शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांत शुद्ध पाण्याचा अभाव; शंभर दिवसांत पाणी देण्याचे उद्दिष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 03:37 IST

५२,२६९ अंगणवाड्यांमधील चित्र

-  नारायण जाधवठाणे : पुरोगामी आणि नगरविकाससह औद्योगिक विकासाच्या गप्पा मारणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील ४४९ ग्रामीण व एकात्मिक आदिवासी बालविकास प्रकल्पांतर्गत ९३ हजार ६७५ अंगणवाड्या असून, यापैकी तब्बल ५२ हजार २६९ अंगणवाड्यांमध्ये २४ तास शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याचे वास्तव आहे. हि भीषण बाब समोर आल्यानंतर उशिरा का होईना, आता जल जीवन मिशन अंतर्गत या अंगणवाड्यांना येत्या १०० दिवसांत शुद्ध पाणी देण्याचे लक्ष्य पाणीपुरवठा विभागाने ठेवले आहे. यासाठी ग्रामपंचायती, अंगणवाडी सेविका, महिला बालविकास विभाग, संबंधित जिल्हा परिषद, सर्व शिक्षा अभियानांची मदत घेतली जाणार आहे. त्यांनी सर्व्हे करून ज्या अंगणवाड्यांत पाणी नाही, त्यांच्या माहितीसह सध्या उपलब्ध असलेले पाण्याचे स्रोत आणि उपायांची माहिती दिल्यानंतर संबंधित अंगणवाडीत २४ तास शुद्ध पाणीपुरठा करण्याचे उद्दिष्ट आहे. अंगणवाडीत ० ते सहा वयोगटांतील बालके, गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलींची काळजी घेतली जाते. मात्र, महाराष्ट्रातील तब्बल ५२ हजार २६९ अंगणवाड्यांमध्ये पाणीच नसल्याने, यांच्या तेथे येणाऱ्या उपरोक्त घटकांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण होतो. शु्द्ध पाण्याअभावी त्यांना तासनतास तहानलेेले राहावे लागते किंवा अशुद्ध पाणी प्यावे लागते, तसेच अनेक ठिकाणी पाणीच नसल्याने नैसर्गिक विधी करण्यासही अडचणी निर्माण होऊन ते अनारोग्याच्या खाईत सापडत आहेत.शुद्ध पाण्यासाठी शोधले चार उपाय अंगणवाडीत शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी चार उपाय शोधले आहेत. यात ज्या अंगणवाडीच्या परिसरात शुद्ध पाण्याची बोअरवेल आहे, तेथे सबमर्सिबल पंप बसवून पाणी द्यावे, बोअरवेलला हंगामी पाणी असल्यास भूजल तज्ज्ञांचे मत घेऊन त्यात सुधारणा करून पाणी पुरविणे, गावात पाणीपुरवठा योजना आहे, परंतु भौगोलिक अंतरामुळे अंगणवाडीला शुुद्ध पाणी देणे शक्य नाही, तेथे नळपाणीपुरवठा योजनेतून पाइपलाइन टाकून नळजोडणी देणे आणि पाणीपुरवठा योजना आहे, परंतुु त्यात काही बिघाड असल्यास तो दुुरुस्त करून अंगणवाडीस पाणी देेणे असे हे चार उपाय आहेत.आरोग्याचा प्रश्न   महाराष्ट्रातील तब्बल ५२ हजार २६९ अंगणवाड्यांमध्ये पाणीच नसल्याने, यांच्या तेथे येणाऱ्या घटकांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण होतो. शु्द्ध पाण्याअभावी त्यांना तासनतास तहानलेेले राहावे लागते .