शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

कामगार कार्यालय, महसुल विभागाच्या दिरंगाईने यंत्रमाग कामगार आपल्या हक्कापासून वंचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 14:50 IST

भिवंडी : पाच वर्षापेक्षा जास्त काळ ठाणे कामगार न्यायालयांत आपल्या हक्कासाठी लढलेल्या कामगारांना न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही स्थानिक कामगार कार्यालय व महसुल विभागाकडून यंत्रमाग कामगारांना आर्थिक भरपाई मिळत नसल्याने हे कामगार वर्षानुवर्षे ापल्या हक्कापासून वंचीत राहिले आहेत.शहरात आणि परिसरांत सुमारे ४० हजारापेक्षा जास्त यंत्रमाग आस्थापना असुन त्यामध्ये सुमारे आठ लाख यंत्रमागांचा ...

ठळक मुद्देयंत्रमाग कामगारांच्या हक्कासाठी संयुक्तीक कारवाई अपेक्षीतपरप्रांतातून आलेल्या कामगारांना ठेवले जाते वंचीतकामगार न्यायालयाने न्याय देऊनही अंंमलबजावणी नाही

भिवंडी: पाच वर्षापेक्षा जास्त काळ ठाणे कामगार न्यायालयांत आपल्या हक्कासाठी लढलेल्या कामगारांना न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही स्थानिक कामगार कार्यालय व महसुल विभागाकडून यंत्रमाग कामगारांना आर्थिक भरपाई मिळत नसल्याने हे कामगार वर्षानुवर्षे ापल्या हक्कापासून वंचीत राहिले आहेत.शहरात आणि परिसरांत सुमारे ४० हजारापेक्षा जास्त यंत्रमाग आस्थापना असुन त्यामध्ये सुमारे आठ लाख यंत्रमागांचा समावेश आहे. हे यंत्रमाग चालविण्यासह इतर कामाकरीत सुमारे ५ लाखापेक्षा जास्त यंत्रमाग कामगार काम करीत आहेत. गेल्या पन्नास वर्षापासून शासनाने यंत्रमाग मालकांना नोटीसा बजावून देखील यंत्रमाग मालकांनी कामगारांना हजेरीकार्ड दिलेले नाहीत. कामगारांकडे हजेरीकार्ड नसल्याने त्यांना शासन नियमांप्रमाणे कामगारांचे हक्क मिळत नाही. किमान वेतनासह इतर सोयी सवलती मिळत नाही.त्यामुळे यंत्रमाग कामगार आपल्या हक्कापासून वंचीत राहिला आहे. एकाच यंत्रमाग कारखान्यात १५ वर्षापेक्षा जास्त काम करणाऱ्या कामगारांना त्यांना कोणतेही हक्क अथवा इतर लाभ मिळत नसल्याने त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे यंत्रमाग कामगार आपल्या हक्कासाठी कामगार न्यायालयाकडे धाव घेत आहेत. कामगार न्यायालयांत ५ ते ६ वर्षे केस लढल्या नंतर न्यायालयाकडून निर्णय होऊन कामगारांना आर्थिक भरपाई करण्याचे आदेश होतात. या आदेशाची अंमल बजावणी करण्याची जबाबदारी संबधित कामगार न्यायालय शहरातील कामगार अधिकाºयांवर सोपवितात. परंतू हे अधिकारी थेट यंत्रमाग मालकाशी संपर्क न साधता या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरीता ते आदेश जिल्हाधिकारीकडे पाठवितात. जिल्हाधिकारी ते आदेश स्थानिक महसुल विभागाकडे पाठवितात. अशा प्रकारचे शेकडो कामगारांची लाखो रूपयांची देणी वसुल करण्याचे आदेश तहसिल कार्यालयाकडे धूळ खात पडून आहेत. एक वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटूनही यंत्रमाग मालकांकडून लाखो रूपयांची वसुली महसुल विभागाने केली नाही. शहरात असलेला यंत्रमाग कामगार देशांतील विविध भागातून आलेला आहे. त्याचा गैरफायदा घेत यंत्रमाग मालक कामगारांवर अन्याय करतात. तर न्यायालयांतून न्याय मिळवून देखील शासनाचे आधिकारी कामगारांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळण्यापासून वंचीत ठेवत असल्याचा आरोप कामगार संघटनेच्या पदाधिकाºयांकडून केला जात आहे. कामगार न्यायालयाच्या निर्णयानंतर आर्थिक भरपाईच्या वसुलीची जबाबदारी महसुल विभागाकडे सोपविल्यानंतर स्थानिक कामगार अधिकारी त्याचा पाठपुरावा करीत नाही. त्यामुळे महसुल आधिकारी व कामगार अधिकारी यांनी संयुक्तीक कारवाई करून कामगारांना आर्थिक भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी यंत्रमाग कामगार संघटनांनी केली आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीbusinessव्यवसाय