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:38 IST

राज्यातील भाजपाप्रणीत सरकारने पत्रकारांवरील हल्ले रोखण्याकरिता कायदा करूनही हल्ले होतच आहेत, हे दुर्दैवी असून हा एक प्रकारे कायद्यावरील हल्ला आहे,

डोंबिवली : राज्यातील भाजपाप्रणीत सरकारने पत्रकारांवरील हल्ले रोखण्याकरिता कायदा करूनही हल्ले होतच आहेत, हे दुर्दैवी असून हा एक प्रकारे कायद्यावरील हल्ला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाºया महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा अकरावा वर्धापन दिन सोहळा रविवारी स.है. जोंधळे विद्यालयात पार पडला. या वेळी आठवले बोलत होते. ते म्हणाले की, पत्रकारांना लेखनस्वातंत्र्य असले पाहिजे व त्यांचे विचार पटले नाही, तर त्याचा प्रतिवाद अन्य वृत्तपत्र किंवा माध्यमातून केला जाऊ शकतो. मात्र, तसे न करता हल्ला करणे चुकीचे आहे. पत्रकारांनीही पुराव्याशिवाय कुणाची बदनामी होणार नाही, याचे भान बाळगणे गरजेचे आहे.पत्रकारांना संरक्षण, पेन्शन मिळाले पाहिजे. केंद्राची व राज्याची पत्रकारांना पेन्शन देणारी स्कीम असली पाहिजे. मुंबईत काम करणारे बरेच पत्रकार डोंबिवलीत राहतात. त्यांना मुंबईत स्वस्तात घरे मिळाली पाहिजेत. पत्रकारांच्या प्रश्नासाठी आपण मुख्यमंत्र्याकडे मागणी करू, असे आश्वासन आठवले यांनी दिले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मला चिंता नाही. तसेच मी त्यांच्यासोबत असल्याने त्यांनाही कसली चिंता नाही, असे मिश्कील वक्तव्य करून आठवले म्हणाले की, सध्या काँग्रेसचे दिवस जाऊन भाजपाचे आले आहेत. मोदींवर कितीही टीकाटिप्पणी झाली, तरी ते दुसºया कोणालाही आपल्यासमोर टिकू देत नाहीत.आठवले यांनी सांगितले की, दलितांवर अनेक ठिकाणी अत्याचार होत आहे, हे खरे असले तरी हळूहळू परिवर्तनही होत आहे. अनेक गावांत आणि शहरात दलित समाज आणि सवर्णीय एकत्र नांदण्याचा प्रयत्न करीत आहे. आंतरजातीय विवाह केल्यास वाद होतो. याबद्दल आवाज उठवणे, ही समाजातील पत्रकारांची जबाबदारी आहे.