शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

...अखेर आमची निघाली सहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 14:33 IST

कल्याण: शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार असो अथवा तांत्रिक कारण यामुळे सलग तीन वर्षे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सहलीपासून वंचित राहावे लागले होते. परंतू यंदा ही सहल उशीरा का होईना निघाली आहे. याचा शुभारंभ शनिवारी महापौर राजेंद्र देवळेकर आणि शिक्षण समिती सभापती वैजयंती गुजर घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या शाळांमध्ये प्रामुख्याने गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. तीन वर्षानंतर निघालेल्या सहली दरम्यान विद्यार्थ्यांच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद होता.

ठळक मुद्देशनिवारपासून प्रारंभतीन वर्षांनी लुटला आनंद

कल्याण: शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार असो अथवा तांत्रिक कारण यामुळे सलग तीन वर्षे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सहलीपासून वंचित राहावे लागले होते. परंतू यंदा ही सहल उशीरा का होईना निघाली आहे. याचा शुभारंभ शनिवारी महापौर राजेंद्र देवळेकर आणि शिक्षण समिती सभापती वैजयंती गुजर घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या शाळांमध्ये प्रामुख्याने गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. तीन वर्षानंतर निघालेल्या सहली दरम्यान विद्यार्थ्यांच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद होता.गतवर्षी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता आणि केडीएमसी शिक्षण समितीची लांबणीवर पडलेली सभा यामुळे शालेय सहलीचा प्रस्ताव वेळेत मंजूर होऊ शकला नाही परिणामी विद्यार्थी सहलीपासून वंचित राहीले होते. याआधी दोन वर्षे तांत्रिक कारणामुळे देखील सहल काढण्यात आली नव्हती. दरम्यान यंदाही शिक्षण विभागाच्या भोंगळ आणि उदासिन कारभारामुळे सहल लांबणीवर पडली. सहलीच्या प्रस्तावाला स्थायी समितीची वित्तीय मान्यता घेण्यात आली नव्हती. अखेर फेब्रुवारीच्या तिस-या आठवडयात पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत हा आयत्या वेळचा यासंदर्भातला प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने मंजूरीसाठी दाखल करण्यात आला होता. तो सर्वपक्षिय सदस्यांनी एकमताने मान्य केला. शिक्षण विभागाच्या या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना सहलीचा आनंद हिवाळयात लुटता आला नव्हता. यंदा ‘मुंबई दर्शन’ हे ठिकाण निश्चित करण्यात आले. चौथी ते आठवी इयत्तेतील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांना सहलीला नेण्याचे निश्चित करण्यात आले . मुंबई दर्शनमध्ये नेहरू तारांगण, तारापोरवाला मत्स्यालय, राणीची बाग आदि ठिकाण देखील ठरविण्यात आली. परंतू नेहरू तारांगणाचे दुरूस्तीचे काम सुरू असल्याने २६ फेब्रुवारीपर्यंत ते बंद ठेवण्यात येणार होते. त्यामुळे २६ तारखेनंतरच सहल निघेल असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले होते. तर २७ फेब्रुवारीला सहल निघेल असा दावा शिक्षण समिती सभापती वैजयंती गुजर-घोलप यांनी केला होता. परंतू नेहरू तारांगणाचे दुरूस्तीचे काम २ मार्च पर्यंत चालल्याने त्यानंतरच सहल निघेल अशी माहीती शिक्षण विभागाचे उपायुक्त नितिन नार्वेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्यात १ मार्चला होळी तर २ मार्चला धुलीवंदन असल्याने मार्चच्या पहिल्या आठवडयात ही सहल निघेल असा अंदाज लोकमतने व्यक्त केला जात होता. तो अखेर खरा ठरला असून शनिवारी पहिल्या टप्प्यातील ५१० विद्यार्थी सहलीला नेण्यात आले होते. महापौर देवळेकर, सभापती घोलप यांच्या प्रमुख उपस्थिती या सहलीचा शुभारंभ झाला. यावेळी शिक्षण प्रशासन अधिकारी जे जे तडवी, विस्तार अधिकारी आर टी जगदाळे, व्ही व्ही सरकटे यांसह शिक्षक वर्ग उपस्थित होता. मुंबई दर्शनमध्ये विद्यार्थ्यांना हम्बोल्ट पेंग्विन कक्ष आणि वरळी सी-लिंकची देखील सफर घडविण्यात आली. ही सहल टप्प्याटप्याने काढली जाणार असून यामध्ये महापालिका शाळांमधील चार हजार विद्यार्थी नेण्यात येणार आहे.

 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली