शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
6
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
7
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
8
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
9
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
10
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
11
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
12
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
13
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
14
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
15
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
16
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
17
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
18
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
19
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
20
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...

नव्या वेळापत्रकानंतरही लेटमार्क; प्रवाशांचे हाल कायम, अंबरनाथहून सुटणारी लोकल रोज २५ मिनिटे उशिरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 14:36 IST

मध्यंतरी प्रवासी संघटनेसोबत झालेल्या बैठकीत रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी आम्ही लांबपल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देणार असे स्पष्ट केले होते. त्यामुळे लोकल प्रवाशांना वाली कोण नाही, हे स्पष्ट झाले. 

डोंबिवली : मध्य रेल्वेची लोकल सेवा जी रुळावरून घसरली आहे ती पूर्ववत होण्याचे नावच घेत नाही. एकही दिवस असा नाही की लोकल वेळेत धावत होत्या. पूर्वी लोकल पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत होत्या. त्याची प्रवाशांना नंतर सवयही झाली. मात्र, आज परिस्थिती आहे की, लोकल २० ते २५ मिनिटे कायम उशिराने धावत आहेत. याचा फटका नोकरदारांना बसत आहे. मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले. यामुळे प्रवास सुसह्य होईल असे वाटत होते. मात्र, प्रवास असह्य होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. मध्यंतरी प्रवासी संघटनेसोबत झालेल्या बैठकीत रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी आम्ही लांबपल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देणार असे स्पष्ट केले होते. त्यामुळे लोकल प्रवाशांना वाली कोण नाही, हे स्पष्ट झाले. 

कार्यवाही करणार की बोळवणच?    अंबरनाथमधील एका प्रवाशाने एकीचे बळ दाखवले आहे. नव्या वेळापत्रकानुसार अंबरनाथहून सकाळी आठ वाजून १० मिनिटांनी सुटणारी लोकल दररोज २५ मिनिटे उशिराने धावते. त्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. अनुप मेहेत्रे यांनी या त्रासाविरोधात लढण्यासाठी प्रवाशांना हाक दिली. त्याला प्रवाशांनी प्रतिसादही दिला.    त्रस्त प्रवाशांनी एक निवेदन अंबरनाथच्या स्टेशन मास्तरांना दिले. त्यांनी याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करू, अशी ग्वाही दिली आहे. आता यावर रेल्वे प्रशासन काही कार्यवाही करणार की नेहमीप्रमाणे बोळवण करणार, याकडे अंबरनाथमधील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

जलद लोकल धिम्या मार्गावर अनेकदा जलद लोकल दादरच्या पुढे धिम्या मार्गावर वळवतात. परिणमी भायखळा ते सीएसटीएम अर्धा तास घेतात. जलद मार्गावरून लांबपल्ल्याच्या गाड्या काढण्यासाठी हे केले जाते. सर्व लोकलच्या बाबतीत हे घडत नाही. मात्र, ज्या धिम्या मार्गावर वळवितात त्यतील प्रवाशांना फटका बसतो. यामुळे धीम्या लोकलही विलंबाने धावतात. आधीच लोकल कर्जत, कसाराहून उशिरा सुटतात. वेळेत सुटल्या तर कल्याणला थांबवतात म्हणून उशीर होतो. यामुळे कल्याण ते सीएसटीएम डबल फास्ट लोकल दोन तास घेतात अशी टीका प्रवाशांनी केली आहे. 

डोंबिवलीकर प्रवाशांची गैरसोयदादरप्रमाणे डोंबिवली हे गर्दीचे ठिकाण आहे. त्या स्थानकात कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल फलाट एकवर न आणता दोनवर आणतात. यामुळे फलाटावार गर्दी होते. या लोकल एकवर आणण्यास दोन्ही बाजूंना फलाट असल्याने गर्दी विभागेल असे प्रवाशांचे म्हणणे आहे. होम फलाटावर लोकल आली तर सरकता जिन्याचा वापर प्रवाशांना करता योईल. लॉकडाऊनपासून लोकल फलाट एकवर आणणे बंद आहे. वेळोवेळी विनंती करूनही अधिकारी लक्ष देत नाही, अशी टीका प्रवाशांनी केली आहे.

टॅग्स :localलोकलpassengerप्रवासी