शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

३० कोटींची जमीन पुन्हा सरकारजमा

By admin | Updated: July 28, 2016 01:10 IST

वसई तालुक्यातील जुचंद्र गावातील २८० गुंठे सरकारी खाजण जमीन भूमाफियांच्या तोंडातून काढून पुन्हा सरकारजमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय वसईच्या प्रांताधिकाऱ्यांनी दिला आहे

कोल्हापूर : हद्दवाढ करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वस्वी ताकद पणाला लावली असली तरी त्यांनी एकदा उपनगरांत येऊन महापालिका काय सोयी-सुविधा देते ते पाहावे आणि मग आम्हाला जरूर शहरात बोलवावे, अशा भावना प्रस्तावित हद्दवाढीतील ग्रामस्थांच्या आहेत. आमच्या भावना पायदळी तुडवून दाबून हद्दवाढीचा निर्णय घेतला तर उद्रेक होईल, असा निर्वाणीचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. राज्य सरकारने हद्दवाढीची अधिसूचना काढल्याने प्रस्तावित अठरा गावांत पुन्हा असंतोष पसरला आहे. सरकारच्या भूमिकेविरोधात जनआंदोलन उभारण्याची तयारी ग्रामीण जनतेने केली असून त्याचा पहिला टप्पा म्हणून ‘गाव बंद’ करून अधिसूचनेचा निषेध केला. कोल्हापूर शहराच्या चारही कोपऱ्यांतील मार्ग रोखत जनतेने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी हद्दवाढीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दादांनी हद्दवाढीला जरूर मान्यता द्यावी, पण किमान महापालिकेच्या हद्दीतील उपनगरांत फेरफटका मारून तेथील जनतेशी संवाद साधावा. रस्ते, पाणी, आरोग्य, शाळा या प्राथमिक सुविधांची वानवा पाहावयास मिळत आहे. रस्ते आहेत तर गटर्स नाहीत आणि शाळा आहेत, तर वर्गखोल्या नाहीत. अशी महापालिकेची अवस्था आहे. जे नागरिक शहरात राहतात त्यांच्याशी संवाद साधावा, ते समाधानी असतील, तर जरूर हद्दवाढ करावी; पण कराच्या रूपाने स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला फरफटत शहरात घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये, अशा भावना अठरा गावांतील जनतेच्या आहेत. (प्रतिनिधी)स्मार्ट सिटी कसली ‘स्मार्ट व्हिलेज’चौदाव्या वित्त आयोग, डोंगरी विकास निधीतून कोट्यवधी रुपये ग्रामपंचायतींना मिळत असल्याने एक-एक गाव विकासाच्या बाबतीत मॉडेल बनली आहेत. महापालिका ‘स्मार्ट सिटी’साठी धडपड असली तरी त्या अगोदर आमची ‘स्मार्ट व्हिलेज’ झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत. उपनगर भकास करणारे विकास काय करणार ज्यांना ४० वर्षांत उपनगरांचा विकास करता आला नाही. उपनगरांतील नागरिक रोज महापालिकेच्या नावाने खडे फोडतात, असे कर्तृत्वशून्य प्रशासन आमच्या गावांना शहरात घेऊन भकास करणार काय, अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामीण भागात उमटत आहेत.जनमत काय म्हणते...चौदाव्या वित्त आयोगातून कोट्यवधी रुपये ग्रामपंचायतींना आगामी पाच वर्षांच्या विकासासाठी पैसे आले आहेत. पायाभूत सुविधांच्या बाबतीत समृद्ध असताना शहरात कशासाठी जायचे? गायरान जमिनी हडप करण्याचा काहींचा डाव हाणून पाडू.- सर्जेराव पाटील, माजी उपसरपंच, गडमुडशिंगीउपनगरांतील जागा संपल्याने काहींनी शहराशेजारील गावांकडे मोर्चा वळविला आहे. शेतकरी जमिनी कसून पोट भरतात, त्या जमिनींचे बाजारीकरण करण्यासाठी यांना गावे शहरात पाहिजे आहेत.- दीपक तिवले, उपसरपंच, कळंबे तर्फ ठाणेग्रामपंचायत असताना घरोघरी कचरा गाडी येते, पाणी सुरळीत आहे. सामान्य माणसाला परवडेल असे कर असताना शहरात कशासाठी जायचे? आमचा गावच बरा आहे. - नामदेव पाटील, पाचगांववाढीव घरफाळा, पाणीपट्टी, बांधकाम परवाना घेण्यासाठी हेलपाटे हे आम्हाला सोसणार नाहीत. आमच्या गावात सुखी असताना कोणी इच्छेविरोधात शहरात घेण्याचा प्रयत्न केला तर उत्तर दिले जाईल. - राजू दिवसे, नागदेववाडीरस्ते, गटर्स, पाणी सगळ्या सुविधांनी गावे सुसज्ज असताना शहरात कशासाठी यायचे? ग्रामपंचायतींचा कारभार महापालिकेपेक्षा स्वच्छ व चांगला असल्याने सामान्यांची कामे लवकर होतात. सरकारने जनतेच्या भावनेचा आदर करून निर्णय घ्यावा. - अनिल शिंदे, उचगाव