शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कामगार कार्यालय, महसुल विभागाच्या दिरंगाईने यंत्रमाग कामगार आपल्या हक्कापासून वंचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 14:50 IST

भिवंडी : पाच वर्षापेक्षा जास्त काळ ठाणे कामगार न्यायालयांत आपल्या हक्कासाठी लढलेल्या कामगारांना न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही स्थानिक कामगार कार्यालय व महसुल विभागाकडून यंत्रमाग कामगारांना आर्थिक भरपाई मिळत नसल्याने हे कामगार वर्षानुवर्षे ापल्या हक्कापासून वंचीत राहिले आहेत.शहरात आणि परिसरांत सुमारे ४० हजारापेक्षा जास्त यंत्रमाग आस्थापना असुन त्यामध्ये सुमारे आठ लाख यंत्रमागांचा ...

ठळक मुद्देयंत्रमाग कामगारांच्या हक्कासाठी संयुक्तीक कारवाई अपेक्षीतपरप्रांतातून आलेल्या कामगारांना ठेवले जाते वंचीतकामगार न्यायालयाने न्याय देऊनही अंंमलबजावणी नाही

भिवंडी: पाच वर्षापेक्षा जास्त काळ ठाणे कामगार न्यायालयांत आपल्या हक्कासाठी लढलेल्या कामगारांना न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही स्थानिक कामगार कार्यालय व महसुल विभागाकडून यंत्रमाग कामगारांना आर्थिक भरपाई मिळत नसल्याने हे कामगार वर्षानुवर्षे ापल्या हक्कापासून वंचीत राहिले आहेत.शहरात आणि परिसरांत सुमारे ४० हजारापेक्षा जास्त यंत्रमाग आस्थापना असुन त्यामध्ये सुमारे आठ लाख यंत्रमागांचा समावेश आहे. हे यंत्रमाग चालविण्यासह इतर कामाकरीत सुमारे ५ लाखापेक्षा जास्त यंत्रमाग कामगार काम करीत आहेत. गेल्या पन्नास वर्षापासून शासनाने यंत्रमाग मालकांना नोटीसा बजावून देखील यंत्रमाग मालकांनी कामगारांना हजेरीकार्ड दिलेले नाहीत. कामगारांकडे हजेरीकार्ड नसल्याने त्यांना शासन नियमांप्रमाणे कामगारांचे हक्क मिळत नाही. किमान वेतनासह इतर सोयी सवलती मिळत नाही.त्यामुळे यंत्रमाग कामगार आपल्या हक्कापासून वंचीत राहिला आहे. एकाच यंत्रमाग कारखान्यात १५ वर्षापेक्षा जास्त काम करणाऱ्या कामगारांना त्यांना कोणतेही हक्क अथवा इतर लाभ मिळत नसल्याने त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे यंत्रमाग कामगार आपल्या हक्कासाठी कामगार न्यायालयाकडे धाव घेत आहेत. कामगार न्यायालयांत ५ ते ६ वर्षे केस लढल्या नंतर न्यायालयाकडून निर्णय होऊन कामगारांना आर्थिक भरपाई करण्याचे आदेश होतात. या आदेशाची अंमल बजावणी करण्याची जबाबदारी संबधित कामगार न्यायालय शहरातील कामगार अधिकाºयांवर सोपवितात. परंतू हे अधिकारी थेट यंत्रमाग मालकाशी संपर्क न साधता या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरीता ते आदेश जिल्हाधिकारीकडे पाठवितात. जिल्हाधिकारी ते आदेश स्थानिक महसुल विभागाकडे पाठवितात. अशा प्रकारचे शेकडो कामगारांची लाखो रूपयांची देणी वसुल करण्याचे आदेश तहसिल कार्यालयाकडे धूळ खात पडून आहेत. एक वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटूनही यंत्रमाग मालकांकडून लाखो रूपयांची वसुली महसुल विभागाने केली नाही. शहरात असलेला यंत्रमाग कामगार देशांतील विविध भागातून आलेला आहे. त्याचा गैरफायदा घेत यंत्रमाग मालक कामगारांवर अन्याय करतात. तर न्यायालयांतून न्याय मिळवून देखील शासनाचे आधिकारी कामगारांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळण्यापासून वंचीत ठेवत असल्याचा आरोप कामगार संघटनेच्या पदाधिकाºयांकडून केला जात आहे. कामगार न्यायालयाच्या निर्णयानंतर आर्थिक भरपाईच्या वसुलीची जबाबदारी महसुल विभागाकडे सोपविल्यानंतर स्थानिक कामगार अधिकारी त्याचा पाठपुरावा करीत नाही. त्यामुळे महसुल आधिकारी व कामगार अधिकारी यांनी संयुक्तीक कारवाई करून कामगारांना आर्थिक भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी यंत्रमाग कामगार संघटनांनी केली आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीbusinessव्यवसाय