शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अंगणवाड्यांत शुद्ध पाण्याचा अभाव; शंभर दिवसांत पाणी देण्याचे उद्दिष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 03:37 IST

५२,२६९ अंगणवाड्यांमधील चित्र

-  नारायण जाधवठाणे : पुरोगामी आणि नगरविकाससह औद्योगिक विकासाच्या गप्पा मारणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील ४४९ ग्रामीण व एकात्मिक आदिवासी बालविकास प्रकल्पांतर्गत ९३ हजार ६७५ अंगणवाड्या असून, यापैकी तब्बल ५२ हजार २६९ अंगणवाड्यांमध्ये २४ तास शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याचे वास्तव आहे. हि भीषण बाब समोर आल्यानंतर उशिरा का होईना, आता जल जीवन मिशन अंतर्गत या अंगणवाड्यांना येत्या १०० दिवसांत शुद्ध पाणी देण्याचे लक्ष्य पाणीपुरवठा विभागाने ठेवले आहे. यासाठी ग्रामपंचायती, अंगणवाडी सेविका, महिला बालविकास विभाग, संबंधित जिल्हा परिषद, सर्व शिक्षा अभियानांची मदत घेतली जाणार आहे. त्यांनी सर्व्हे करून ज्या अंगणवाड्यांत पाणी नाही, त्यांच्या माहितीसह सध्या उपलब्ध असलेले पाण्याचे स्रोत आणि उपायांची माहिती दिल्यानंतर संबंधित अंगणवाडीत २४ तास शुद्ध पाणीपुरठा करण्याचे उद्दिष्ट आहे. अंगणवाडीत ० ते सहा वयोगटांतील बालके, गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलींची काळजी घेतली जाते. मात्र, महाराष्ट्रातील तब्बल ५२ हजार २६९ अंगणवाड्यांमध्ये पाणीच नसल्याने, यांच्या तेथे येणाऱ्या उपरोक्त घटकांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण होतो. शु्द्ध पाण्याअभावी त्यांना तासनतास तहानलेेले राहावे लागते किंवा अशुद्ध पाणी प्यावे लागते, तसेच अनेक ठिकाणी पाणीच नसल्याने नैसर्गिक विधी करण्यासही अडचणी निर्माण होऊन ते अनारोग्याच्या खाईत सापडत आहेत.शुद्ध पाण्यासाठी शोधले चार उपाय अंगणवाडीत शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी चार उपाय शोधले आहेत. यात ज्या अंगणवाडीच्या परिसरात शुद्ध पाण्याची बोअरवेल आहे, तेथे सबमर्सिबल पंप बसवून पाणी द्यावे, बोअरवेलला हंगामी पाणी असल्यास भूजल तज्ज्ञांचे मत घेऊन त्यात सुधारणा करून पाणी पुरविणे, गावात पाणीपुरवठा योजना आहे, परंतु भौगोलिक अंतरामुळे अंगणवाडीला शुुद्ध पाणी देणे शक्य नाही, तेथे नळपाणीपुरवठा योजनेतून पाइपलाइन टाकून नळजोडणी देणे आणि पाणीपुरवठा योजना आहे, परंतुु त्यात काही बिघाड असल्यास तो दुुरुस्त करून अंगणवाडीस पाणी देेणे असे हे चार उपाय आहेत.आरोग्याचा प्रश्न   महाराष्ट्रातील तब्बल ५२ हजार २६९ अंगणवाड्यांमध्ये पाणीच नसल्याने, यांच्या तेथे येणाऱ्या घटकांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण होतो. शु्द्ध पाण्याअभावी त्यांना तासनतास तहानलेेले राहावे लागते .