शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

भिवंडीच्या डोंगरातील जंगलास आग,वनाधिकाऱ्यांची बघ्याची भूमीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 02:09 IST

भिवंडी : भिवंडी -वसई मार्गावरील खारबाव गावालगत असलेल्या तुंगारेश्वर डोंगरातील जंगलात सोमवार रात्री आठ वाजताच्या सुमारास अचानक वणवा भडकल्याने ...

ठळक मुद्देआॅक्टोबर हिटने जंगलातील सुकले गवत व साचला पाळापाचोळाआगीत जळाले पावसाळ्यात बहरलेले वृक्षआगीने वनसंपदा धोक्यात,उपाययोजनाची गरज

भिवंडी: भिवंडी-वसई मार्गावरील खारबाव गावालगत असलेल्या तुंगारेश्वर डोंगरातील जंगलात सोमवार रात्री आठ वाजताच्या सुमारास अचानक वणवा भडकल्याने जंगलातील वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही आग विझवण्यासाठी वनविभागाकडे कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांनी बघ्याची भूमीका घेतली.सध्या आॅक्टोबर हिट पसरल्याने जंगलातील वाढलेले गवत व झाडांचा पालापाचोळा सुकून पडलेला आहे. त्यामुळे तेथे पडलेली छोटी ठिणगीने आगीचे रु प धारण केले. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जंगलात अचानक लेगलेल्या आगीचा वणवा झाला तरी ही आग विझविण्याचे उपाययोजना सरकारी यंत्रणेकडे नव्हती. त्यामुळे घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी आले नाहीत. हा वणवा नियंत्रणाच्या बाहेर जाऊन जंगलातील अनेक झाडे जळून भस्मसात झाली. हे जंगल मांडवी वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत येते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाकडे कोणतीही उपाययोजना नव्हती. त्यामुळे डोंगराला लागलेली आग बघण्यापलीकडे वन अधिकाºयांना काहीच करता आले नाही. पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे लावा, झाडे जगवा अशी गर्जना करणाºया सरकारने भविष्यात वाढलेल्या वनसंपदेचे नुकसान टाळण्यासाठी कठोर उपाय योजना हाती घेणे गरजेचे आहे. आधीच ग्रामिण भागातून जाणारे रस्ते व विविध योजनांमुळे वृक्षहानी होत आहे. त्यातच वर्षानुवर्षे बहरलेली वनसंपदा रक्षणासाठी परिसरांतील नागरिक प्रयत्न करीत असतात. तरी देखील तालुक्यातील जंगलात वृक्षतोडीचे प्रकार घडून साग व बहुपयोगी झाडांची तस्करी होत असते. अशा स्थितीत पावसाळ्यात तोडलेल्या वृक्षांना अंकूर फुटून आपोआप जंगल वाढत असते. मात्र असे वणवे पेटल्यास जंगलात रहाणाºया श्वापदे आाणि इतर जनावरे आसºयासाठी लोकवस्तीत धाव घेतील अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वणव्याच्या आगीवर नियंत्रण करण्याची साधने शासनाने निर्माण केली पाहिजे. तरच आगीने धोका झालेली वनसंपदांचे संरक्षण करता येणे शक्य आहे.,अशा प्रतिक्रीया परिसरांतील नागरिकांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीfireआग