शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

खासगी सुरक्षा रक्षकांना शेवटची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST

ठाणे : ठाणे महापालिकेच्या विविध आस्थापनाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक महामंडळ आणि महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनच्या सुरक्षा रक्षकांना ...

ठाणे : ठाणे महापालिकेच्या विविध आस्थापनाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक महामंडळ आणि महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनच्या सुरक्षा रक्षकांना शेवटच्या वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुढे त्यांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय बुधवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला. या निर्णयामुळे स्थानिकांना या ठिकाणी प्राधान्य मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

ठाणे महापालिकेच्या सेवेत काही वर्षांपासून सानपाडा सुरक्षा रक्षक महामंडळ आणि महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. सानपाडा सुरक्षा रक्षक महामंडळाकडून १० पर्यवेक्षक आणि ३७५ सुरक्षा रक्षक, तर महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनकडून १५५ सुरक्षा रक्षक पालिकेने घेतले होते. या सुरक्षा रक्षकांची एक वर्षाच्या कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली होती. त्यांची वर्षभराची मुदत संपत आल्यानंतर त्यांना वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे. या सुरक्षा रक्षकांच्या वेतनात दर दोन वर्षांनी, तर इतर भत्त्यांमध्ये सहा महिन्यांनी वाढ होते. दरम्यान, बुधवारी झालेल्या महासभेत या सुरक्षा रक्षकांना एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा आणि त्याच्या वेतनापोटी येणाऱ्या १९ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवला होता. या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला. या दोन्ही कंपन्यांकडून सुरक्षा रक्षक घेणे बंद करा आणि त्याऐवजी शहरातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक देवराम भोईर यांनी केली. त्यांची ही मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी लावून धरली. या दोन्ही महामंडळाच्या सुरक्षा रक्षकांना पालिका अधिकाऱ्याइतकेच वेतन मिळत आहे. त्यामुळे पालिकेत नेमणूक व्हावी यासाठी महामंडळामध्ये पैसे घेतले जातात, असा आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी केला. मुदतवाढीच्या प्रस्तावात आता मान्यता देत आहोत. परंतु, यापुढे मान्यता देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. सुरक्षा रक्षक नेमण्यासंबंधीचे नवे धोरण लवकरच तयार करून ते महासभेपुढे सादर करावे, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.