शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

...अखेर आमची निघाली सहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 14:33 IST

कल्याण: शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार असो अथवा तांत्रिक कारण यामुळे सलग तीन वर्षे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सहलीपासून वंचित राहावे लागले होते. परंतू यंदा ही सहल उशीरा का होईना निघाली आहे. याचा शुभारंभ शनिवारी महापौर राजेंद्र देवळेकर आणि शिक्षण समिती सभापती वैजयंती गुजर घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या शाळांमध्ये प्रामुख्याने गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. तीन वर्षानंतर निघालेल्या सहली दरम्यान विद्यार्थ्यांच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद होता.

ठळक मुद्देशनिवारपासून प्रारंभतीन वर्षांनी लुटला आनंद

कल्याण: शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार असो अथवा तांत्रिक कारण यामुळे सलग तीन वर्षे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सहलीपासून वंचित राहावे लागले होते. परंतू यंदा ही सहल उशीरा का होईना निघाली आहे. याचा शुभारंभ शनिवारी महापौर राजेंद्र देवळेकर आणि शिक्षण समिती सभापती वैजयंती गुजर घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या शाळांमध्ये प्रामुख्याने गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. तीन वर्षानंतर निघालेल्या सहली दरम्यान विद्यार्थ्यांच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद होता.गतवर्षी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता आणि केडीएमसी शिक्षण समितीची लांबणीवर पडलेली सभा यामुळे शालेय सहलीचा प्रस्ताव वेळेत मंजूर होऊ शकला नाही परिणामी विद्यार्थी सहलीपासून वंचित राहीले होते. याआधी दोन वर्षे तांत्रिक कारणामुळे देखील सहल काढण्यात आली नव्हती. दरम्यान यंदाही शिक्षण विभागाच्या भोंगळ आणि उदासिन कारभारामुळे सहल लांबणीवर पडली. सहलीच्या प्रस्तावाला स्थायी समितीची वित्तीय मान्यता घेण्यात आली नव्हती. अखेर फेब्रुवारीच्या तिस-या आठवडयात पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत हा आयत्या वेळचा यासंदर्भातला प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने मंजूरीसाठी दाखल करण्यात आला होता. तो सर्वपक्षिय सदस्यांनी एकमताने मान्य केला. शिक्षण विभागाच्या या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना सहलीचा आनंद हिवाळयात लुटता आला नव्हता. यंदा ‘मुंबई दर्शन’ हे ठिकाण निश्चित करण्यात आले. चौथी ते आठवी इयत्तेतील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांना सहलीला नेण्याचे निश्चित करण्यात आले . मुंबई दर्शनमध्ये नेहरू तारांगण, तारापोरवाला मत्स्यालय, राणीची बाग आदि ठिकाण देखील ठरविण्यात आली. परंतू नेहरू तारांगणाचे दुरूस्तीचे काम सुरू असल्याने २६ फेब्रुवारीपर्यंत ते बंद ठेवण्यात येणार होते. त्यामुळे २६ तारखेनंतरच सहल निघेल असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले होते. तर २७ फेब्रुवारीला सहल निघेल असा दावा शिक्षण समिती सभापती वैजयंती गुजर-घोलप यांनी केला होता. परंतू नेहरू तारांगणाचे दुरूस्तीचे काम २ मार्च पर्यंत चालल्याने त्यानंतरच सहल निघेल अशी माहीती शिक्षण विभागाचे उपायुक्त नितिन नार्वेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्यात १ मार्चला होळी तर २ मार्चला धुलीवंदन असल्याने मार्चच्या पहिल्या आठवडयात ही सहल निघेल असा अंदाज लोकमतने व्यक्त केला जात होता. तो अखेर खरा ठरला असून शनिवारी पहिल्या टप्प्यातील ५१० विद्यार्थी सहलीला नेण्यात आले होते. महापौर देवळेकर, सभापती घोलप यांच्या प्रमुख उपस्थिती या सहलीचा शुभारंभ झाला. यावेळी शिक्षण प्रशासन अधिकारी जे जे तडवी, विस्तार अधिकारी आर टी जगदाळे, व्ही व्ही सरकटे यांसह शिक्षक वर्ग उपस्थित होता. मुंबई दर्शनमध्ये विद्यार्थ्यांना हम्बोल्ट पेंग्विन कक्ष आणि वरळी सी-लिंकची देखील सफर घडविण्यात आली. ही सहल टप्प्याटप्याने काढली जाणार असून यामध्ये महापालिका शाळांमधील चार हजार विद्यार्थी नेण्यात येणार आहे.

 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली