शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

डोंबिवलीत श्री स्वामी समर्थ मंडळाच्या बाह्य रुग्ण सेवेचा शुभारंभ :श्री गोविंदानंद श्रीराम मंदिरात उपक्रम संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 18:08 IST

.डोंबिवलीच्या श्री स्वामी समर्थ मंडळाचे संस्थापक कै. सद्गुरू भालचंद्र (अण्णा)लिमये यांच्या जयंती निमीत्त सोमवारी विश्वनाथ चिल्ड्रन मेमोरियल हॉस्पिटल प्रकल्पाच्या बाह्य रुग्ण सेवेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

ठळक मुद्देजीवनात गुरू आणि नामाचे महत्व अनन्यसाधारण- धनश्री लेलेमंडळाचे श्रीराम मंदिर लवकरच पूर्ण होणार श्री स्वामी समर्थ मंडळाचे संस्थापक कै. सद्गुरू भालचंद्र (अण्णा)लिमये

डोंबिवली- जीवनात गुरूंचे महत्व आणि नामाची शक्ती अनन्यसाधारण असून त्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. अबलवृद्धांचे आदराचे स्थान गुरू असते, लहानपणापासूनच गुरू आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवतात. गुरू शिष्य परंपरेचा मोठा वारसा आपल्या धर्माला लाभलेला आहे. गुरू शिष्यांच्या नात्याची अनेक उदाहरण आहेत, आचार्य म्हणजे कोण तर जो बोलतो तसे आचरण करतो तो आचार्य. गुरू आणि सद्गुरू यातही फरक आहे. माझ्यापेक्षा कोणीतरी आहे ती सद्ग ची भावना जपत जो मार्गदर्शन करतो तो सद्गुरू म्हणून ओळखावा असे मत प्रख्यात व्याख्यात्या , प्रवचनकार धनश्री लेले यांनी व्यक्त केले.डोंबिवलीच्या श्री स्वामी समर्थ मंडळाचे संस्थापक कै. सद्गुरू भालचंद्र (अण्णा)लिमये यांच्या जयंती निमीत्त सोमवारी विश्वनाथ चिल्ड्रन मेमोरियल हॉस्पिटल प्रकल्पाच्या बाह्य रुग्ण सेवेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

त्यावेळी श्री गोविंदानंद श्रीराम मंदिरातील ध्यानमंदिरात सम्पन्न झालेल्या उपक्रमात त्या बोलत होत्या. डोंबिवलीचे माजी नगराध्यक्ष आबा पटवारी, डॉ. वरूण पाटील, डॉ.अजित ओक, डॉ. अनघा हेरूर, मंडळाचे अध्यक्ष नित्यानंद घाटे, अध्यक्षा माधुरी घाटे, सुहास पेंडसे, यांच्यासह श्रीराम व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच निमीत्ताने मंडळाच्या संस्थापिका सुषमा लिमये यांच्या प्रेरणेने विश्वनाथ चिल्ड्रन मेमोरियल हॉस्पिटल प्रकल्पाच्या बाह्य रुग्ण सेवेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. डॉ.पाटील, पटवारी, ओक यांच्यासह घाटे दाम्पत्याने त्याचे लोकार्पण केले. मंदिराच्या जिर्णोद्गाराचे काम जोमाने सुरू असून असंख्य भक्त गणामुळे ते शक्य होत असल्याची भावना घाटे यांनी व्यक्त केली. याच निमीत्ताने मंदिराच्या 106 किलो वजनाच्या घंटेचे पूजन करण्यात आले. आपल्या पूजा-आर्चेत घंटानाद महत्वाचा आहे. त्यामुळे त्याचे पूजन तेवढेच आवश्यक असून नकारात्म भावना त्यातून काढल्या जातात, सकारात्मक ऊर्जा त्यामुळे उत्पन्न होते. त्यासाठी तो नाद खूप महत्त्वाचा असतो. म्हणून विविध देवळांमध्ये विशिष्ट वेळाने घंटानाद करला जातो. सकारात्मक असणे आणि त्यामुळे चांगली कार्य होणे ही काळाची गरज आहे. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा हा सद्गुरू कै. अण्णानी जपलेला मूलमंत्र मंडळाचे असंख्य सेवेकरी जोपासत आहेत हे महत्वाचे आहे. सेवेकरी वृंदामुळेच मंडळाची शिस्त, ख्याती सर्वत्र पसरली आहे. शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील मंडळाच्या शुभ चितकांमुळेच मंडळाची प्रगती होत असून विविध टप्पे आपण गाठत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. सद्गुरू महिमा,वारसा या ठिकाणी जोपासला जातो, तो पुढे नेला जात आहे हे देखील मंडळाचे वैशिष्ठ आहे. मंडळाचे श्रीराम मंदिर लवकरच पूर्ण होणार असून हॉस्पिटल उभे करण्याच्या दृष्टीने मंडळाची वाटचाल सुरू होत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. मंडळाच्या उपक्रमांना स्वामी भक्तांनी नेहमीच सहकार्य केले असून आगामी काळातही ते प्रेम, आपुलकी कायम ठेवावी असे आवाहन यावेळी मंडळाच्या वतीने करण्यात आले.

 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली