शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

भिवंडीच्या डोंगरातील जंगलास आग,वनाधिकाऱ्यांची बघ्याची भूमीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 02:09 IST

भिवंडी : भिवंडी -वसई मार्गावरील खारबाव गावालगत असलेल्या तुंगारेश्वर डोंगरातील जंगलात सोमवार रात्री आठ वाजताच्या सुमारास अचानक वणवा भडकल्याने ...

ठळक मुद्देआॅक्टोबर हिटने जंगलातील सुकले गवत व साचला पाळापाचोळाआगीत जळाले पावसाळ्यात बहरलेले वृक्षआगीने वनसंपदा धोक्यात,उपाययोजनाची गरज

भिवंडी: भिवंडी-वसई मार्गावरील खारबाव गावालगत असलेल्या तुंगारेश्वर डोंगरातील जंगलात सोमवार रात्री आठ वाजताच्या सुमारास अचानक वणवा भडकल्याने जंगलातील वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही आग विझवण्यासाठी वनविभागाकडे कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांनी बघ्याची भूमीका घेतली.सध्या आॅक्टोबर हिट पसरल्याने जंगलातील वाढलेले गवत व झाडांचा पालापाचोळा सुकून पडलेला आहे. त्यामुळे तेथे पडलेली छोटी ठिणगीने आगीचे रु प धारण केले. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जंगलात अचानक लेगलेल्या आगीचा वणवा झाला तरी ही आग विझविण्याचे उपाययोजना सरकारी यंत्रणेकडे नव्हती. त्यामुळे घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी आले नाहीत. हा वणवा नियंत्रणाच्या बाहेर जाऊन जंगलातील अनेक झाडे जळून भस्मसात झाली. हे जंगल मांडवी वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत येते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाकडे कोणतीही उपाययोजना नव्हती. त्यामुळे डोंगराला लागलेली आग बघण्यापलीकडे वन अधिकाºयांना काहीच करता आले नाही. पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे लावा, झाडे जगवा अशी गर्जना करणाºया सरकारने भविष्यात वाढलेल्या वनसंपदेचे नुकसान टाळण्यासाठी कठोर उपाय योजना हाती घेणे गरजेचे आहे. आधीच ग्रामिण भागातून जाणारे रस्ते व विविध योजनांमुळे वृक्षहानी होत आहे. त्यातच वर्षानुवर्षे बहरलेली वनसंपदा रक्षणासाठी परिसरांतील नागरिक प्रयत्न करीत असतात. तरी देखील तालुक्यातील जंगलात वृक्षतोडीचे प्रकार घडून साग व बहुपयोगी झाडांची तस्करी होत असते. अशा स्थितीत पावसाळ्यात तोडलेल्या वृक्षांना अंकूर फुटून आपोआप जंगल वाढत असते. मात्र असे वणवे पेटल्यास जंगलात रहाणाºया श्वापदे आाणि इतर जनावरे आसºयासाठी लोकवस्तीत धाव घेतील अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वणव्याच्या आगीवर नियंत्रण करण्याची साधने शासनाने निर्माण केली पाहिजे. तरच आगीने धोका झालेली वनसंपदांचे संरक्षण करता येणे शक्य आहे.,अशा प्रतिक्रीया परिसरांतील नागरिकांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीfireआग