शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

श्रमजीवी संघटनेचा सफाई व उद्यान विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगारासाठी पुन्हा आंदोलन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 20:01 IST

काही पदाधिकारी आणि अधिकारी पगार होऊ देत नसल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेने आज बुधवारी पुन्हा आंदोलन केले. 

मीरारोड - मीरा-भाईंदर महापालिकेतील कंत्राटी सफाई व उद्यान विभागातील कामगारांचा पगार देण्यासाठी आयुक्तांनी धनादेश तयार करून ठेवलेला असतानादेखील काही पदाधिकारी आणि अधिकारी पगार होऊ देत नसल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेने आज बुधवारी पुन्हा आंदोलन केले. 

महापालिकेतील दैनंदिन साफसफाईसाठी ठेकेदार नेमलेला असून सदर ठेकेदाराच्या माध्यमातून शार सफाईचे काम कंत्राटी सफाई कामगार करत आहेत. तर पालिकेच्या उद्यान विभागात देखील ठेक्याने मजूर काम करत आहेत. सदर कामगारांना सप्टेंबर संपायला आला तरी ऑगस्ट महिन्याचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे कामगारांनी पालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाबाहेर शुक्रवारी सायंकाळी धरणे आंदोलन केले होते.

श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांच्याशी पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड आणि उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी चर्चा केली. महापालिकेकडे असणारा निधी अपुरा असून, राज्य सरकारकडून अनुदान येत नाही. त्यामुळे कामगारांचा पगार द्यायला उशीर होतो. बुधवारपर्यंत कामगारांचे पगार होतील. यापुढे आधी पगार सफाई कामगारांचा होईल त्यानंतर इतर विभागाचे पगार करू, असे आश्वासन पालिकेच्या वतीने देण्यात आले होते. 

आयुक्तांच्या आदेशानुसार ठेकेदाराचा धनादेश तयार करून ठेवला होता. परंतु पालिकेतील काही पदाधिकारी हे अधिकाऱ्यांना हा पगार करू देत नव्हते. याची माहिती पंडित यांनी आयुक्तांना कळविल्यावर आयुक्तांनी तात्काळ कारवाई करीत उद्याच पगार करण्याचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला.  परंतु आज बुधवारी पगार झाला नाही म्हणून दुपारी ३ वाजता आपले काम पूर्ण केल्यावर कंत्राटी कामगारांनी नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे एकत्र जमून पगार रोखणाऱ्या त्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांचा निषेध केला. 

पगार रखडल्याने कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक अडचण होत असून घर खर्च चालवणे अवघड झाले आहे. अनेकांना घरभाडे भरणे शक्य होत नाही. प्रवासासाठी पैसे नाहीत अशी परिस्थिती कामगारांची झाल्याने पालिकेने कामगारांची काळजी घेतली पाहिजे, असे श्रमजीवीचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल म्हणाले. ठाणे जिल्हाध्यक्ष दिलीप गोतारणे यांच्या सहकार्याने प्रभारी अध्यक्ष मंगेश मोरे, चेतन पाटील, रत्नाकर पाटील, हनुमंता जाधव, दिगंबर मेहर, संदीप पाटील, दीपक पाटील, इरफान शेख रमेश गोरेकर आणि इतर संघटक यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले, असे प्रवक्ते मंगेश मोरे यांनी सांगितले.