शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

ठाणेकरांच्या वाढीव पाण्याला निधीची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणेकरांना कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याची ओरड सुरू होती; परंतु आता टेमघर येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाणेकरांना कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याची ओरड सुरू होती; परंतु आता टेमघर येथे पाच नवीन पंप बसवून त्या माध्यमातून ठाणेकरांना वाढीव १०० दशलक्ष पाणी मिळणार आहे. यामुळे ठाण्यातील सर्वच भागांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होईल, असा दावा केला आहे; परंतु पंप आले असले तरी त्यांच्या ठेकेदाराचे कामाचे देयक अद्यापही महापालिकेने दिलेले नाही. यामुळे जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत काम न करण्याचा इशाराच ठेकेदाराने दिला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बरी नसल्याने सध्या ठेकेदारांची बिले थकली आहेत.

टेमघर येथे आलेल्या पाच पंपांची पाहणी नुकतीच स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांनी केली होती. त्यानंतर ते बसविण्याचे काम लवकरच सुरू करून ठाणेकरांना अधिकचे पाणी मिळेल, असा दावा त्यांनी केला होता; परंतु या वाढीव पाण्याच्या मार्गात आता निधीचा अडसर उभा ठाकला आहे. ठाणे महापालिकेने हे पंप खाजगी ठेकेदाराकडून मागविले आहेत. या पंपासह इतर कामांचा खर्च हा साधारणपणो १६ कोटींच्या वर जाणारा आहे; परंतु यातील थोडीसुद्धा रक्कम संबंधित ठेकेदाराला अद्यापही दिलेली नाही.

महापालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित ठेकेदाराने पंप आणले आहेत; परंतु आता किमान थोडी तरी रक्कम मिळाली तरच काम सुरू करेन, असे त्याने सांगितले आहे. शिवाय त्याच्या इतर कामांचीदेखील देयके त्याला अद्याप मिळालेली नाहीत. यामुळे बिल मिळत नाही तोपर्यंत काम करणार नसल्याचे त्याने कळविल्याचेही सूत्रे म्हणाली. कोरोनामुळे सध्या पालिकेची परिस्थिती बेताची असून, उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना पालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ठाणेकरांना हे वाढीव पाणी केव्हा मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

कामे बंद करण्याचा ठेकेदारांचा इशारा

मागील १५ दिवसांपूर्वी ठेकेदारांनी बिले मिळावीत या मागणीसाठी महापालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी याच ठेकेदारांनी पुन्हा महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना अल्टिमेटम दिला आहे. बिले अदा केली नाहीत, तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर कामे बंद करू, असा इशारा दिला आहे.

स्थानिक ठेकेदारांत नाराजी

ठाण्यातील ठेकेदारांची एक प्रकारे साखळी आहे; परंतु ती मोडीत काढून बाहेरील ठेकेदाराने ठाण्यात मागील काही वर्षांत जम बसविला आहे. जी कामे वाढीव दराने करता येऊ शकतात, तीच तो कमी दराने करून देत आहे; परंतु यावरून स्थानिक ठेकेदारांची डोकेदुखी वाढली आहे. त्या ठेकेदाराकडून कामाचा दर्जा राखला जात नसल्याचे स्थानिक ठेकेदारांचे म्हणणे आहे. असे असताना नंतर पुन्हा त्या कामासाठी वाढीव निधी खर्च होत आहे. त्यामुळे अशा ठेकेदाराचा बंदोबस्त करण्याची मागणी या ठेकेदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.