शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत श्री स्वामी समर्थ मंडळाच्या बाह्य रुग्ण सेवेचा शुभारंभ :श्री गोविंदानंद श्रीराम मंदिरात उपक्रम संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 18:08 IST

.डोंबिवलीच्या श्री स्वामी समर्थ मंडळाचे संस्थापक कै. सद्गुरू भालचंद्र (अण्णा)लिमये यांच्या जयंती निमीत्त सोमवारी विश्वनाथ चिल्ड्रन मेमोरियल हॉस्पिटल प्रकल्पाच्या बाह्य रुग्ण सेवेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

ठळक मुद्देजीवनात गुरू आणि नामाचे महत्व अनन्यसाधारण- धनश्री लेलेमंडळाचे श्रीराम मंदिर लवकरच पूर्ण होणार श्री स्वामी समर्थ मंडळाचे संस्थापक कै. सद्गुरू भालचंद्र (अण्णा)लिमये

डोंबिवली- जीवनात गुरूंचे महत्व आणि नामाची शक्ती अनन्यसाधारण असून त्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. अबलवृद्धांचे आदराचे स्थान गुरू असते, लहानपणापासूनच गुरू आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवतात. गुरू शिष्य परंपरेचा मोठा वारसा आपल्या धर्माला लाभलेला आहे. गुरू शिष्यांच्या नात्याची अनेक उदाहरण आहेत, आचार्य म्हणजे कोण तर जो बोलतो तसे आचरण करतो तो आचार्य. गुरू आणि सद्गुरू यातही फरक आहे. माझ्यापेक्षा कोणीतरी आहे ती सद्ग ची भावना जपत जो मार्गदर्शन करतो तो सद्गुरू म्हणून ओळखावा असे मत प्रख्यात व्याख्यात्या , प्रवचनकार धनश्री लेले यांनी व्यक्त केले.डोंबिवलीच्या श्री स्वामी समर्थ मंडळाचे संस्थापक कै. सद्गुरू भालचंद्र (अण्णा)लिमये यांच्या जयंती निमीत्त सोमवारी विश्वनाथ चिल्ड्रन मेमोरियल हॉस्पिटल प्रकल्पाच्या बाह्य रुग्ण सेवेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

त्यावेळी श्री गोविंदानंद श्रीराम मंदिरातील ध्यानमंदिरात सम्पन्न झालेल्या उपक्रमात त्या बोलत होत्या. डोंबिवलीचे माजी नगराध्यक्ष आबा पटवारी, डॉ. वरूण पाटील, डॉ.अजित ओक, डॉ. अनघा हेरूर, मंडळाचे अध्यक्ष नित्यानंद घाटे, अध्यक्षा माधुरी घाटे, सुहास पेंडसे, यांच्यासह श्रीराम व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच निमीत्ताने मंडळाच्या संस्थापिका सुषमा लिमये यांच्या प्रेरणेने विश्वनाथ चिल्ड्रन मेमोरियल हॉस्पिटल प्रकल्पाच्या बाह्य रुग्ण सेवेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. डॉ.पाटील, पटवारी, ओक यांच्यासह घाटे दाम्पत्याने त्याचे लोकार्पण केले. मंदिराच्या जिर्णोद्गाराचे काम जोमाने सुरू असून असंख्य भक्त गणामुळे ते शक्य होत असल्याची भावना घाटे यांनी व्यक्त केली. याच निमीत्ताने मंदिराच्या 106 किलो वजनाच्या घंटेचे पूजन करण्यात आले. आपल्या पूजा-आर्चेत घंटानाद महत्वाचा आहे. त्यामुळे त्याचे पूजन तेवढेच आवश्यक असून नकारात्म भावना त्यातून काढल्या जातात, सकारात्मक ऊर्जा त्यामुळे उत्पन्न होते. त्यासाठी तो नाद खूप महत्त्वाचा असतो. म्हणून विविध देवळांमध्ये विशिष्ट वेळाने घंटानाद करला जातो. सकारात्मक असणे आणि त्यामुळे चांगली कार्य होणे ही काळाची गरज आहे. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा हा सद्गुरू कै. अण्णानी जपलेला मूलमंत्र मंडळाचे असंख्य सेवेकरी जोपासत आहेत हे महत्वाचे आहे. सेवेकरी वृंदामुळेच मंडळाची शिस्त, ख्याती सर्वत्र पसरली आहे. शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील मंडळाच्या शुभ चितकांमुळेच मंडळाची प्रगती होत असून विविध टप्पे आपण गाठत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. सद्गुरू महिमा,वारसा या ठिकाणी जोपासला जातो, तो पुढे नेला जात आहे हे देखील मंडळाचे वैशिष्ठ आहे. मंडळाचे श्रीराम मंदिर लवकरच पूर्ण होणार असून हॉस्पिटल उभे करण्याच्या दृष्टीने मंडळाची वाटचाल सुरू होत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. मंडळाच्या उपक्रमांना स्वामी भक्तांनी नेहमीच सहकार्य केले असून आगामी काळातही ते प्रेम, आपुलकी कायम ठेवावी असे आवाहन यावेळी मंडळाच्या वतीने करण्यात आले.

 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली